AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Share Market Live | त्सुनामीनंतर शेअर बाजाराची भरारी, सेन्सेक्समध्ये 500 अंकांची वाढ

मुंबई शेअर मार्केटमध्ये ऐतिहासिक पडझड झाल्यामुळे बाजाराचे व्यवहार एक तासासाठी बंद करण्याची वेळ ओढावली होती. BSE Closed Sensex fell

Share Market Live | त्सुनामीनंतर शेअर बाजाराची भरारी, सेन्सेक्समध्ये 500 अंकांची वाढ
Anish Bendre
Anish Bendre | Edited By: Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Mar 13, 2020 | 11:01 AM
Share

मुंबई : मुंबई शेअर मार्केटमध्ये ऐतिहासिक पडझड झाल्यामुळे व्यवहार एक तासासाठी बंद करण्याची वेळ ओढावली . शेअर बाजार उघडताच निर्देशांकात 3100 अंकांनी घसरण होऊन तो 30 हजारांच्या खाली गेल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. शेअर बाजार उघडतास सेन्सेक्स 3100 अंकांनी कोसळून 30 हजारांच्या खाली गेला होता. निफ्टीमध्येही 900 अंशांपेक्षा जास्त घसरण पाहायला मिळाली.सेन्सेक्स नियंत्रणाबाहेर पडल्यामुळे सकाळी सव्वादहा वाजेपर्यंत ‘बीएसई’मधील सर्व व्यवहार बंद करण्यात आले .(BSE Closed Sensex fell)

Share Market Live Update

11.00 AM : सेन्सेक्समध्ये 334.53 अंकांची वाढ, निर्देशांक 33,112.67 अंकावर

10. 50 AM : सकाळी 10.20 वाजता पुन्हा एकदा शेअर बाजारातील ट्रेडिंग सुरु करण्यात आली. आधी तब्बल 3300 अंकांनी कोसळलेला मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक हळूहळू उभारी घेताना दिसला. शिवाय राष्ट्रीय शेअर बाजार अर्थात निफ्टीतही वाढ होताना दिसत आहे. सकाळी 10.30 वाजता सेन्सेक्समधील घसरणीचा आकडा 3300 वरुन 1300 वर पोहोचला. मग सकाळी 10.50 वाजता सेन्सेक्सने भरारी घेत 568 अंकांनी उसळी घेतली. म्हणजेच कोसळलेला निर्देशांक पुन्हा वर आला. सर्किट लागलं तेव्हा सेन्सेक्स 29687.52 इतका होता, त्यामध्ये वाढ होऊन 11 च्या सुमारास तो 33112 अंकांवर गेला.

मुंबई शेअर बाजारात लोअर सर्किट

गेल्या दोन आठवड्यांपासून मुंबईसह आशियाई शेअर बाजारात कोरोनाचा प्रभाव पाहायला मिळत आहे. जपान, अमेरिकेतील शेअर बाजारही कोसळलेले आहेत. परिणामी मुंबई शेअर मार्केटही 10 टक्क्यांनी कोसळला. त्यामुळे शेअर मार्केटचे व्यवहार बंद करण्यात आले.

त्याचा परिणाम सोन्याच्या दरावरही पाहायला मिळाले. सोन्याचे दर 2600 रुपयांनी घटून 41 हजार 600 वर गेले आहेत. दुसरीकडे डॉलरच्या तुलनेत रुपयाचा भावही 16 टक्क्यांनी घसरला आहे.

45 मिनिटांसाठी ट्रेडिंग थांबवली

आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सेन्सेक्स आणि निफ्टी 10 टक्क्यांपेक्षा खाली घसरली. जेव्हा मार्केट 10 टक्क्यांपेक्षा जास्त कोसळतं त्यावेळी लोअर सर्किट लावलं जातं म्हणजेच शेअर मार्केटचे व्यवहार काही काळासाठी थांबवले जातात. या आधी मे 2008 मध्ये अशाच पडझडीमुळे शेअर मार्केट काही काळासाठी बंद करण्यात आला होता. त्यावेळी जागतिक मंदीचं सावट भारतीय बाजारात दिसत होतं.

