AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तानवर लष्करी कारवाई कधी होणार? निवृत्त कर्नल अभय पटवर्धन यांनी सांगितले…

Pahalgam Attack: आता भारताने कूटनीतीचा अवलंबन केला पाहिजे. भारतात असलेल्या विविध देशांच्या राजदूतांना पहलगाव हल्ल्याची माहिती दिली पाहिजे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याचे परिणाम कळतील.

पाकिस्तानवर लष्करी कारवाई कधी होणार? निवृत्त कर्नल अभय पटवर्धन यांनी सांगितले...
Pahalgam Attack
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Apr 24, 2025 | 4:13 PM
Share

पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात देशभरातून आलेल्या २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. त्या हल्ल्यानंतर गुरुवारी बिहारमधून बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानचे नाव न घेता कठोर संदेश दिला. कल्पनासुद्धा करणार नाही, अशी शिक्षा दहशतवाद्यांना आणि दहशतवाद्यांचा कट रचणाऱ्यांना होणार असल्याचे मोदी यांनी सांगितले. निवृत्त कर्नल अभय पटवर्धन यांनी भारताची एअर स्पेस पाकिस्तानसाठी बंद करण्याचे सूचवले. लष्करी कारवाई कधी होईल? त्याबाबतही त्यांनी मत व्यक्त केले.

निवृत्त कर्नल अभय पटवर्धन यांनी सांगितले की, आता भारताने कूटनीतीचा अवलंबन केला पाहिजे. भारतात असलेल्या विविध देशांच्या राजदूतांना पहलगाव हल्ल्याची माहिती दिली पाहिजे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याचे परिणाम कळतील. आंतरराष्ट्रीय जनमत आपल्याकडे येईल. त्यामुळे जेव्हा भारत लष्करी कारवाई करणार, तेव्हा ते भारताच्या बाजूने राहतील किंवा ते आपल्या निर्णयावर ठाम राहतील, असे निवृत्त कर्नल अभय पटवर्धन यांनी स्पष्ट केले.

निवृत्त कर्नल अभय पटवर्धन यांनी पाकिस्तानला सरळ करण्यासाठी आणखी एक उपाय सांगितला. ते म्हणाले की, भारताची एअर स्पेस आता पाकिस्तानला वापरु देऊ नये. त्यांना जेव्हा भारताची स्पेस मिळणार नाही, तेव्हा त्यांना श्रीलंकेला वळसा घालून जावे लागेल. त्यांच्यासाठी ते परवडणार नाही. त्याचा मोठा परिणाम त्यांच्यावर होईल. पाकिस्तान नेमके काय करत आहे, हे आंतरराष्ट्रीय स्तरावर कळायला पाहिजे. लष्करी कारवाई जेव्हा होईल, तेव्हा होईल. ते कशी होईल, ते सुद्धा येणारा काळातच कळेल, असे निवृत्त कर्नल अभय पटवर्धन यांनी सांगितले.

निवृत्त कर्नल अभय पटवर्धन पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकारने उचलेल्या निर्णयांचे कौतूक केले. भारताने सिंधु पाणी वाटप करार रद्द केला. हा चांगला निर्णय आहे. 1960 च्या नंतर प्रथमच असा निर्णय घेण्यात आलेला आहे. या निर्णयाचा परिणाम किती होईल, हे आता सांगता येणार नाही. मात्र पाकिस्तानमध्ये गहू आणि मक्याचे ज्या ठिकाणी पीक घेतले जाते, त्या ठिकाणी त्यांना पाण्याची गरज असते. परंतु आता त्यांचे पीक कापणीवर आले असल्याने सध्या त्याचा परिणाम होणार नाही. मात्र पुढील हंगामात त्याचा परिणाम दिसून येईल.

करतारपूर कॉरिडॉर बंद केला. त्याचा परिणाम फारसा होणार नाही. कारण त्यांचे लोक आपल्याकडे येत होते आणि आपल्याकडील शीख बांधव तिकडे जात होते, असे वाटत नाही, असे मत निवृत्त कर्नल अभय पटवर्धन यांनी व्यक्त केले.

Follow Us
आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
Poladpur | आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा मामांना टोला
Jayant Patil | आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा दत्ता मामांना टोला; महिला शेतकरी विधेयकावर खडाजंगी
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा पवारांना फोन; भेटून सविस्तर बोलू..
राजकारणात नवा ट्विस्ट! शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा शरद पवारांना फोन; उद्या भेटून सविस्तर बोलू...
मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची...
Ashwini Bhide | मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची मागणी; BMCवर संताप
महाराष्ट्र एपस्टीन फाईलवरून वाद! रुपाली चाकणकरांचा थेट कायदेशीर इशारा
Rupali Chakankar | महाराष्ट्र एपस्टीन फाईलवरून मोठा वाद! रुपाली चाकणकरांचा थेट कायदेशीर इशारा; दीपाली सय्यद अडचणीत?
रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड काय झाली चर्चा?
मोठी बातमी! रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड नेमकी काय झाली चर्चा?
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत...नेमकं काय घडलं?
मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
Kishori Pednekar | मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? मॅनहोलमध्ये पडून मृत्यू; BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...नेमकं काय घडतंय?