AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Wardha Crime | वर्धा प्रशासन अलर्ट मोडवर, 320 सराईत गुन्हेगार 7 दिवसांसाठी हद्दपार; शांतता राखण्याचा प्रयत्न

आगामी सण, उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी वर्धा जिल्ह्यातील 320 गुन्हेगार सात दिवसाकरिता हद्दपार करण्यात आले. कलम 144 अंतर्गत ही कारवाई करण्यात आली. त्यामुळं सराईत गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.

Wardha Crime | वर्धा प्रशासन अलर्ट मोडवर, 320 सराईत गुन्हेगार 7 दिवसांसाठी हद्दपार; शांतता राखण्याचा प्रयत्न
वर्धा प्रशासन अलर्ट मोडवरImage Credit source: tv 9
| Edited By: | Updated on: Apr 29, 2022 | 7:16 AM
Share

वर्धा : धार्मिक स्थळांवरील भोंग्यावरून राजकीय वातावरण (Political Environment) तापत चालले आहेत. हनुमान चालिसा वाचनावरून अमरावतीतील राणा दाम्पत्यांना जेलची हवा खावी लागली. अशावेळी वर्धा हा बापूंचा जिल्हा. महात्मा गांधी यांचं सेवाग्रामसारखं आश्रम इथं आहे. विनोबा भावेंच्या पावन स्पर्धानं हा जिल्हा पुनित झाला आहे. विनोबा भावेंचं पवनार इथं आश्रम आहे. असं असताना काही गुंड प्रवृत्तीचे लोकं जिल्ह्यात अशांतता पसरविण्याचा प्रयत्न करतात. अशावेळी जिल्हा शांत कसा राहील, याची जबाबदारी प्रशासनावर असते. ही शांतता आबादित ठेवण्यासाठी प्रशासनाला (Administration) महत्त्वाची भूमिका पार पाडावी लागते. या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे. धार्मिक स्थळांवरील भोंग्यांची माहिती संकलीत करण्याचे काम सुरू आहे. आगामी सण, उत्सव काळादरम्यान शहरासह जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था राहण्यासाठी जिल्हा पोलीस विभागाने (District Police Department) जिल्ह्यातील तब्बल 320 सराईत गुन्हेगारांना वर्धा जिल्ह्यातून 7 दिवसांसाठी हद्दपार केल्याची माहिती आहे.

सणानिमित्त शांतता कायम राहावी

मागील वर्षी पोलीस विभागाने 200 गुन्हेगारांना हद्दपार केले होते. आगामी रमजान ईद या सणानिमित्त सामाजिक शांतता धोक्यात येऊ नये, म्हणून पोलीस विभागाने यंदा तब्बल 320 सराईत गुन्हेगारांच्या हद्दपारीचे आदेश उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडे पाठविले होते. उपविभागीय महसूल अधिकारी यांनी गुन्हेगारांना 1 ते 7 मे या सात दिवसांसाठी हद्दपार केले आहे.

वर्धा उपविभागाचे 110 गुन्हेगार

आगामी सण, उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी वर्धा जिल्ह्यातील 320 गुन्हेगार सात दिवसाकरिता हद्दपार करण्यात आले. कलम 144 अंतर्गत ही कारवाई करण्यात आली. त्यामुळं सराईत गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत. गुन्हेगारांमध्ये वर्धा उपविभागाचे 110, हिंगणघाट उपविभागाचे 90, आर्वी उपविभागाचे 60 तर पुलगाव उपविभागाच्या 60 गुन्हेगारांचा समावेश आहे.

Follow Us
जा सिमरन जा… या आयकॉनिक सीनचं लोकेशन पर्यटनस्थळ करा; अनुपम खेर भावूक..
जा सिमरन जा… या आयकॉनिक सीनचं लोकेशन पर्यटनस्थळ करा; अनुपम खेर भावूक...
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरणी महत्त्वाची सुनावणी, जामिन अर्जाबाबत...
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरणी महत्त्वाची सुनावणी, जामिन अर्जाबाबत....
उष्णतेने नंदुरबार होरपळलं; तापमानाचा पारा 45.5 अंशावर
उष्णतेने नंदुरबार होरपळलं; तापमानाचा पारा 45.5 अंशावर.
सुनेत्रा पवारांचा रायगडकरांना शब्द; अजित दादांची उणीव भरून निघणार नाही
सुनेत्रा पवारांचा रायगडकरांना शब्द; अजित दादांची उणीव भरून निघणार नाही.
ट्रॅव्हल जिहाद विरोधात संग्राम जगताप आक्रमक
ट्रॅव्हल जिहाद विरोधात संग्राम जगताप आक्रमक.
राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका, फडणवीसांचे सडेतोड उत्तर, म्हणाले....
राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका, फडणवीसांचे सडेतोड उत्तर, म्हणाले.....
निदा खान ही इम्तियाज जलील यांची नातलग, अशा अनेक निदा महाराष्ट्रभर...
निदा खान ही इम्तियाज जलील यांची नातलग, अशा अनेक निदा महाराष्ट्रभर....
जनतेला नियम आणि स्वतःला सूट?; मोदींच्या बचत आवाहनावर दमानिया आक्रमक
जनतेला नियम आणि स्वतःला सूट?; मोदींच्या बचत आवाहनावर दमानिया आक्रमक.
मोठी बातमी! आणखी एक MIM नेता कचाट्यात, गोवंश तस्करी प्रकरणी 3 लाख...
मोठी बातमी! आणखी एक MIM नेता कचाट्यात, गोवंश तस्करी प्रकरणी 3 लाख....
पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर राहुल गांधी आक्रमक; थेट म्हणाले. हे...
पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर राहुल गांधी आक्रमक; थेट म्हणाले. हे....