
महापालिका निवडणुकांना अखेर मुहूर्त मिळाला आहे. राज्यातील सर्व 29 महापालिकांसाठी मकरसंक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी 15 जानेवारीला मतदान होणार आहे. तर मतमोजणी 16 तारखेला होईल. सध्या प्रशासकांच्या हाती असलेला कारभार पुन्हा लोकप्रतिनिधींकडे येईल. मुंबई, नागपूर, पुण्यात चार वर्षांनंतर तर कल्याण-डोंबिवली, कोल्हापूर, नवी मुंबई आदि महापालिकांमध्ये सहा वर्षांनंतर निवडणुका होणार आहेत. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईकडे सर्वांचं लक्ष आहे. तर काँग्रेसकडे आता मुंबईत फारसं काही राहिलं नाही, त्यामुळे त्यांनी निवडणूक लढवली काय, नाही लढवली काय फारसा फरक पडत नाही, अशी टीका अशोक चव्हाण यांनी केली. मुंबई महानगरपालिका स्वतंत्र लढणार असं वक्तव्य वर्षा गायकवाड यांनी केलं होतं. नांदेड महानगरपालिकेला युतीसंदर्भात पक्षश्रेष्ठी जे निर्देश देतील त्यानुसार निर्णय घेऊ, असंही त्यांनी स्पष्ट केलं. यासह देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.
पुण्यातील जमीन घोटाळ्याप्रकरणी शीतल तेजवानीला आज बावधन पोलिसांनी जेलमधून ताब्यात घेतले. त्यानंतर तिला पौंड न्यायालयात हजर करण्यात आले. दोन्ही बाजूंनी युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयाने तिला 8 दिवसांची म्हणजे 23 तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या काळात तिची चौकशी केली जाणार आहे.
जळगावात ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाची बैठक फिस्कटली आहे. सन्मानजनक जागा मिळत नसल्यानं शरद पवार गटाचे पदाधीकारी बैठकीतून बाहेर पडल्याचे पहायला मिळाले. युतीची चर्चा फिस्कटल्याने शरद पवार गटाने स्वबळाचा नारा दिला आहे. शरद पवार गटाचे महानगराध्यक्ष संग्राम सिंह राजपूत यांनी याबाबत माहिती दिली आहे.
नगरपालिका निवडणूक निकालापूर्वी तुळजापुरात भाजप आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली आहे. याप्रकरणी एकजण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे तुळजापूर शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. निकाला आधीच दोन पक्षांचे कार्यकर्ते भिडल्याने तुळजापूर शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
चंद्रपूरमधून सावकाराच्या तगाद्यामुळे किडनी विकल्याचे प्रकरण समोर आले होते. आता याप्रकरणी 6 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोशन कुडे याला दिलेल्या कर्जाच्या मोबदल्यात मोठी रक्कम उकळण्यात आल्याचं देखील पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. या आधारे पोलिसांनी आरोपींविरोधात अवैध सावकारी, खंडणी, मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून सहा आरोपींपैकी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.
जळगावातील भडगावात शहरात शाळेच्या परिसरालगत नाल्यात बुडून दोन चार वर्षीय विद्यार्थ्यांचा सकाळी मृत्यू झाल्याने संतप्त नागरिकांनी रास्ता रोको सुरु केला आहे. पोलिस आंदोलन करणाऱ्या नागरिकांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहेत.
अंबरनाथ पालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उद्या अंबरनाथ येथील गावदेवी मंदिरात जाहीर सभा होत आहे. भाजप नगराध्यक्ष सीए तेजश्री करंजुले यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांची अंबरनाथमध्ये सभा होत आहे.
