AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेताला आले तलावाचे स्वरूप; पिके पाण्याखाली, कसे निघणार उत्पादन?

मागील पाच दिवसांपासून तालुक्यात सुरु असलेल्या पावसाचा हाहाकार वाढला आहे. सलग तिसऱ्या दिवशीही जोरदार पाऊस बरसल्याने धरणे तुडूंब भरलीत.

शेताला आले तलावाचे स्वरूप; पिके पाण्याखाली, कसे निघणार उत्पादन?
| Edited By: | Updated on: Jul 25, 2023 | 5:06 PM
Share

वाशिम : वाशिमच्या रिसोड तालुक्यातील केनवड, गणेशपूर, जोगेश्वरी, कोयाळी जाधव, नेतंसा, नावली, जांब, गोवर्धन, कळम गव्हाणसह अनेक ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस काल सायंकाळी पडला. या पावसामुळे शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालंय. शेकडो हेक्टर क्षेत्रातील सोयाबीन, कपाशी, तूर पिके पाण्याखाली गेलीत. काही गावामध्ये शेतीसह सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले. काही ठिकाणी जमिनी खरडून गेल्यात. त्यामुळे शेतीच मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रिसोड तालुक्यात हजारो हेक्टर शेतीचे नुकसान झाले. नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करून मदत करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

धरणे तुडूंब भरली

वाशिमच्या रिसोड तालुक्यामध्ये काल सायंकाळपासून संततधार आणि मुसळधार पाऊस सुरू होता. त्यामुळे तालुक्यातील बहुतांश नदी, नाल्यांना पूर आला. अनेक गावं संपर्क क्षेत्राच्या बाहेर गेलीत. शेतात पाणी साचल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. मागील पाच दिवसांपासून तालुक्यात सुरु असलेल्या पावसाचा हाहाकार वाढला आहे. सलग तिसऱ्या दिवशीही जोरदार पाऊस बरसल्याने धरणे तुडूंब भरलीत. धरणाच्या पाण्यामुळे तालुक्यातील नदी, नाल्यांना पूर आल्याने अनेक गावे बाधित झालीत.

जमिनी खरडल्या

केनवड, गणेशपूर, कुकसा, जोगेश्वरी, कोयाळी, जांब, कळमगव्हान, नंधाना, गोवर्धन, मांगुळ, नेतन्सा या गावांच्या नदीच्या पाणी पत्रात वाढ झाली. काही गावांचा संपर्क तुटला. नदी, नाल्यांच्या पाण्यात वाढ झाल्याने पाणी शेतात घुसले. पिकांचे आणि शेतीचे मोठे नुकसान झाले. त्यातील पाण्याचा विसर्ग लगतच्या नाल्यात झाला. केनवड गावाच्या काही नदीकाठच्या भागात पाणी शिरले. बहुतांश जमिनी खरडून गेल्या. पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

नदी, नाल्यांना पूर

रिसोड तालुक्यात खरीप हंगामातील पेरण्या उशिराने सुरू झाल्या. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यातील अल्पशा पावसाच्या भरोवशावर शेतकऱ्यांनी पेरणी आटोपली. त्यानंतर पावसाने वेळोवेळी हजेरी लावली. पिके अंकुरल्याने शेतकरी सुखावला गेला. यानंतर काल सायंकाळी मुसळधार पावसामुळे नदी, नाल्यांना पूर आला.

नुकसानभरपाईची मागणी

शेतकऱ्यांच्या शेतात पुराचे पाणी शिरल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले. जोरदार पावसामुळे नदीकाठच्या गावात आणि शेतात पाणी साचल्याने शेतांना तलावांची स्वरूप आले आहे. जनजीवन विस्कळीत झाले आहे. शासनाने नुकसानग्रस्त भागाची पाहणी करावी. सरसकट पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी विठ्ठल खराटे, संदीप गोळे, विकास खराटे, आणि संजय गोळे यांनी केली आहे.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.