शेअर बाजाराच्या इतिहासात याआधी दोन वेळा मार्केट बंद करण्याची वेळ आली होती, अशी माहिती शेअर मार्केट विषयातील तज्ज्ञांनी दिली आहे. नजीकच्या काळात शेअरचे भाव पुन्हा वधारतील, त्यामुळे गुंतवणूकदारांनी घाबरुन जाण्याचं कारण नाही, असं आवाहन शेअर मार्केट तज्ज्ञ विश्वास उटगी यांनी केलं आहे.

सध्या मार्केट कोसळल्यामुळे ट्रेडिंग 45 मिनिटांसाठी रोखण्यात आलं. यानंतर आता व्यवहार 10.15 नंतर सुरु करण्यात येतील. शेअर बाजारात 10 टक्क्यांपेक्षा जास्त घसरण झाली तर तातडीने लोअर सर्किट लावून खरेदी-विक्री थांबवली जाते. गेल्या 12 वर्षात पहिल्यांदाच शेअर मार्केटचं ट्रेडिंग रोखण्यात आलं.

व्यापार बंद का केला जातो?

गुंतवणूकदारांच्या गुंतवणुकीचे संरक्षण करण्यासाठी व्यापारावर बंदी घालण्यात येते. यामुळे गुंतवणूकदारांचे नुकसान होण्याचे संकट अधिकच गहिरे होण्यास चाप बसतो. जेव्हा व्यवहार थांबले, तेव्हा सेन्सेक्स 3090.62 अंकांनी खाली येऊन 29,687.52 वर बंद झाला. निफ्टी 966.10 च्या घसरणीसह 8,624.05 अंकांवर पडला.

सेबीचे नियम काय?

SEBI म्हणजे Securities and Exchange Board of India किंवा भारतीय सुरक्षा आणि विनिमय मंडळाने निर्देशांकाबाबत काही नियम ठरवले आहेत. ‘सेबी’च्या नियमानुसार –

  • निर्देशांक (सेन्सेक्स किंवा निफ्टी) एक वाजण्याआधी 10 टक्क्यांनी घसरले, तर व्यवहार 45 मिनिटांसाठी थांबवण्यात येतो.
  • दुपारी एक ते अडीच वाजताच्या दरम्यान पडला, तर हा कालावधी 15 मिनिटांचा असतो. तर दुपारी अडीचनंतर पडल्यास व्यवहार थांबत नाहीत.

कोरोना व्हायरसमुळे आर्थिक विकासाला फटका बसण्याची भीती गुंतवणूकदारांमध्ये आहे, या नैराश्यामुळेच मुंबई शेअर बाजार कोसळला. निफ्टीने 10 टक्क्यांचा नीचांक (लोअर सर्किट) गाठल्यामुळे शेअर बाजारातील सर्व व्यवहार 45 मिनिटांसाठी थांबवण्यात आले.

BSE Closed Sensex fell

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा.

मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी.

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी

66 दिवसांपूर्वी क्रिकेटपटूच्या मृत्यूची अफवा, आता थेट संघाचं कर्णधारपद मिळालं.

66 दिवसांपूर्वी क्रिकेटपटूच्या मृत्यूची अफवा, आता थेट संघाचं कर्णधारपद मिळालं

…तर मंत्र्यांना स्पष्ट संदेश जाईल, अण्णा हजारेंचं पंतप्रधान मोदींना पत्र, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी.

…तर मंत्र्यांना स्पष्ट संदेश जाईल, अण्णा हजारेंचं पंतप्रधान मोदींना पत्र, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी

Akhil Chitre : पाकिस्तानच्या बॉर्डरवर आलोय का? अखिल चित्रे पोलीस अधिकाऱ्यात जुंपली; आंदोलकांना ताब्यात घेतल्यानं वातावरण तापलं!.

Akhil Chitre : पाकिस्तानच्या बॉर्डरवर आलोय का? अखिल चित्रे पोलीस अधिकाऱ्यात जुंपली; आंदोलकांना ताब्यात घेतल्यानं वातावरण तापलं!

मोदींच्या माफींची राहुल गांधींची नवी मागणी… मागण्यांमध्येच घोळ.

मोदींच्या माफींची राहुल गांधींची नवी मागणी… मागण्यांमध्येच घोळ