वृक्षरोपणासाठी सहा ते सात एकर जागा तपोवनला लागून आहे. कॉलेजच्या माध्यमातून या ठिकाणी वृक्षांची लागवड केली जाणार आहे असे मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले आहे. आम्ही यांचे वृक्ष संगोपन करणार आहोत. आमची हजार झाडे या ठिकाणी दोन्ही ट्रक भरुन येथे येतील दोन दिवसात सगळी झाडे आम्ही येथे लावू असेही गिरीश महाजन यांनी म्हटले आहे. हैदराबाद राजमुद्रेवरून गाड्या निघाल्या आहेत. या ठिकाणी पाण्याची व्यवस्था आहे. मेंटेनन्स देखील करणार आहे असे गिरीश महाजन यांनी सांगितले.
वाल्मीक कराड हा संघटित गुन्हेगारी चालवणारा व्यक्ती आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहता त्याला जामीन देऊ नये अशी मागणी सरकारी वकीलांनी त्याचा जामीनाला विरोध करताना केली आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येचा घटनाक्रम सरकारी वकिलांनी आज कोर्टासमोर मांडला. आजची सुनावणी संपली असू उद्या पुन्हा सुनावणी होणार आहे.
बंजारा आणि धनगर समाजाला एसटी प्रवर्गात समावेश करण्याच्या मागणीसाठी जालन्यात मागच्या काही महिन्यांपूर्वी बंजारा आणि धनगर समाज बांधवांकडून उपोषण आणि आंदोलन करण्यात आलं होतं. त्यानंतर जालना शहरात मोठ्या संख्येने विराट मोर्चे देखील निघाले होते.यावेळी लोकप्रतिनिधींनी हा मुद्दा आपण सभागृहात मांडू असे आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आलं होतं. त्यामुळे नुकत्याच पार पडलेल्या नागपूर येथील हिवळी अधिवेशना दरम्यान सभागृहामध्ये बंजारा आणि धनगर आरक्षणाचे प्रश्न मांडल्यामुळे आमदार अर्जुन खोतकर आणि बबनराव लोणीकारांचा सत्कार करण्यात आला.
-मंत्री गिरीश महाजन नाशिकच्या हिरावाडी वृक्षांसाठी पाहणी परिसरात करत आहेत. सामाजिक दायित्वातून वृक्ष लागवडीसाठी अनेक शैक्षणिक संस्था पुढे आल्या आहेत. नाशिकच्या हिरावाडी परिसरात आता 2 हजार वृक्ष लावली जाणार आहेत. शैक्षणिक संस्थाकडून वृक्ष लागवडीसाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली.
भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष नितीन नबीन यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. ते नितीश कुमार सरकारमध्ये रस्ते बांधकाम मंत्री होते.
प्रसिद्ध अर्जेंटिनाचा फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी यांच्याशी संबंधित कार्यक्रमादरम्यान साल्ट लेक स्टेडियममध्ये झालेल्या तोडफोडीच्या चौकशीसाठी चार सदस्यीय विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आले आहे.
मनरेगाच्या नामांतराच्या विरोधात काँग्रेस 28 डिसेंबर रोजी देशव्यापी निदर्शने करणार आहे. काँग्रेस स्थापना दिनी गावागावात आणि जिल्ह्यांमध्ये गांधीजींच्या फोटोसह निदर्शने केली जातील. काँग्रेस खासदारांनी आज मकर द्वार येथेही जोरदार निदर्शने केली.
आमच्या तालुक्यांमध्ये रोज रेल्वेचा भोंगा वाजला पाहिजे, ही अपेक्षा. आजतागायत 100 एकरपेक्षा जास्त जमिनीचे भूसंपादन झाले. मात्र रेल्वेचा मार्ग बदलला. रेल्वे शिर्डीमार्गे नेणे म्हणजे पुण्याहून पुणतांबा. मी या सरकारचा धिक्कार करतो. सार्वजनिक प्रकल्प करताना नफा तोटा बघायला नसतो, तर लोकांचा विचार करायचा असतो असे आमदार सत्यजीत तांबे यांनी म्हटले.
नांदेड येथील काँग्रेसच्या माजी महापौर जयश्री पावडे, माजी उपमहापौर सतीश देशमुख व विनोद पावडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार अशोकराव चव्हाण यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश पार पडला.
