AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“तुम्ही मान्य करा, आमच्या चुका झाल्या”; नागपूरच्या निकालावर या नेत्यानं भाजपला टोला लगावला…

चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रतिक्रियेवर बोलतान अजित पवार यांनी मात्र कोणत्याही निवडणुकीचा निकाल लागतो. तो आपण खुल्या दिलाने मान्य केला पाहिजे, जर पराभव झाला तर आपल्या चुका झाल्या,

तुम्ही मान्य करा, आमच्या चुका झाल्या; नागपूरच्या निकालावर या नेत्यानं भाजपला टोला लगावला...
| Updated on: Feb 03, 2023 | 6:54 PM
Share

मुंबईः पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकांचा काल निकाल लागल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांकडून वेगवेगळी मत व्यक्त होत राहिली. या निवडणुकीत नाशिक आणि नागपूर मतदार संघाकडे मात्र सगळ्या राज्याचे लक्ष लागून राहिले होते. त्यातच नागपूर विभागाची जागा महाविकास आघाडीने जिंकल्यामुळे त्या ठिकाणचा पराभव हा देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांचा मानला जात आहे. त्या प्रकारची टीकाही भाजपच्या विरोधकांनी केल्या आहेत.

त्यामुळे त्यावर बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्षांनी सांगितले की, नागपूरची जागा ही भाजप लढली असती तर 100 टक्के जिंकली असती असं स्पष्ट मत चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले.

तर यावर बोलताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी म्हटले की, जो निकाल लागतो, जर अपयश आले तर ते दिलदारपणे मान्य केले पाहिजे असा टोला भाजपला अजित पवार यांनी लगावला आहे.

नागपूरच्या निकालावर बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाचा जो निकाला लागला आहे. तो निकाला देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांचा पराभव असल्याचे चित्र रंगवले जात आहे.

मात्र तसे नसून ही जागा भाजपकडून लढवली गेली असती तर मात्र त्या जागेवर भाजपचाच उमेदवार निवडून आला असता अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे.

चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रतिक्रियेवर बोलतान अजित पवार यांनी मात्र कोणत्याही निवडणुकीचा निकाल लागतो. तो आपण खुल्या दिलाने मान्य केला पाहिजे, जर पराभव झाला तर आपल्या चुका झाल्या,

त्या पुढील काळात आम्ही दुरुस्त करू आणि चुका सुधारू असंही स्पष्ट केले पाहिजे. राजकारणात जो निकाल लागेल तो मात्र आपण दिलदार पणे मान्य केलाच पाहिजे असंही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

अजितदादांचा घात की अपघात; संजय राऊतांच्या विधानाचीही चर्चा!
अजितदादांचा घात की अपघात; संजय राऊतांच्या विधानाचीही चर्चा!.
अंडर 19 वर्ल्ड कप जिंकल्यावर कॅप्टन आयुष्यच्या कुटुंबात मोठा जल्लोष
अंडर 19 वर्ल्ड कप जिंकल्यावर कॅप्टन आयुष्यच्या कुटुंबात मोठा जल्लोष.
मालेगावच्या महापौर, उपमहापौरपदाची निवडणूक संपल्यानंतर मोठी दुर्घटना
मालेगावच्या महापौर, उपमहापौरपदाची निवडणूक संपल्यानंतर मोठी दुर्घटना.
मुंबई पालिकेत 16 फेब्रुवारीला विरोधी पक्षनेता नेमणार
मुंबई पालिकेत 16 फेब्रुवारीला विरोधी पक्षनेता नेमणार.
92 वर्षाचे आजोबा आणि 90 वर्षाच्या आजीचे मतदान
92 वर्षाचे आजोबा आणि 90 वर्षाच्या आजीचे मतदान.
आम्ही अपशकुन करणार नाही! महापौरपदाबाबत किशोरी पेडणेकरांचं मोठं विधान
आम्ही अपशकुन करणार नाही! महापौरपदाबाबत किशोरी पेडणेकरांचं मोठं विधान.
सांगली बलगडवेमध्ये ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार
सांगली बलगडवेमध्ये ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार.
रितू तावडेंनी व्यक्त केला मुंबईच्या विकासाला गती देण्याचा संकल्प
रितू तावडेंनी व्यक्त केला मुंबईच्या विकासाला गती देण्याचा संकल्प.
ठाकरे गटाकडून महापौर, उपमहापौरपदाचा उमेदवार कोण? फैसला थोड्याच वेळात
ठाकरे गटाकडून महापौर, उपमहापौरपदाचा उमेदवार कोण? फैसला थोड्याच वेळात.
मालेगावच्या महापौरपदी नसरीन बानो शेख यांची निवड
मालेगावच्या महापौरपदी नसरीन बानो शेख यांची निवड.