AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घटनेला हात लावला तर अख्खा देश पेटल्याशिवाय राहणार नाही – उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे यांनी आज धाराशिवच्या सभेत मोदी सरकारवर जोरदार टीका केली. मोदी सरकार संविधान बदलणार असल्याचा आरोप त्यांनी केला. मोदी सरकारने जर संविधानाला हात लावला तर अख्खा देश पेटून उठेल असं त्यांनी म्हटले आहे.

घटनेला हात लावला तर अख्खा देश पेटल्याशिवाय राहणार नाही - उद्धव ठाकरे
| Updated on: May 04, 2024 | 8:59 PM
Share

uddhav thackeray Live : उद्धव ठाकरे यांनी आज धाराशिवमध्ये जाहीर सभा घेतली. या सभेत बोलताना त्यांनी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार टीका केली. मोदी सरकारचा घटना बदलण्याचा मनसुबा असल्याचं ते म्हणाले. त्यांनी म्हटले की, तुम्ही घटनेला हात लावून पाहा. ज्या दिवशी घटनेला हात लावण्याचा प्रयत्न करतील त्या दिवशी अख्खा देश पेटल्याशिवाय राहणार नाही. देशातील लोकं काय गुरंढोरं आहेत का? एकदा मूर्ख बनवाल. काही जणांना सदैव मूर्ख बनवाल. पण सर्वकाळ मूर्ख बनवू शकत नाही. कारण जनता आता जागी झाली आहे. प्रत्येकवेळी निवडणूक आल्यावर हिंदू मुस्लीम दंगे लावले जात आहेत. आता त्यांनी नवीन काढलं. मी बातम्या वाचतो आणि बघतो. इंडिया आघाडी जिंकली तर पाकिस्तानला आनंद होईल म्हणून सांगतात. अरे आमच्यापैकी कोणी तरी न बोलावता नवाज शरीफचा केक खाऊन आला का. आमच्यापैकी कोणी तरी जीनाच्या कबरीवर जाऊन आला का. आपल्यात भांडणं लावायचा हा प्रकार आहे.

सिंधुदुर्गातील गद्दाराने धमकी दिली होती. कोकणात येऊन दाखव. जाऊन दाखव. मी कोकणात गेलो. तू येऊन बघ तुला गाडून दाखवतो की नाही. कोकणात माझी माणसं तुला गाडून टाकतील. अमित शाह तिथे आले. म्हणाले ही नकली सेना आहे. मग मी त्यांना काय बोललो… काल जे बोललो ते सांगतो. जे माझ्या शिवसेनेला नकली म्हणतात ते बेअकली आहे. हे माझे वैभव आहे. ही माझी संपत्ती आहे. बी बियाणे आणि अवजारांवरील जीएसटी माफ करेल. सरकार आल्यावर.

अमित शाह तुमच्या लाज असेल हिंमत तर नाही. तर जनतेच्या प्रश्नावर बोला. धाराशीवला कधी देणार पाणी. मोदीजी तुम्ही तुमच्या दहा वर्षातील कामे जनतेसमोर ठेवा. मी अडीच वर्षातील कामे ठेवतो. तुम्ही जिंकला तर मी घरी बसणार. ईडी कारवाया करून ज्यांनी आमच्या लोकांना सतावलं. त्याचा हिशोब व्याजासह परत केल्याशिवाय राहणार नाही.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.