AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

3 सख्ख्या भावांवर काळाचा घाला, पोहायला गेले अन्… जगबुडी नदीत दुर्दैवी अंत

River Drowning Incident : खेड मधील जगबुडी नदीच्या डोहात तिघेजण बुडाल्याची माहिती समोर आली आहे. नदीमध्ये पोहण्यासाठी उतरले असताना पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने तीन युवकांचा बुडून मृत्यू झाला आहे.

3 सख्ख्या भावांवर काळाचा घाला, पोहायला गेले अन्... जगबुडी नदीत दुर्दैवी अंत
three brothers drown jagbudi river (1)Image Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Jun 10, 2026 | 6:47 PM
Share

रत्नागिरीतून मोठी बातमी समोर आली आहे. खेड मधील जगबुडी नदीच्या डोहात तिघेजण बुडाल्याची माहिती समोर आली आहे. नदीमध्ये पोहण्यासाठी उतरले असताना पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने तीन युवकांचा बुडून मृत्यू झाला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे हे तिघेही सख्खे भाऊ असल्याची माहिती समोर आली आहे. मृत्यूमुखी पडलेले तरूण हे सांगली जिल्ह्यातील असून ते मुंबईत वास्तव्यास होते. ते रत्नागिरीत नातेवाईकांकडे आले होते. मात्र सुट्टीची मजा घेत असतानाच या तिघांचा बुडून मृत्यू झाला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

तीन सख्ख्या भावांचा दुर्दैवी अंत

या घटनेबाबत मिळालेली माहिती अशी की, खेड शहरातील जगबुडी नदीत पोहण्यासाठी गेलेल्या तिघा सख्ख्या भावांचा आज दुपारी तीनच्या दरम्यान बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेमुळे खेड शहरासह परिसरात शोककळा पसरली आहे. आकाश रामा कांबळे, नरेश रामा कांबळे आणि कैलास रामा कांबळे अशी मृतांची नावे आहेत. हे तिघे सख्खे भाऊ मूळचे सांगली जिल्ह्यातील असून मुंबईतील कुर्ला येथे वास्तव्यास होते. सुट्टीसाठी ते खेड येथील नातेवाईकांकडे आले होते.

कांबळे कुटुंबावर शोककळा

बुधवारी दुपारी ते आणखी एका नातेवाईकासह जगबुडी नदीत पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना नदीतील पाण्याची खोली लक्षात न आल्याने चौघेही खोल पाण्यात अडकले. स्थानिक नागरिकांनी तत्काळ बचावकार्य सुरू केले. या प्रयत्नात एका युवकाला सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले. मात्र आकाश, नरेश आणि कैलास कांबळे यांना वाचवता आले नाही. या तिघांचाही बुडून मृत्यू झाला. या तिघा भावांचा अशा दुर्दैवी घटनेत मृत्यू झाल्याने कांबळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

नंदुरबारमध्ये 3 मुलांचा बुडून मृत्यू

नंदुरबारच्या अक्कलकुवा तालुक्यातील दुर्गम जामठी परिसरात अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. नदीकाठावरील पाण्याने भरलेल्या डबक्यात बुडून तीन निष्पाप आदिवासी बालकांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. आंघोळीसाठी गेलेल्या या बालकांना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी शोधमोहीम राबविली, मात्र तिन्ही बालकांना वाचविण्यात अपयश आले. या हृदयद्रावक घटनेमुळे मृत बालकांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण आदिवासी समाजातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

रायगडच्या काशीद बीचवर समुद्रात बुडून तरुणाचा मृत्यू

रायगड जिल्ह्यातील काशीद बीच येथे फिरण्यासाठी गेलेल्या जळगाव जिल्ह्यातील ताडपत्री विक्रेत्यांपैकी एका तरुणाचा समुद्रात बुडून मृत्यू झाला आहे. तर दुसऱ्या तरुणाला लाइफगार्ड आणि पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप वाचविण्यात यश आले आहे. अमीन मजीद शेख आणि मलिक नजीर शेख हे दोघे समुद्रात पोहण्यासाठी उतरले असता खोल पाण्याचा अंदाज न आल्याने बुडू लागले. यामध्ये अमीन शेख याचा मृत्यू झाला, तर मलिक शेख याला लाइफगार्ड आणि पोलिसांनी तत्काळ बचावकार्य करत बाहेर काढले. त्याच्यावर नांदगाव येथील रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान, मुरुड पोलिसांकडून या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

