AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Yavatmal : यवतमाळमधील किडनीग्रस्त गावाची धक्कादायक कहाणी, जलशुद्धीकरण यंत्रणा दीड वर्षांपासून बंद, कधी जाग येणार?

हा गट ग्रामपंचायतीत सेवानगर बंजारा तांडा समाविष्ट आहे. गावची लोकसंख्या जवळपास सात हजार एवढी आहे. मात्र, हे गाव पाण्याची विपुलता असूनही फ्लोराईड क्षारयुक्त पाण्यामुळे शापित ठरले. सरकारी नोंदीनुसार या गावातील जवळपास40 किडनीग्रस्त रुग्ण दगावले.

Yavatmal : यवतमाळमधील किडनीग्रस्त गावाची धक्कादायक कहाणी, जलशुद्धीकरण यंत्रणा दीड वर्षांपासून बंद, कधी जाग येणार?
यवतमाळमधील किडनीग्रस्त गावाची धक्कादायक कहाणीImage Credit source: tv9
| Edited By: दादासाहेब कारंडे | Updated on: Jun 03, 2022 | 11:41 PM
Share

यवतमाळ : फ्लोराईड क्षारयुक्त अशुद्ध पेयजलामुळे (Water Issue) संपूर्ण महाराष्ट्रात किडनीग्रस्त (Kidney) गाव म्हणून महागाव तालुक्यातील वडदला ओळखलं जात आहे. माजीमंत्री मनोहर नाईक यांच्या निधीतून उभारण्यात आलेली वडद (ब्रह्मी) व सेवादासनगर येथील दोन जलशुद्धीकरण (Water Purification) यंत्रणा दीड वर्षांपासून बंद आहे. गावकऱ्यांना शुद्ध पाणी मिळत नसल्याने त्यांना किडनी आजाराच्या मरण यातना सहन करत जीवन जगावे लावत आहे. पुसद विधानसभासभा मतदारसंघातील वडद हे घनदाट जंगलाला लागून असलेले आदिवासीबहुल गाव आहे. हा गट ग्रामपंचायतीत सेवानगर बंजारा तांडा समाविष्ट आहे. गावची लोकसंख्या जवळपास सात हजार एवढी आहे. मात्र, हे गाव पाण्याची विपुलता असूनही फ्लोराईड क्षारयुक्त पाण्यामुळे शापित ठरले. सरकारी नोंदीनुसार या गावातील जवळपास40 किडनीग्रस्त रुग्ण दगावले.

पैसे मोजून पाणी आणायची वेळ

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मनीष जाधव यांनी हा लोकांच्या जीवनमरणाचा प्रश्‍न तत्कालीन मंत्री मनोहर नाईक यांच्यासमोर मांडला होता. त्यांनी तत्परतेने लक्षावधी रुपयांचा निधी आरओ यंत्रणा उभारण्यासाठी उपलब्ध करून दिला. यातून आरओ यंत्रणेतील सुविधा असलेले पहिले गाव वडद ठरले. ही आरओ यंत्रणा दुरुस्तीअभावी ठप्प झाली आहे. त्यामुळे पुन्हा फ्लोराईडयुक्त दूषित पाणी पिण्याची पाळी नागरिकांवर आली आहे. सद्य:स्थितीत नागरिक दहा लिटरच्या कॅनला 20 रुपये मोजून ब्रह्मी गावातून पिण्याचे पाणी आणत आहेत.

प्रत्यक्षात दुरुस्तीचे काम अर्धवटच

सरपंच स्वाती भारत पडघने यांनी सरपंच पदाचा प्रभार नव्याने हाती घेतल्यानंतर बंद पडलेली आरओ यंत्रणा सुरू करण्यासाठी पाठपुरावा सुरू केला. ही यंत्रणा दुरुस्त करण्यासाठी ग्रामसेवकांनी परस्पर एजन्सीला काम दिलेले होते. प्रत्येकी तीन लाखांचे दोन धनादेश या एजन्सीला देण्यात आले. प्रत्यक्षात दुरुस्तीचे काम अर्धवटच आहे. नागरिकांना शुद्ध पेयजल उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी जिल्हाधिकारी तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी यांना सरपंच स्वाती पडघने यांनी केली आहे.

अनेक नागरिकांना किडनीचे आजार

गावात शुद्ध पाणी नसल्याने अनेकांना किडनी आजार जडला आहे. पाण्याच्या नमुन्यांची तपासणी केली जात नाही. आता पर्यंत40लोकांचा किडनी आजाराने मृत्यू झाला आहे. आरओ प्लांट बंद आहे. गावातील लोकांना किडनीचा आजार आहे. मलाही हाच त्रास आहे. पाण्यात क्षार आहे. भावाचा किडनी आजाराने मृत्यू झाला. जलशुद्धीकरण यंत्र बंद आहे. पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळत नाही. गावात 70 टक्के रुग्ण गंभीर आहेत.

आरोग्य अधिकारी काय म्हणतात?

दोन पद्धतीने सहा महिन्याला पाण्याची तपासणी केली जाते. फ्लोराईडयुक्त पाण्याचे स्रोत आढळून आल्यास पाण्याची पर्यायी व्यवस्था केली जाते. गावात किडनीचे रुग्ण आढळून येते असल्यास तालुका आरोग्य अधिकारी यांची टीम पाठवण्यात येईल. किडनीच्या आजाराचा नेमका शोध घेण्यात येईल. मेडिकलमध्ये अथवा बोगस डॉक्टरकडे जाऊन कुणीही औषधी घेऊ नये. असे आवाहन जिल्हा आरोग अधिकारी यांनी केले आहे.

Follow Us
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?