AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Yavatmal News : खदाणीजवळील दुचाकीवर तिघांचे कपडे, चप्पल; शोध घेताच कळालं की,…

शनिवारी दुपारची ही घटना. निसर्गरम्य स्थळ असल्याने ते काही वेळ तिथचं बसून राहिले. पोहण्यासाठी तिघेही युवक खदाणीत उतरले. त्यांनी आपले कपडे आणि चपला दुचाकीवर ठेवल्या.

Yavatmal News : खदाणीजवळील दुचाकीवर तिघांचे कपडे, चप्पल; शोध घेताच कळालं की,...
Image Credit source: socialmedia
| Updated on: Sep 03, 2023 | 3:31 PM
Share

विवेक गावंडे, यवतमाळ, ३ सप्टेंबर २०२३ : वणी येथील तीन युवक दुचाकीने वांजरी भागात गेले. वांजरी गावालगत खदाणी आहेत. त्या खदाणींमध्ये सध्या पाणी साचले आहे. पाणी पाहून युवकांना पाण्यात डुबण्याचा मोह झाला. शनिवारी दुपारची ही घटना. निसर्गरम्य स्थळ असल्याने ते काही वेळ तितचं बसून राहिले. पोहण्यासाठी तिघेही युवक खदाणीत उतरले. त्यांनी आपले कपडे आणि चपला दुचाकीवर ठेवल्या. पाण्याचा अंदाज न आल्याने ते तिघेही पाण्याखाली बुडाले. मात्र आजूबाजूला कोणीही नसल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सायंकाळी दुचाकीवर तिघांचे कपडे, चप्पल आढळले. प्रत्यक्षदर्शीच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. घटना ग्रामस्थांना कळाली. घटनास्थळी मोठी गर्दी झाली. याप्रकरणी पोलिसांना कळविण्यात आले.

तिघांचेही मृतदेह सापडले

ठाणेदार अजित जाधव यांनी घटनेची तीव्रता लक्षात घेत तातडीने पोलीस कर्मचाऱ्याना वांजरीला रवाना केले. तोपर्यंत शहरातील नेते मंडळी घटनास्थळी दाखल झाले. रात्र झाल्यामुळे शोध घेता आला नाही. रविवारी पहाटे पोलिसांनी शोधमोहीम राबवण्यात आली. तिन्ही तरुणांचे मृतदेह आढळून आले. पुढील तपास वणी पोलीस करीत आहेत.

अशी आहेत युवकांची नावं

वणी शहरातील तीन युवक मोपेड दुचाकीने वांजरी येथे गेले. तेथील पाण्याने तुडुंब भरलेल्या खदाणीत त्यांना पोहण्याचा मोह झाला. पाण्याचा अंदाज न आल्याने तिन्ही युवक बुडाले. ही खळबळजनक घटना शनिवारी दुपारी घडली. आज पहाटेपासून शोधमोहीम राबवण्यात आली. तिघांचे मृतदेह आढळले. आसीम अब्दुल सलाट शेख (वय 16), नुमान शेख सादिर शेख (वय 16) राहणार एकता नगर आणि प्रतीक संजय मडावी (वय 16) रा. प्रगतीनगर असे या तिन्ही युवकांची नाव आहेत.

तिघेही युवक हे फिरायला गेले होते. निसर्गरम्य वातावरण पाहून त्यांचे मन रमले. पण, अनोळखी ठिकाणी त्यांनी पाण्यात बुडण्याचा मोह केला नसता तर अशी घटना घडली नसली. पाण्याची खेळ नको असे जुने लोकं म्हणतात. त्यामुळे खात्रीशीर ठिकाण असेल, तरच पाण्यात उतरायला हवे. अन्यथा अशा दुर्घटना घडतात. युवकांमध्ये जोश असतो. पण, तो जोश योग्य ठिकाणी वापरणे गरजेचे आहे. अन्यथा जीवन व्यर्थ ठरते.

Follow Us
पेट्रोल-डिझेल टंचाईची शक्यता? पंतप्रधान मोदींच्या आवाहानाबाबत नागरिक..
पेट्रोल-डिझेल टंचाईची शक्यता? पंतप्रधान मोदींच्या आवाहानाबाबत नागरिक...
पुन्हा वर्क फ्रॉम होमची गरज; मोदींचं मोठं आवाहन, म्हणाले.....
पुन्हा वर्क फ्रॉम होमची गरज; मोदींचं मोठं आवाहन, म्हणाले......
निदा खानची 44 दिवस लपाछपी, छत्रपती संभाजीनगरातून कुठे सटकणार होती?
निदा खानची 44 दिवस लपाछपी, छत्रपती संभाजीनगरातून कुठे सटकणार होती?.
पीएम मोदींच्या सोनं खरेदीवरील आवाहनानंतर ज्वेलरी उद्योगाची प्रतिक्रिया
पीएम मोदींच्या सोनं खरेदीवरील आवाहनानंतर ज्वेलरी उद्योगाची प्रतिक्रिया.
171 लिंक अन् थेट पीडितेच्या घरी जाऊन... TCS धर्मांतरण प्रकरणात नवा...
171 लिंक अन् थेट पीडितेच्या घरी जाऊन... TCS धर्मांतरण प्रकरणात नवा....
सुषमा अंधारे आज हक्कभंग कारवाईला सामोरं जाणार; राजकीय घडामोडींना वेग
सुषमा अंधारे आज हक्कभंग कारवाईला सामोरं जाणार; राजकीय घडामोडींना वेग.
हा घ्या एक कांदा आणि एक रुपया; संतप्त शेतकऱ्याचं फडणवीसांना पत्र...
हा घ्या एक कांदा आणि एक रुपया; संतप्त शेतकऱ्याचं फडणवीसांना पत्र....
भोंदू अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर अडचणीत; एसआयटीचे 8 सवाल चर्चेत
भोंदू अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर अडचणीत; एसआयटीचे 8 सवाल चर्चेत.
अशोक खरात प्रकरणातून सुटण्यासाठी बडे नेत चक्क...
अशोक खरात प्रकरणातून सुटण्यासाठी बडे नेत चक्क....
मोठी बातमी! निदा खानला आसरा देणाऱ्या मतीनच्या घरावर बुलडोझर? घरासह...
मोठी बातमी! निदा खानला आसरा देणाऱ्या मतीनच्या घरावर बुलडोझर? घरासह....