AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“मराठी भाषा ही मुंबईचा आत्मा आहे, तो आत्मा मुंबईबाहेर जाणार नाही”; साहित्य संमेलनातच या सरकारकडून शब्द

मराठी भाषा ही मुंबईचा आत्मा आहे. त्यामुळे राज्यात आणि राज्याबाहेर होणारी मराठी साहित्य संमेलनासाठी आता सरकार मदत करणार असून ही संमेलनं सरकारने स्वतःहून घेतली पाहिजे असंही मत दीपक केसरकर यांनी व्यक्त केले आहे.

मराठी भाषा ही मुंबईचा आत्मा आहे, तो आत्मा मुंबईबाहेर जाणार नाही; साहित्य संमेलनातच या सरकारकडून शब्द
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: Feb 03, 2023 | 8:11 PM
Share

वर्धाः अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्यानिमित्ताने आज शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी बोलताना मराठी भाषेचा गौरव केला. मराठी भाषा टिकवली पाहिजे, वाढवली पाहिजे म्हणत त्यांनी मराठी साहित्य संमेलनांसाठी लागणारी अनुदानाच्या रक्कमेमध्ये वाढ केल्याचे सांगत 50 लाखांहून 2 कोटी असे अनुदान अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी देणार असल्याचे सांगितले. त्याच बरोबर मराठी भाषा भवन हे मुंबईमध्ये न होता ते नवी मुंबईमध्ये निर्माण करण्याचा विचार करण्याचा विचार सरकार करत होते.

मात्र सरकारने हा निर्णय बदलला असून मराठी भाषेसंदर्भात असलेली कार्यालये ही आता नवी मुंबईमध्ये न होता ती मुंबईमध्येच होणार असल्याचे सांगितले.

मराठी भाषा ही मुंबईचा आत्मा आहे. त्यामुळे मराठी भाषा भवन, सर्व मंडळे ही आता मुंबईमध्येच होणार असून त्याचा फायदा मराठी साहित्यिक, समीक्षक आणि अभ्यासकांना होणार असल्याचे दीपक केसरकर यांनी सांगितले.

मराठी भाषा ही मुंबईचा आत्मा आहे. त्यामुळे राज्यात आणि राज्याबाहेर होणारी मराठी साहित्य संमेलनासाठी आता सरकार मदत करणार असून ही संमेलनं सरकारने स्वतःहून घेतली पाहिजे असंही मत दीपक केसरकर यांनी व्यक्त केले आहे.

मराठी भाषा भवन हे सवोत्कृष्ट असले पाहिजे यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. त्यासाठी संबंधित कार्यालये ही मुंबईत असावी यासाठीच ते प्रयत्न केले जात आहे. त्यामुळे नवी मुंबईत होणारे कार्याल न करता ते कार्यालय आता मुंबईमध्येच केले जाणार आहे.

त्याचबरोबर निर्माण केल्या जाणाऱ्या साहित्य भवनात आणखी दोन वर्षे राहण्याची योग्य व्यवस्था, नाट्यगृह करण्यात येणार असून त्याचा लाभ लेखकांनी घ्यावा असं आवाहनही त्यानी यावेळी केले.

विश्व मराठी साहित्य संमेलनासाठी आता राज्यातील सातही मंडळे एकत्र येऊन हे साहित्य संमेलन मोठ्या उत्साहात केली जाणार आहेत. त्यासाठी आपण आतापासूनच या मंडळाच्या सर्वांना आमंत्रित करून विश्व साहित्य संमेलन मोठ्या उत्साहात करायची आहेत असंही त्यांनी यावेळी सांगितले.

Follow Us
युद्धामुळे नितीन गडकरींच्या व्यवसायाला फटका, निर्यात रखडली; स्थानिक...
युद्धामुळे नितीन गडकरींच्या व्यवसायाला फटका, निर्यात रखडली; स्थानिक....
NEET प्रकरणी सुप्रीम कोर्टात नवी याचिका; NTA ऐवजी स्वतंत्र यंत्रणेकडून
NEET प्रकरणी सुप्रीम कोर्टात नवी याचिका; NTA ऐवजी स्वतंत्र यंत्रणेकडून.
मोठी बातमी! रोहित पवार अचानक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, राजकारणात...
मोठी बातमी! रोहित पवार अचानक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, राजकारणात....
रेल्वे प्रशासन ॲक्शन मोडमध्ये; मुंबईत अतिक्रमण हटाव मोहीम, गरीब नगरात
रेल्वे प्रशासन ॲक्शन मोडमध्ये; मुंबईत अतिक्रमण हटाव मोहीम, गरीब नगरात.
राहुल गांधींनी शेअर केला नरेंद्र मोदी यांचा परदेश दौऱ्यातील व्हिडीओ...
राहुल गांधींनी शेअर केला नरेंद्र मोदी यांचा परदेश दौऱ्यातील व्हिडीओ....
थरारक दृश्य! एक्सप्रेस रुळावरून घसरली अन् डब्बा थेट 20 फुटावर लटकला...
थरारक दृश्य! एक्सप्रेस रुळावरून घसरली अन् डब्बा थेट 20 फुटावर लटकला....
नागपूर विधानपरिषदेसाठी सर्वपक्षीय फॉर्म्युला? निवडणूक बिनविरोध.....
नागपूर विधानपरिषदेसाठी सर्वपक्षीय फॉर्म्युला? निवडणूक बिनविरोध......
पोलीस भरती परीक्षेत मोठा घोटाळा? पोलीस शिपाई भरतीची रद्द झालेली लेखी..
पोलीस भरती परीक्षेत मोठा घोटाळा? पोलीस शिपाई भरतीची रद्द झालेली लेखी...
मोठी खळबळ! थेट छगन भुजबळ यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, नेमकं कारण
मोठी खळबळ! थेट छगन भुजबळ यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, नेमकं कारण.
बापरे! मनीषा मंधारेला प्रश्नपत्रिका तोंडपाठ अन्... चौकशीदरम्यान...
बापरे! मनीषा मंधारेला प्रश्नपत्रिका तोंडपाठ अन्... चौकशीदरम्यान....