AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“मराठी भाषा ही मुंबईचा आत्मा आहे, तो आत्मा मुंबईबाहेर जाणार नाही”; साहित्य संमेलनातच या सरकारकडून शब्द

मराठी भाषा ही मुंबईचा आत्मा आहे. त्यामुळे राज्यात आणि राज्याबाहेर होणारी मराठी साहित्य संमेलनासाठी आता सरकार मदत करणार असून ही संमेलनं सरकारने स्वतःहून घेतली पाहिजे असंही मत दीपक केसरकर यांनी व्यक्त केले आहे.

मराठी भाषा ही मुंबईचा आत्मा आहे, तो आत्मा मुंबईबाहेर जाणार नाही; साहित्य संमेलनातच या सरकारकडून शब्द
| Updated on: Feb 03, 2023 | 8:11 PM
Share

वर्धाः अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्यानिमित्ताने आज शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी बोलताना मराठी भाषेचा गौरव केला. मराठी भाषा टिकवली पाहिजे, वाढवली पाहिजे म्हणत त्यांनी मराठी साहित्य संमेलनांसाठी लागणारी अनुदानाच्या रक्कमेमध्ये वाढ केल्याचे सांगत 50 लाखांहून 2 कोटी असे अनुदान अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी देणार असल्याचे सांगितले. त्याच बरोबर मराठी भाषा भवन हे मुंबईमध्ये न होता ते नवी मुंबईमध्ये निर्माण करण्याचा विचार करण्याचा विचार सरकार करत होते.

मात्र सरकारने हा निर्णय बदलला असून मराठी भाषेसंदर्भात असलेली कार्यालये ही आता नवी मुंबईमध्ये न होता ती मुंबईमध्येच होणार असल्याचे सांगितले.

मराठी भाषा ही मुंबईचा आत्मा आहे. त्यामुळे मराठी भाषा भवन, सर्व मंडळे ही आता मुंबईमध्येच होणार असून त्याचा फायदा मराठी साहित्यिक, समीक्षक आणि अभ्यासकांना होणार असल्याचे दीपक केसरकर यांनी सांगितले.

मराठी भाषा ही मुंबईचा आत्मा आहे. त्यामुळे राज्यात आणि राज्याबाहेर होणारी मराठी साहित्य संमेलनासाठी आता सरकार मदत करणार असून ही संमेलनं सरकारने स्वतःहून घेतली पाहिजे असंही मत दीपक केसरकर यांनी व्यक्त केले आहे.

मराठी भाषा भवन हे सवोत्कृष्ट असले पाहिजे यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. त्यासाठी संबंधित कार्यालये ही मुंबईत असावी यासाठीच ते प्रयत्न केले जात आहे. त्यामुळे नवी मुंबईत होणारे कार्याल न करता ते कार्यालय आता मुंबईमध्येच केले जाणार आहे.

त्याचबरोबर निर्माण केल्या जाणाऱ्या साहित्य भवनात आणखी दोन वर्षे राहण्याची योग्य व्यवस्था, नाट्यगृह करण्यात येणार असून त्याचा लाभ लेखकांनी घ्यावा असं आवाहनही त्यानी यावेळी केले.

विश्व मराठी साहित्य संमेलनासाठी आता राज्यातील सातही मंडळे एकत्र येऊन हे साहित्य संमेलन मोठ्या उत्साहात केली जाणार आहेत. त्यासाठी आपण आतापासूनच या मंडळाच्या सर्वांना आमंत्रित करून विश्व साहित्य संमेलन मोठ्या उत्साहात करायची आहेत असंही त्यांनी यावेळी सांगितले.

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.