गडचिरोली जिल्ह्यात शेतकऱ्यांनी कापणी केलेले धान पंचवीस दिवसापासून रस्त्यावरच असल्यामुळे शेतकरी मोठे चिंतेत आहेत. कापणी होऊन 25 दिवस लोटले तरी जिल्ह्यात कुठेही धान खरेदी केंद्र सुरू नाही . धान खरेदी केंद्र सुरू करण्यासंदर्भात अधिवेशनात मुद्दा गाजल्यानंतरही गडचिरोली जिल्ह्यात शंभर टक्के धान खरेदी केंद्र बंद
आचारसंहिता लागू होताच धुळ्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली आहे. देवभाने शिवारात बनावट दारू बनवण्याचा कारखाना उद्ध्वस्त करण्यात आला आहे. महिन्याभरापासून सुरू असलेला कारखाना अखेर बंद करण्यात आला.
येवला तालुक्यात बिबट्यांचा वाढलेला वावर आणि रात्रीच्या वेळी शेतीला पाणी देण्यासाठी येणाऱ्या अडचणींमुळे शेतकरी आणि राजकीय पक्ष दिवसा शेतीसाठी वीज मिळावी या मागणीसाठी आक्रमक झाले आहेत. या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष आणि शिवसेना (शिंदे गट) या पक्षांच्यावतीने एकत्रितपणे महावितरण कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला. आंदोलकांनी विंचूर चौफुली ते महावितरण कार्यालयापर्यंत मोर्चा काढत महावितरणच्या कारभाराविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. येत्या पाच दिवसांत जर दिवसा शेतीसाठी वीज पुरवठा सुरू करण्यात आला नाही, तर यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी महावितरणला दिला. तसेच मोर्चाच्या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
अंबादास दानवे यांनी भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर जोरदार टीका केली. बावनकुळे हे मुंबईचा महापौर भाजपचा होईल की महायुतीचा, हे स्पष्ट बोलत नाहीत. महापौर भाजपचा होणार आहे की महायुतीचा त्यांनी तसं सांगावं. एकीकडे शिंदे गटाला त्रास द्यायचा आणि त्यांचेच लोक फोडायचे, हा प्रकार म्हणजे पाठीत खंजीर खुपसणे आहे. गळ्यात गळा घालायचा आणि गुपचूप पाठीत खंजीर खुपसायचा आणि हे काम भाजपा करत आहे, असा घणाघात अंबादास दानवे यांनी केला.
अंबादास दानवे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांच्यात युती होण्याची शक्यता बळावली आहे. युती होणार असा पूर्णपणे निर्णय झालेला आहे. संजय राऊत हे राज ठाकरे यांची भेट घेत आहेत आणि यासाठी फार दिवस मोजावे लागणार नाहीत. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि मनसे यांच्यात युती होऊ शकते आणि हे दोन-चार दिवसांत होईल, अस अंबादास दानवे म्हणाले
महाराष्ट्रात महापालिका निवडणुका जाहीर होताच सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी केली जात आहे. त्यातच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने १२ जानेवारी रोजी मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर आपली शेवटची सभा आयोजित करण्यासाठी प्रशासनाकडे आग्रह धरला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मनसेकडून बृहन्मुंबई महानगरपालिकेला रीतसर पत्र देण्यात आले आहे.
चाळीसगाव तालुक्यातील तरवाडे बुद्रुक येथे रहस्यमयरीत्या बेपत्ता झालेल्या ९ वर्षीय धनश्री शिंदेचा मृतदेह तब्बल चार दिवसांनी गावाजवळील विहिरीत आढळून आल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. शाळेतून घरी परतताना धनश्री बेपत्ता झाली होती. या घटनेची माहिती मिळताच जळगाव स्थानिक गुन्हे शाखा (LCB) चे पथक आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत. सध्या विहिरीतून मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. शवविच्छेदन झाल्यानंतरच धनश्रीच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल.
कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्याला लावली किडनी विकायला लावल्याचा धक्कादायक प्रकार चंद्रपूरमध्ये घडला आहे. चंद्रपूरातून माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना पुढे आली आहे.कर्जाचा परतावा करण्यासाठी सावकारांनी शेतकऱ्याला किडनी विकायला लावली.
या क्रूर प्रकाराणे महाराष्ट्र हादरला आहे.जिल्हातील नागभीड तालुक्यात येणाऱ्या मिंथुर गावात हा प्रकार घडला. बळीराजाचा वेदना बघून दगडालाही पाझर फुटेल.मात्र सरकार, प्रशासनाला बळीराजाचे आभाळाएवढे दुःख कधी दिसलेच नाही. चंद्रपूर जिल्हातील या कर्जबाजारी शेतकऱ्याची वेदना आभाळाला भिडणारी आहे.सावकारी कर्जाचा जाळ्यात अडकलेल्या या शेतकऱ्याला कर्ज फेडण्यासाठी स्वतःची किडनी विकण्याचा वेदनादाई प्रसंग ओढवीला. या शेतकऱ्याचे नाव आहे रोशन सदाशिव कुडे. ते चंद्रपूर जिल्हातील मिंथुर गावातील रहिवाशी आहे.
नागपूर महानगर पालिका निवडणुका जाहीर होताच भाजप कामाला लागली आहे. आजपासून भाजपच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू झाल्या आहेत. 1489 इच्छुक उमेदवारांचे भाजपकडे उमेदवारी अर्ज आले आहेत. त्या आधारावर मुलाखती घेतल्या जात आहे. सगळ्याच जागांसाठी मुलाखती घेतल्या जात आहेत. एका प्रभागात जवळपास 9 ते 10 इच्छुक उमेदवार मात्र उमेदवारांची क्षमता बघून उमेदवारी दिली जाणार असल्याचे भाजप शहराध्यक्ष दया शंकर तिवारी यांनी सांगितले.
अमरावती महानगरपालिकेत भाजप,शिवसेना आणि रवी राणा यांच्या युवा स्वाभिमानचीच युती होणार. अजित पवारांची राष्ट्रवादी आमच्या महायुतीमध्ये राहणार नाही असा दावा रवी राणा यांनी केला आहे. आमच्यामुळे राष्ट्रवादीला फायदा होतो मात्र राष्ट्रवादीचा आम्हाला काही फायदा होणार नाही त्यामुळे ते महायुतीत नको अशी भूमिका रवी राणांनी जाहीर केली. मंत्री बावनकुळे यांनी सूचना दिले आहे की भाजप, शिवसेना आणि युवा स्वाभिमानच्या तीन पक्षांनी एकत्र बसून जागा वाटपाबाबत चर्चा करावी अशी माहिती त्यांनी दिली.
आज दुपारी साडेबारा वाजता शिवसेना आणि भाजपची बोलणी होईल. संयुक्त बैठक भाजप कार्यालयात होणार. आमच्या आणि त्यांच्या मागण्या मॅच झाल्या पाहिजे हा आमचा प्रयत्न. महायुतीला मिळालेल्या मताचा अनादर होऊ नये असे मी सांगत आलोय, म्हणून पहिल्या फेरीच्या बोलणी करायला मी स्वतः भाजप कार्यालयात जाणार आहे. मुंबई महापालिका एवढ एक टार्गेट उद्धव ठाकरे सेना आणि मनसेचा आहे. याचा फायदा महायुतीला होणार आहे. सर्वांचे लक्ष युती कशी होईल याकडे लागले. सगळ्या गोष्टीचा विचार करून तिन्ही नेते ठरवतील.आमच्या सोबत बैठकीत एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट सांगितले संभ्रम वाद नको, निवडणुका युतीतच होणार आहे, असे मंत्री संजय शिरसाट यांनी स्पष्ट केले.
