अजितदादांच्या विमान अपघातादिवशी नेमकं काय घडलं? रोहित पवारांनी प्रत्येक मिनिटाची दिली माहिती

Rohit Pawar On Ajit Pawar Death : अजित दादांच्या अपघातावर अनेक नेत्यांनी शंका उपस्थित केली आहे. आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले आहे. याबाबत माहिती जाणून घेऊयात.

अजितदादांच्या विमान अपघातादिवशी नेमकं काय घडलं? रोहित पवारांनी प्रत्येक मिनिटाची दिली माहिती
Rohit Pawar press Ajit Pawar
Image Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Feb 10, 2026 | 4:41 PM

अजित पवार यांचे 28 जानेवारीला बारातमीजवळ विमान अपघातात निधन झाले. या घटनेमुळे संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली होती. अजित दादांच्या अपघातावर अनेक नेत्यांनी शंका उपस्थित केली आहे. अशातच आज अजित पवार यांचे पुतणे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले आहे. रोहित पवार यांनी अपघाताच्या दिवशी नेमकं काय घडलं याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

दादा कुठे बसले होते?

रोहित पवार यांनी म्हटले की, दादांचा मुंबई ते बारामती प्रवास. 210 किलोमीटर, 27 मिनिट लागणार होतं. व्हिएसआर नावाच्या कंपनीचं विमान होतं. अमेरिकेत विमान तयार झालं. विमानात लेफ्ट साईटला दादा बसले असावेत. दुसऱ्या सेक्शनमध्ये बॅगा होत्या. पाठी मागे. पेट्रोलच्या टाक्या आहेत. या कंपनीची लेअरजेटच्या बाबत त्यांची देशात मोनोपॉली आहे. सर्वाधिक लेअरजेटची विमाने त्यांच्याकडे आहे.

अपघाताच्या दिवशी काय घडलं?

दादांच्या अपघाताच्या दिवशी 7 वाजून 2 मिनिटाला क्रूर पोहोचले. कॅप्टनने चेक केलं. बारामती एअरपोर्टला फोन केला असेल. व्हिजीबिलीटी आहे का विचारलं. 7 वाजून 10 मिनिटाने ओकेचा मेसेज आला. दादांचे पीसए विदीप जाधव आले. दादा 7.30 वाजता पोहोचले. विमानाने उड्डाण केले. 8.22 ला विमान लोणावळा. 8.25 वाजता पुण्याजवळ, 8.30 वाजता यवतला. 8.32 ला सुपेजवळ पोहोचले. त्यानंतर 8.43 ते 8.45 दरम्यान अपघात होता. 9 वाजता दादा जखमी असल्याची बातमी आली. पण 9.45 वाजता दादा गेल्याची बातमी आली. त्यामुळे मन आणि डोकं सुन्न झालं.

16 वर्षे जुनं विमान होतं

पुढे बोलताना रोहित पवार म्हटले की, विमानाचं अॅप आहे. युनिव्हर्सल अॅप आहे. त्यात गेल्यावर किती वर्षापूर्वीचं विमान होतं हे कळतं. हे विमान 16 वर्षापूर्वीचं आहे. 25 आणि 26 ला हे विमान सुरतला जाऊन आलं होतं. कंपनीचे मालक सिंग म्हणाले, विमान चांगल्या स्थितीत होते. मेंटेन होते. वैमानिक अनुभवी आहे. अपघात व्हिजिबिलीटीमुळे झाल्याची शक्यता आहे. गावाच्या वरून विमान गेलं तेव्हा लोकांनी सांगितले की आवाज वेगळा येत होता. म्हणजे मेंटेनन्समध्ये प्रॉब्लेम असेल. विमान आलं टिल झालं आणि पडलं. हे सीसीटीव्ही फुटेजमधून दिसलं असंही रोहित पवार म्हणाले.