AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“मराठी भाषा ही मुंबईचा आत्मा आहे, तो आत्मा मुंबईबाहेर जाणार नाही”; साहित्य संमेलनातच या सरकारकडून शब्द

मराठी भाषा ही मुंबईचा आत्मा आहे. त्यामुळे राज्यात आणि राज्याबाहेर होणारी मराठी साहित्य संमेलनासाठी आता सरकार मदत करणार असून ही संमेलनं सरकारने स्वतःहून घेतली पाहिजे असंही मत दीपक केसरकर यांनी व्यक्त केले आहे.

मराठी भाषा ही मुंबईचा आत्मा आहे, तो आत्मा मुंबईबाहेर जाणार नाही; साहित्य संमेलनातच या सरकारकडून शब्द
| Updated on: Feb 03, 2023 | 8:11 PM
Share

वर्धाः अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्यानिमित्ताने आज शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी बोलताना मराठी भाषेचा गौरव केला. मराठी भाषा टिकवली पाहिजे, वाढवली पाहिजे म्हणत त्यांनी मराठी साहित्य संमेलनांसाठी लागणारी अनुदानाच्या रक्कमेमध्ये वाढ केल्याचे सांगत 50 लाखांहून 2 कोटी असे अनुदान अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी देणार असल्याचे सांगितले. त्याच बरोबर मराठी भाषा भवन हे मुंबईमध्ये न होता ते नवी मुंबईमध्ये निर्माण करण्याचा विचार करण्याचा विचार सरकार करत होते.

मात्र सरकारने हा निर्णय बदलला असून मराठी भाषेसंदर्भात असलेली कार्यालये ही आता नवी मुंबईमध्ये न होता ती मुंबईमध्येच होणार असल्याचे सांगितले.

मराठी भाषा ही मुंबईचा आत्मा आहे. त्यामुळे मराठी भाषा भवन, सर्व मंडळे ही आता मुंबईमध्येच होणार असून त्याचा फायदा मराठी साहित्यिक, समीक्षक आणि अभ्यासकांना होणार असल्याचे दीपक केसरकर यांनी सांगितले.

मराठी भाषा ही मुंबईचा आत्मा आहे. त्यामुळे राज्यात आणि राज्याबाहेर होणारी मराठी साहित्य संमेलनासाठी आता सरकार मदत करणार असून ही संमेलनं सरकारने स्वतःहून घेतली पाहिजे असंही मत दीपक केसरकर यांनी व्यक्त केले आहे.

मराठी भाषा भवन हे सवोत्कृष्ट असले पाहिजे यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. त्यासाठी संबंधित कार्यालये ही मुंबईत असावी यासाठीच ते प्रयत्न केले जात आहे. त्यामुळे नवी मुंबईत होणारे कार्याल न करता ते कार्यालय आता मुंबईमध्येच केले जाणार आहे.

त्याचबरोबर निर्माण केल्या जाणाऱ्या साहित्य भवनात आणखी दोन वर्षे राहण्याची योग्य व्यवस्था, नाट्यगृह करण्यात येणार असून त्याचा लाभ लेखकांनी घ्यावा असं आवाहनही त्यानी यावेळी केले.

विश्व मराठी साहित्य संमेलनासाठी आता राज्यातील सातही मंडळे एकत्र येऊन हे साहित्य संमेलन मोठ्या उत्साहात केली जाणार आहेत. त्यासाठी आपण आतापासूनच या मंडळाच्या सर्वांना आमंत्रित करून विश्व साहित्य संमेलन मोठ्या उत्साहात करायची आहेत असंही त्यांनी यावेळी सांगितले.

Follow Us
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार.
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण.
हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक...
हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक....
अवकाळीचा शेतीला फटका, लाखोंचे नुकसान, शेतकरी हवालदिल
अवकाळीचा शेतीला फटका, लाखोंचे नुकसान, शेतकरी हवालदिल.
दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिराच्या कळसावर गुलाल आणि खोबऱ्याची उधळण
दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिराच्या कळसावर गुलाल आणि खोबऱ्याची उधळण.
व्हायरल व्हिडीओमुळे मंत्री नरहरी झिरवळ मंत्रिमंडळ बैठकीत अनुपस्थित?
व्हायरल व्हिडीओमुळे मंत्री नरहरी झिरवळ मंत्रिमंडळ बैठकीत अनुपस्थित?.
आता 14 दिवस सुटका नाहीच... भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयीन कोठडी
आता 14 दिवस सुटका नाहीच... भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयीन कोठडी.
अखेर भाजपने पत्ते खोलले, राहुरीसाठी या नेत्याला दिली उमेदवारी
अखेर भाजपने पत्ते खोलले, राहुरीसाठी या नेत्याला दिली उमेदवारी.
सर्वात आधी निषेध एकनाथ शिंदे यांचा केला पाहिजे... राऊत असं का म्हणाले?
सर्वात आधी निषेध एकनाथ शिंदे यांचा केला पाहिजे... राऊत असं का म्हणाले?.
ताराराणींबाबत वादग्रस्त वक्तव्यावरून संताप; राऊतांचा जैन मुनींवर निशाण
ताराराणींबाबत वादग्रस्त वक्तव्यावरून संताप; राऊतांचा जैन मुनींवर निशाण.