बीडच्या गेवराई मध्ये नगरपरिषद निवडणुकीच्या मतदान प्रक्रिये दरम्यान मोठा राडा झाला होता. याच दरम्यान माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या कृष्णाई कार्यालयावर जाऊन आठ ते दहा जणांनी स्वीय सहाय्यक अमृत डावखर यांच्यावर प्राणघातक हल्ला केला होता. याचे सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आले होते. यानंतर आता गेवराई पोलिसांनी एकूण पाच आरोपींना अटक केली असून रात्री माजी आमदार लक्ष्मण पवार यांचे बंधू त्रिंबक उर्फ बाळराजे पवार यांना देखील हल्ला प्रकरणात अटक केली आहे
उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा पत्रकार परिषद घेऊन स्वतःला मराठी माणसाचे कैवारी असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला.. संजय राऊत यांच्या प्रकृतीत सुधारणा होणे आनंदाची बाब, मात्र राजकीय मैदान आता भाजप–महायुतीने काबीज केले आहे. मुंबई महापालिका निवडणुकांची धुमाळी सुरू असून भाजपच्या नेतृत्वाखाली महायुतीचाच भगवा फडकेल, याबाबत शंका नाही. मुंबईकरांनी २५ वर्षांचा उबाठा कारभार आणि साडेतीन वर्षांचा देवेंद्र फडणवीस–एकनाथ शिंदे यांचा विकासकामांचा अनुभव घेतलेला आहे. मेट्रो, रस्ते, पायाभूत सुविधा यांसारखे प्रकल्प फक्त भाजप–महायुतीच करू शकते, असा जनतेचा विश्वास आहे. संजय राऊत कितीही पत्रकार परिषदा घेतल्या तरी त्याचा काहीही परिणाम होणार नाही असा दावा माध्यम प्रमुख नवनात बन यांनी केला आहे.
अकोलेकरांचे रेल्वे मार्गासाठी आंदोलन करण्यात येत आहे.अकोले तालुक्यातील हजारो नागरीकांचा आज संगमनेर प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला.अकोले शहरातुन बाईक रॅलीने आंदोलक संगमनेर प्रांतकार्यालयाकडे रवाना झाले आहेत. अकोले ते संगमनेर 22 किलोमीटर बाईक रॅली काढण्यात येत आहे. नाशिक – पुणे सेमी हायस्पीड रेल्वे अकोले – संगमनेर मार्गेच न्यावी आणि अकोलेत थांबा मिळावा अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. या मोर्चात आमदार डॉ.किरण लहामटे,आमदार सत्यजित तांबे , खासदार भाऊसाहेब वाकचौरे , डॉ.अजीत नवले आदी राजकीय नेत्यांसह यासह सर्व पक्षातील पदाधिकारी सहभागी होणार.
मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या शितल तेजवानीचा बावधान पोलीस आज ताबा घेणार आहेत. येरवडा कारागृह येथे बावधन पोलीस दाखल झाले असून ते कागदपत्रांची पूर्तता करून थोड्या वेळात शितल तेजवानी हिला ताब्यात घेतील.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी संजय राऊत आणि अनिल परब हे ‘शिवतीर्थ’ येथे दाखल झालेत. ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेसाठी तारीख ठरण्याची शक्यता आहे.
बीडच्या आष्टी तालुक्यातील हाजीपुर गावात भयाक घटना घडली आहे. खर्चासाठी पैसे न दिल्याने एका तरूणाने त्याच्या वडिलांनाच प्लास्टिक पाईप, लाकडी काठीने तसेच दगडाने अमानुष मारहाण केली. या प्रकरणी आरोपी संतोष मोहन साप्ते याच्या विरोधात आष्टी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.
मुंबई पालिकेतील 25 वर्षांच्या कारभाराला जनता कंटाळली आहे, मुंबई पालिकेवर महायुतीचा भगवा फडकेल – नवनाथ बन
वाळू माफियावर कारवाई केल्याने तलाठ्याने नायब तहसीलदाराला मारहाण केली होती. तलाठी प्रदीप पाटील यांनी नायब तहसीलदार राजेंद्र शिंदे करून शिवीगाळ करून मारहाण केली होती. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी तलाठी प्रदीप पाटील यांच्या निलंबनाचे आदेश काढले.