Follow Us
हा लोकशाहीच्या इतिहासातील काळा दिवस!
Amit Thackeray | हा लोकशाहीच्या इतिहासातील काळा दिवस! सोनम वांगचुक यांच्या आंदोलनावरून अमित ठाकरेंचा केंद्र सरकारवर घणाघात
NDA मध्ये येताच राष्ट्रवादी शरद पवार गटाला मिळणार मोठं गिफ्ट?
NDA मध्ये येताच राष्ट्रवादी शरद पवार गटाला मिळणार मोठं गिफ्ट? पडद्याआड हालचाली वाढल्या
भारताचा अवकाश क्षेत्रात नवा इतिहास! पहिलं खासगी रॉकेट लॉन्च
भारताचा अवकाश क्षेत्रात नवा इतिहास! पहिलं खासगी रॉकेट यशस्वीरित्या लॉन्च; पहा व्हिडीओ
अजून किती बळी घेतल्यावर धर्मेंद्र प्रधान राजीनामा देणार?
Uddhav Thackeray | अजून किती बळी घेतल्यावर धर्मेंद्र प्रधान राजीनामा देणार? सरकारने जाहीर करावं; उद्धव ठाकरेंचा संतप्त सवाल!
सिया केतन प्रकरण! केतनच्या बहिणीची भावनिक हाक; न्यायासाठी थेट.....
सिया केतन प्रकरण! केतनच्या बहिणीची भावनिक हाक; न्यायासाठी थेट.....
भोंदू खरात प्रकरण पुन्हा चर्चेत! ED कडून तब्बल 3000 पानांचं... कोर्टात
Ashok Kharat | भोंदू खरात प्रकरण पुन्हा चर्चेत! ED कडून तब्बल 3000... कोर्टात नेमकं काय घडतंय?
केंद्रात तीन मंत्रिपदे हवीत, शिंदे सेनेची मोठी लॉबिंग; काय घडतंय?
Shivsena | केंद्रात तीन मंत्रिपदे हवीत, शिंदे सेनेची मोठी लॉबिंग; काय घडतंय?
रामगिरीवर खलबतं सुरू! मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला बावनकुळे दाखल; च
Chandrashekhar Bawankule Meet Devendra Fadnavis | रामगिरीवर खलबतं सुरू! मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला बावनकुळे दाखल; चर्चा गुलदस्त्यात?
अन्न व औषध प्रशासनाच्या धडक कारवाईवर मुंबई उच्च न्यायालयाचा आक्षेप;
FDA | अन्न व औषध प्रशासनाच्या धडक कारवाईवर मुंबई उच्च न्यायालयाचा आक्षेप; थेट...
एकच खळबळ! सलग 14 सोशल मीडिया आकाउंट्सवर गुन्हा दाखल; नेमकं काय घडलं?
एकच खळबळ! सलग 14 सोशल मीडिया आकाउंट्सवर गुन्हा दाखल; नेमकं काय घडलं?
जंतरमंतरवर जाताच अमित ठाकरेंनी वाढवले मोदी सरकारचे टेन्शन…दिल्लीतील आंदोलन देशभर पोहचवण्याची दिली हाक.

जंतरमंतरवर जाताच अमित ठाकरेंनी वाढवले मोदी सरकारचे टेन्शन…दिल्लीतील आंदोलन देशभर पोहचवण्याची दिली हाक

सिया आणि सोनमपेक्षाही खतरनाक… झोपेच्या गोळ्या, नंतर चादरीत घुसवला साप, अंगावर काटा येणारं हत्याकांड; बायको बनली हैवान.

सिया आणि सोनमपेक्षाही खतरनाक… झोपेच्या गोळ्या, नंतर चादरीत घुसवला साप, अंगावर काटा येणारं हत्याकांड; बायको बनली हैवान

Sonam Wangchuk : खरचं मानलं पाहिजे, सोनम वांगचूक यांची लोकांच्या फायद्याची तीन जबरदस्त इनोवेशन्स, सायन्सने समाज बदलण्याची जिद्द.

Sonam Wangchuk : खरचं मानलं पाहिजे, सोनम वांगचूक यांची लोकांच्या फायद्याची तीन जबरदस्त इनोवेशन्स, सायन्सने समाज बदलण्याची जिद्द

Vikram 1 Launch : ऐतिहासिक आणि अभिमानाचा क्षण, भारताच्या पहिल्या खासगी रॉकेटमधून उपग्रहांचं यशस्वी लॉन्चिंग.

Vikram 1 Launch : ऐतिहासिक आणि अभिमानाचा क्षण, भारताच्या पहिल्या खासगी रॉकेटमधून उपग्रहांचं यशस्वी लॉन्चिंग

अभिमान वाटावा असंच… नीटमध्ये महाराष्ट्राची कन्या मुलींमध्ये देशात पहिली, कोण आहे श्रावणी कुदळे?.

अभिमान वाटावा असंच… नीटमध्ये महाराष्ट्राची कन्या मुलींमध्ये देशात पहिली, कोण आहे श्रावणी कुदळे?

‘आमचा जीव कसा लागणार?’ अभिजीत दीपकेंची आमरण उपोषणाची घोषणा, आई-वडिलांनी सरकारला सुनावले काय?.

‘आमचा जीव कसा लागणार?’ अभिजीत दीपकेंची आमरण उपोषणाची घोषणा, आई-वडिलांनी सरकारला सुनावले काय?