AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“तुम्ही मान्य करा, आमच्या चुका झाल्या”; नागपूरच्या निकालावर या नेत्यानं भाजपला टोला लगावला…

चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रतिक्रियेवर बोलतान अजित पवार यांनी मात्र कोणत्याही निवडणुकीचा निकाल लागतो. तो आपण खुल्या दिलाने मान्य केला पाहिजे, जर पराभव झाला तर आपल्या चुका झाल्या,

तुम्ही मान्य करा, आमच्या चुका झाल्या; नागपूरच्या निकालावर या नेत्यानं भाजपला टोला लगावला...
| Updated on: Feb 03, 2023 | 6:54 PM
Share

मुंबईः पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकांचा काल निकाल लागल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांकडून वेगवेगळी मत व्यक्त होत राहिली. या निवडणुकीत नाशिक आणि नागपूर मतदार संघाकडे मात्र सगळ्या राज्याचे लक्ष लागून राहिले होते. त्यातच नागपूर विभागाची जागा महाविकास आघाडीने जिंकल्यामुळे त्या ठिकाणचा पराभव हा देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांचा मानला जात आहे. त्या प्रकारची टीकाही भाजपच्या विरोधकांनी केल्या आहेत.

त्यामुळे त्यावर बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्षांनी सांगितले की, नागपूरची जागा ही भाजप लढली असती तर 100 टक्के जिंकली असती असं स्पष्ट मत चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले.

तर यावर बोलताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी म्हटले की, जो निकाल लागतो, जर अपयश आले तर ते दिलदारपणे मान्य केले पाहिजे असा टोला भाजपला अजित पवार यांनी लगावला आहे.

नागपूरच्या निकालावर बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाचा जो निकाला लागला आहे. तो निकाला देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांचा पराभव असल्याचे चित्र रंगवले जात आहे.

मात्र तसे नसून ही जागा भाजपकडून लढवली गेली असती तर मात्र त्या जागेवर भाजपचाच उमेदवार निवडून आला असता अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे.

चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रतिक्रियेवर बोलतान अजित पवार यांनी मात्र कोणत्याही निवडणुकीचा निकाल लागतो. तो आपण खुल्या दिलाने मान्य केला पाहिजे, जर पराभव झाला तर आपल्या चुका झाल्या,

त्या पुढील काळात आम्ही दुरुस्त करू आणि चुका सुधारू असंही स्पष्ट केले पाहिजे. राजकारणात जो निकाल लागेल तो मात्र आपण दिलदार पणे मान्य केलाच पाहिजे असंही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

Follow Us
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर....
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर.....
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह.
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण.
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?.
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.