मीरा-भायंदर-वसई-विरार (MBVV) पोलिसांच्या क्राइम ब्रांचने अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा निकटवर्ती कुख्यात गँगस्टर सुभाष सिंह ठाकूर याला उत्तर प्रदेशातील फतेहगढ सेंट्रल जेलमधून प्रॉडक्शन वॉरंटवर ताब्यात घेतले आहे. 26 फेब्रुवारी 2022 रोजी विरारच्या मनवेलपाडा भागात दिनदहाडे गोळ्या झाडून हत्या झालेल्या बिल्डर चव्हाण प्रकरणात ठाकूर मुख्य आरोपी असून, तुरुंगातूनच त्याने हत्येची योजना आखल्याचा आणि सुपारी दिल्याचा आरोप आहे.
गटप्रमुख, विभागप्रमुख, संपर्कप्रमुख, शाखाप्रमुख, आमदार, खासदार, माजी नगरसेवक सर्वांना आज एकनाथ शिंदे मार्गदर्शन करणार आहेत. कालच मुंबईसह ठाण्याची निवडणूक जाहीर झाली, त्यामुळे आज पासूनच एकनाथ शिंदे एक्शन मोडवर आहेत. ठाण्यात युतीकरून भाजप सोबत लढायचे असल्याने, जागा वाटप, प्रचार, मोठ्या सभा, इच्छुक उमेदवार यासंदर्भात आज महत्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आज संध्याकाळी टिप टॉप प्लाज़ा इथे बोलावण्यात बैठक आली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार सकाळपासून पिंपरी चिंचवड मधील इच्छुकांच्या भेटी आणि मुलाखती घेत आहेत. विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे देखील बारामती होस्टेल या ठिकाणी आले आहेत.
काँग्रेस या क्षणी सोबत आहेत असं वाटत नाही… बिहारच्या निवडणुकीत काँग्रेसचा आत्मविश्वास वाढला आहे… असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे… येत्या आठवड्यात ठाकरे बंधूंची युतीची घोषणा होण्याची शक्यता आहे… आज राज ठाकरे यांची भेट घेणार… असं वक्तव्य देखील संजय राऊत यांनी केलं आहे.
डोंबिवली मधील धक्कादायक घटना. जुन्या वादाच्या रागातून चाकू-लोखंडी रॉडने 40 हून अधिक वार करत तरुणाची निर्घृण हत्या. डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. सीसीटीव्ही व तांत्रिक पुराव्याच्या आधारे अवघ्या १२ तासांत पोलिसांनी तीन आरोपीला ठोकल्या बेड्या
पिंपरी – चिंचवडमधील भारतीय जनता पार्टीचे अनेक माजी नगरसेवक आज करणार अजित पावराच्या पक्षात प्रवेश. भारतीय जनता पार्टीच्या स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सिमा सावळे अजित पावराच्या भेटीसाठी आल्या. अजित पावराच्या राष्ट्रवादीत करणार प्रवेश….
राज्य सरकारने शेतीपंपासाठी महावितरणची नवीन वीज कनेक्शन बंद करून सौर पंपाची सक्ती केली आहे. मात्र धाराशिव जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये वीजही नाही आणि सौर पंप ही नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ऐन सुगीच्या दिवसात महावितरण आणि सोलार कंपन्यांकडून शेतकऱ्याची पिळवणूक सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. शेती पिकाला पाणी देण्याच्या दिवसात अशी परिस्थिती शेतकऱ्यावर ओढवल्याने शेतातील उभी पिके सुकू लागली आहेत.
