AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Yavatmal News : खदाणीजवळील दुचाकीवर तिघांचे कपडे, चप्पल; शोध घेताच कळालं की,…

शनिवारी दुपारची ही घटना. निसर्गरम्य स्थळ असल्याने ते काही वेळ तिथचं बसून राहिले. पोहण्यासाठी तिघेही युवक खदाणीत उतरले. त्यांनी आपले कपडे आणि चपला दुचाकीवर ठेवल्या.

Yavatmal News : खदाणीजवळील दुचाकीवर तिघांचे कपडे, चप्पल; शोध घेताच कळालं की,...
Image Credit source: socialmedia
| Updated on: Sep 03, 2023 | 3:31 PM
Share

विवेक गावंडे, यवतमाळ, ३ सप्टेंबर २०२३ : वणी येथील तीन युवक दुचाकीने वांजरी भागात गेले. वांजरी गावालगत खदाणी आहेत. त्या खदाणींमध्ये सध्या पाणी साचले आहे. पाणी पाहून युवकांना पाण्यात डुबण्याचा मोह झाला. शनिवारी दुपारची ही घटना. निसर्गरम्य स्थळ असल्याने ते काही वेळ तितचं बसून राहिले. पोहण्यासाठी तिघेही युवक खदाणीत उतरले. त्यांनी आपले कपडे आणि चपला दुचाकीवर ठेवल्या. पाण्याचा अंदाज न आल्याने ते तिघेही पाण्याखाली बुडाले. मात्र आजूबाजूला कोणीही नसल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सायंकाळी दुचाकीवर तिघांचे कपडे, चप्पल आढळले. प्रत्यक्षदर्शीच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. घटना ग्रामस्थांना कळाली. घटनास्थळी मोठी गर्दी झाली. याप्रकरणी पोलिसांना कळविण्यात आले.

तिघांचेही मृतदेह सापडले

ठाणेदार अजित जाधव यांनी घटनेची तीव्रता लक्षात घेत तातडीने पोलीस कर्मचाऱ्याना वांजरीला रवाना केले. तोपर्यंत शहरातील नेते मंडळी घटनास्थळी दाखल झाले. रात्र झाल्यामुळे शोध घेता आला नाही. रविवारी पहाटे पोलिसांनी शोधमोहीम राबवण्यात आली. तिन्ही तरुणांचे मृतदेह आढळून आले. पुढील तपास वणी पोलीस करीत आहेत.

अशी आहेत युवकांची नावं

वणी शहरातील तीन युवक मोपेड दुचाकीने वांजरी येथे गेले. तेथील पाण्याने तुडुंब भरलेल्या खदाणीत त्यांना पोहण्याचा मोह झाला. पाण्याचा अंदाज न आल्याने तिन्ही युवक बुडाले. ही खळबळजनक घटना शनिवारी दुपारी घडली. आज पहाटेपासून शोधमोहीम राबवण्यात आली. तिघांचे मृतदेह आढळले. आसीम अब्दुल सलाट शेख (वय 16), नुमान शेख सादिर शेख (वय 16) राहणार एकता नगर आणि प्रतीक संजय मडावी (वय 16) रा. प्रगतीनगर असे या तिन्ही युवकांची नाव आहेत.

तिघेही युवक हे फिरायला गेले होते. निसर्गरम्य वातावरण पाहून त्यांचे मन रमले. पण, अनोळखी ठिकाणी त्यांनी पाण्यात बुडण्याचा मोह केला नसता तर अशी घटना घडली नसली. पाण्याची खेळ नको असे जुने लोकं म्हणतात. त्यामुळे खात्रीशीर ठिकाण असेल, तरच पाण्यात उतरायला हवे. अन्यथा अशा दुर्घटना घडतात. युवकांमध्ये जोश असतो. पण, तो जोश योग्य ठिकाणी वापरणे गरजेचे आहे. अन्यथा जीवन व्यर्थ ठरते.

Follow Us
अजित पवार अपघात प्रकरण, कॅप्टनची बदली का झाली?, फडणवीसांनी सांगितलं...
अजित पवार अपघात प्रकरण, कॅप्टनची बदली का झाली?, फडणवीसांनी सांगितलं....
मुख्यमंत्री फडणवीस यांचे अशोक खरातबाबत कठोर वक्तव्य
मुख्यमंत्री फडणवीस यांचे अशोक खरातबाबत कठोर वक्तव्य.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं निवडणूक आयोगाला पत्र
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं निवडणूक आयोगाला पत्र.
चंद्रकांत पाटील यांचे अशोक खरातसोबत जवळचे संबंध?
चंद्रकांत पाटील यांचे अशोक खरातसोबत जवळचे संबंध?.
अशोक खरातबाबत आणखी एक मोठा खुलासा, ईशान्येश्वर मंदिरासाठी दीड कोटीचा..
अशोक खरातबाबत आणखी एक मोठा खुलासा, ईशान्येश्वर मंदिरासाठी दीड कोटीचा...
महाराष्ट्रात पेट्रोल टंचाई, भंडाऱ्यात लांबच लांब रांगा
महाराष्ट्रात पेट्रोल टंचाई, भंडाऱ्यात लांबच लांब रांगा.
रुपाली चाकणकर यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्याची मागणी
रुपाली चाकणकर यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्याची मागणी.
अशोक खरात प्रकरणावर माजी मंत्री केसरकरांची प्रतिक्रिया
अशोक खरात प्रकरणावर माजी मंत्री केसरकरांची प्रतिक्रिया.
खरात प्रकरणी रुपाली चाकणकर आणि दीपक केसरकर यांची पोलिसांकडून चौकशी?
खरात प्रकरणी रुपाली चाकणकर आणि दीपक केसरकर यांची पोलिसांकडून चौकशी?.
अजितदादांची ताकद... रोहित पवार यांच्या संशयाने खळबळ
अजितदादांची ताकद... रोहित पवार यांच्या संशयाने खळबळ.