AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raj Thackeray Aurangabad : शिवसेनेचे लोक सभेत घुसतील आणि मर्यादा मोडल्याचे गुन्हे दाखल करतील, लोकांच्या मर्यादेवरून मुनगंटीवारांचा टोला

या सभेची मर्यादा तोडण्यासाठी शिवसेनेचे (Shivsena) लोक घुसतील आणि पुन्हा लोकांची मर्यादा तोडल्याच्या तक्रारी दाखल करतील अशी शंका भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी व्यक्त केली आहे. तसेच सामनावरही मुनगंटीवारांनी सडकडून टीका केली आहे.

Raj Thackeray Aurangabad : शिवसेनेचे लोक सभेत घुसतील आणि मर्यादा मोडल्याचे गुन्हे दाखल करतील, लोकांच्या मर्यादेवरून मुनगंटीवारांचा टोला
शिवसेनेचे लोक सभेत घुसतील आणि मर्यादा मोडल्याचे गुन्हे दाखल करतील, लोकांच्या मर्यादेवरून मुनगंटीवारांचा टोलाImage Credit source: tv9
| Edited By: | Updated on: Apr 29, 2022 | 8:53 PM
Share

यवतमाळ : राज ठाकरेंची (Raj Thackeray) सभा औरंगाबादेत जरी होणार असली तरी या सभेने राज्याचे राजकारण ढवळून निघालंय. या सभेला एकीकडून जोरदार विरोध होतोय, तर दुसरीकडून समर्थनही मिळत आहे. भाजप नेत्यांचा सूर या सभेच्या बाजुनेच आहे. आता भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी या सभेच्या मर्यादेवरून पुन्हा शिवसेनेला टोलेबाजी केली आहे. या सभेची मर्यादा तोडण्यासाठी शिवसेनेचे (Shivsena) लोक घुसतील आणि पुन्हा लोकांची मर्यादा तोडल्याच्या तक्रारी दाखल करतील अशी शंका भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी व्यक्त केली आहे. तसेच सामनावरही मुनगंटीवारांनी सडकडून टीका केली आहे. दैनिक सामना हे वर्तमानपत्र कायद्या खाली रजिस्टर जरी असले तरी ते शिवसेनेचे पॉम्पलेट आहे, अशी खोचक टीका सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. त्यामुळे आता शिवसेना खासदार संजय राऊत यावर जोरदार पलटवार करण्याची शक्यता आहे.

किती लोकं येणार, कसं सांगणार?

राज ठाकरेंच्या सभेसाठी पंधरा हजार मर्यादा घालून दिली आहे, त्याबाबत बोलताना मुनगंटीवार म्हणाले, कोणी सभेला यावं हे विचित्र कथा आहे. अजब सरकारची गजब कहाणी आहे. जेव्हा सभा घेतो सभेला तेव्हा आपण निमंत्रण पत्रिका पाठवत नाही. एखद्या थेटरची तिकीट काढतो. तसे नाही. उद्या हा नियम मोडायला सभेत शिवसैनिक जातील आणि वरून आरोप की आम्ही जो नियम घातला, तो मोडला गुन्हा दाखल करा. असे कधी असते का? असा सवाल मुनगंटीवार यांनी विचारला आहे.

हा विश्वासघातकी दिवस

तर परवानगी देताना तुम्ही शब्दांबाबात बोलू शकता, भाषणाची परवानगी, स्वातंत्र्यांचा अपवाद आहे. त्याबद्दल बोलले पाहिजे. पण 15 हजार लोकांना परवानगी हे कोणाच्या हातात आहे? कोण येईल हे सांगू शकतो का?, हे सरकार विचित्र विरहाचे सरकार आहे. या ठिकाणी राजकारणाचा निम्न स्थर सुरू आहे, अशी टीकाही मुनगंटीवर यांनी केली आहे. तसेच. 28 नोव्हेंबर हा विश्वासघात दिवस करावा लागेल , 28 नोव्हेंबर 2019 ला बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराशी प्रतारणा करत, शिवसेना काँग्रेससोबत गेली. मात्र बाळासाहेब सांगायचे काँग्रेससोबत गेल्यास दुकान बंद करेल, असा टोलाही मुनगंटीवीरांनी शिवसेनेला लगावला आहे.

संजय राऊत यांचाही समाचार

सामना या वृत्तपत्रावर टीका करताना मुनगंटीवर म्हणाले. या पॉम्पलेटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चूक काढणे ही त्यांची सवय जडली आहे. त्याचे व्यसन आहे. व्यसनाला काय उत्तर आहे? जगभर या देशाचा कौतुक करताना मोदींच्या सन्मानeर्थ गौरव होतो. ज्या शब्दाचा उपयोग होतो. या देशाच्या लोकांना त्याचा अभिमान आहे, मात्र मुंबईच्या शिवसेनेच्या एका पॉम्पलेटमध्ये जागा नसेल त्यावर भाष्य करणे प्रतिक्रिया करणे आवश्यकता नाही, असा टोलाही त्यांनी राऊतांना लगावला आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.