आज अकोले तालुक्यातील हजारो नागरिकांचा संगमनेर प्रांतकार्यालयावर मोर्चा. नाशिक – पुणे सेमी हायस्पीड रेल्वे अकोले – संगमनेर मार्गेच न्यावी आणि अकोलेत थांबा मिळावा. शिर्डी – शहापुर रेल्वे मार्गासाठी सर्व्हेक्षण व्हावे या दोन मुख्य मागण्या मागण्यासाठी आज अकोले बंदची हाक…
उत्तर तहसील कार्यालयात कार्यरत असणाऱ्या चंद्रकांत हेडगिरे या नायब तहसीलदारावर पुणे अँटी करप्शन विभागाची कारवाई. मंडल अधिकाऱ्याचे थकलेले वेतन काढण्यासाठी मागितली होती 60 हजार रुपयांची लाच. पुण्याच्या अँटी करप्शन विभागाने सोलापुरात नायब तहसीलदार दर्जाच्या अधिकाऱ्यावर कारवाई केल्याने जिल्ह्यात एकच खळबळ. सदर घटनेबाबत सदर बाजार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे
आज अकोलेत कडकडीत बंद आहे. अकोलेकरांनी रेल्वे मार्गासाठी एल्गार पुकारला आहे. आज अकोले तालुक्यातील हजारो नागरिकांचा संगमनेर प्रांतकार्यालयावर मोर्चा आहे. नाशिक – पुणे सेमी हायस्पीड रेल्वे अकोले – संगमनेर मार्गेच न्यावी आणि अकोलेत थांबा मिळावा,
शिर्डी – शहापुर रेल्वे मार्गासाठी सर्व्हेक्षण व्हावे या दोन मुख्य मागण्यांसाठी बंद पुकारला आहे.
नाशिकच्या मखमलाबाद परिसरात आजदेखील वृक्ष लागवड होत आहे. काल 1000 झाडांचं वृक्षारोपण झालं होतं. टप्पाटप्प्याने शहरात 15000 झाडं लावली जाणार आहेत. शहरात देशी झाडांची लागवड होणार आहे. काल गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत वृक्ष लागवडीला सुरुवात झाली होती. आंध्र प्रदेशच्या राजमुंद्रीवरून देशी झाडं नाशिकमध्ये दाखल होत आहेत.
नागपूर- दीक्षाभूमी सौंदर्यीकरण आणि पुनर्विकास प्रकल्पाच्या विलंबावर नागपूर खंडपीठाने फटकारल्यानंतर कामाच्या कालमर्यादेबाबत शपथपत्र दाखल करण्यात आलं. सुधारित डीपीआर (डिटेल्ड प्रोजेक्ट रिपोर्ट) तयार करण्यासाठी पाच आठवड्यात सादर करणार असल्याचं शपथपत्र आहे. एनएमआरडीए (NMRDA) ही प्रकल्पाची नोडल एजन्सी आहे. तर समाजकल्याण आणि न्याय विभागाच्या सूचनेनुसार डिझाईनमध्ये बदल सुरू झाले आहेत.
छत्रपती संभाजीनगरमधील सिल्लोड तालुक्यातील तलवाडा गावात विकास कामांचं लोकार्पण आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते होतं. यावेळी गावाला भरघोस निधी उपलब्ध करून दिला म्हणून गावकऱ्यांनी अब्दुल सत्तार यांची घोड्यावर बसून गावात मिरवणूक काढत अनोखं स्वागत केलं.
सोलापूर महानगरपालिकेसाठी भाजपकडून इच्छुक उमेदवारांच्या 3 दिवस मुलाखती होणार आहेत. सोलापूर महानगरपालिकेसाठी भाजपकडे 1200 हून अधिक इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केला आहे. आजपासून तीन दिवस भाजप कार्यालयात मुलाखती होणार असल्याची शहराध्यक्ष रोहिणी तडवळकरांनी माहिती दिली.
उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यातील बारामती हॉस्टेलमध्ये दाखल झाले आहेत. अजित पवारांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे. महापालिका निवडणुका जाहीर होताच हालचालींना वेग आला आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील कार्यकर्ते अजित पवारांना भेटण्यासाठी आले आहेत.