AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संतोष देशमुखांच्या कुटुंबाची भेट का घेतली नाही? अखेर पंकजा मुंडेंनी सांगितलं कारण

संतोष देशमुख यांच्या हत्येला आता महिनाभरापेक्षा अधिक काळ झाला आहे, मात्र पंकजा मुंडे यांनी देशमुख यांच्या कुटुंबाची अजूनही भेट घेतलेली नाही, यामागचं कारण आता समोर आलं आहे.

संतोष देशमुखांच्या कुटुंबाची भेट का घेतली नाही? अखेर पंकजा मुंडेंनी सांगितलं कारण
| Updated on: Jan 21, 2025 | 6:44 PM
Share

बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या करण्यात आली.  या घटनेनंतर राज्यातलं वातावरण चांगलंच तापलं आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सात आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे, तर एक फरार आहे. वाल्मिक कराडवर देखील मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. संतोष देशमुख हत्याप्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी राज्यभरात आक्रेश मोर्चाचं आयोजन करण्यात येत आहे.

दरम्यान या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची देखील मागणी करण्यात आली आहे. भाजप आमदार सुरेश धस यांनी सुरुवातीपासूनच या प्रकरणात आक्रमक भूमिका घेतली आहे. संतोष देशमुख यांची हत्या होऊन महिना उलटला तरी पंकजा मुंडे यांनी देशमुख कुटुंबाची भेट घेतली नाही, यावरून सुरेश धस यांनी पंकजा मुंडे यांच्यावर निशाणा साधला होता. अखेर आपण संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची भेट का घेतली नाही, याबाबत स्वत: मंत्री पंकजा मुंडे यांनी मोठा खुलासा केला आहे.

नेमकं काय म्हणाल्या पंकजा मुंडे? 

संतोष देशमुख यांच्या कुटुंबाच्या विनंतीवरूनच मी मस्साजोगमध्ये गेले नाही.  त्यांनीच मला विनंती केली ताई तुम्ही इथे येऊ नये,  इथलं वातावरण बरोबर नाही. आता त्यांची परवानगी घेऊनच मी तिथे जाणार आहे, असं मी आधीच जाहीर केलं आहे. माझ्या जाण्यापेक्षा न्याय तीथे आधी गेला पाहिजे, त्यांना भेटणं संतोष देशमुख यांच्या मृत्यूबद्दल संवेदना व्यक्त करणं हा माझा सर्वस्वी वैयक्तिक निर्णय आहे, त्याचं प्रदर्शन मांडणं योग्य नाही, असं पकंजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान पकंजा मुंडे यांच्या या वक्तव्यावर संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. आमच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे, व्यक्त होता येत नाही. मात्र पंकजा ताई जे बोलत आहेत, त्याबद्दल त्यांचं आणि वहिणींचं बोलणं झालं होतं असा खुलासा धनंजय देशमुख यांनी केला आहे.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.