AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PM Modi in Vidarbha : विदर्भातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांबद्दल पीएम मोदी नेमकं काय बोलले?

PM Modi in Vidarbha : "आम्ही याच वर्षी फ्रान्समध्ये वर्ल्ड स्कीलवर आयोजन झालं. त्यात आम्ही कारागिरांना पाठवलं होतं. या परिषदेत भारताने अनेक पुरस्कार मिळवले आहेत. आपण ऑलिम्पिकची चर्चा करतो. पण हे महत्त्वाचं आहे" असं पीएम मोदी म्हणाले.

PM Modi in Vidarbha : विदर्भातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांबद्दल पीएम मोदी नेमकं काय बोलले?
PM Narendra ModiImage Credit source: PTI
| Updated on: Sep 20, 2024 | 1:57 PM
Share

“विश्वकर्माच्या लाभार्थ्यांनी मोठ्या उद्योग समूहाशी निगडीत व्हावं, हे आमचं लक्ष्य आहे. जो वर्ग आर्थिक प्रगतीत मागे होता. तो जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका पार पाडेल. सरकारची स्कील मिशन त्यांना सशक्त करत आहे. कौशल्य विकास अभियानाने भारताच्या स्कीलला जगात ओळख निर्माण करून दिली आहे” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. “आमचं सरकार आल्यावर, आम्ही वेगळं स्कील मंत्रालय तयार केलं आहे. आम्ही याच वर्षी फ्रान्समध्ये वर्ल्ड स्कीलवर आयोजन झालं. त्यात आम्ही कारागिरांना पाठवलं होतं. या परिषदेत भारताने अनेक पुरस्कार मिळवले आहेत. आपण ऑलिम्पिकची चर्चा करतो. पण हे महत्त्वाचं आहे” असं पीएम मोदी म्हणाले. विश्वकर्मा योजनेच्या पहिल्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमाला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केलं. ते वर्ध्यामध्ये बोलत होते.

“महाराष्ट्रात मोठी संधी आहे. काँग्रेस आणि नंतर महाआघाडी सरकारने कापसाला महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची ताकद वाढवण्याऐवजी त्यांना खाईत ढकललं. ते केवळ शेतकऱ्यांच्या नावावर राजकारण आणि भ्रष्टाचार करत राहिले. समस्याचं समाधान करण्यासाठी फडणवीस यांचं सरकार आलं तेव्हा टेक्स्टाईलला गती मिळाली. नांदेडमध्ये टेक्स्टाईल पार्क आलं. त्यावेळी त्या ठिकाणी कोणतेही उद्योग येत नव्हते. आता तोच भाग राज्यातील मोठं औद्योगिक केंद्र होत आहेत” असं नरेंद्र मोदी म्हणाले.

मोदींच व्हिजन काय?

“आम्ही देशभरात सात पीएम मित्र पार्क स्थापन करणार आहोत. आमचं व्हिजन फार्म टू फायबर, फॅब्रिक टू फॅशन, फॅशन टू फॉरेन. म्हणजे विदर्भातील कापासापासून हायकॉलिटी फॅब्रिक बनेल. तसेच इथेच फॅशननुसार कपडे तयार करू. परदेशात ते पाठवू. पीएम मित्र पार्कमुळे 8 ते 10 हजार कोटीची गुंतवणूक होणार आहे. त्यामुळे 1 लाखाहून अधिक रोजगार निर्माण होतील. दुसऱ्या उद्योगांनाही चालना मिळेल” असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

Follow Us
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोप
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोपांनी खळबळ!
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटा
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटांच्या चर्चेत... पहिली प्रतिक्रिया समोर
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी धर्मांतरण प्रकरणी मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?
लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
Mayank Lohar | लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
धक्कादायक! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट
Shirdi | साईबाबांच्या नगरीत धक्कादायक खुलासा! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट पेढे...
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णय
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाची चर्चा
स्वार्थासाठी गेले, जनता हिशोब चुकता करणार! नाईकांचा खासदारांना इशारा
Vaibhav Naik | स्वार्थासाठी गेले, आता जनता हिशोब चुकता करणार! वैभव नाईकांचा फुटीर खासदारांना इशारा
विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट
Beed | विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट निर्णय घेतला; लवकरच...
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं!
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं! त्या वादाला आता नवं वळण!
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता बड्या नेत्याचं विधान चर्चेत