AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘मराठा आरक्षणासाठी केंद्र सरकारने संविधान दुरुस्ती करुन वटहुकूम काढावा’

मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी छत्रपती संभाजीराजे यांना घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार

'मराठा आरक्षणासाठी केंद्र सरकारने संविधान दुरुस्ती करुन वटहुकूम काढावा'
मराठा मोर्चा
| Updated on: Oct 07, 2020 | 4:40 PM
Share

मुंबई: मराठा आरक्षणासाठी केंद्र सरकारने संविधान दुरुस्ती करुन वटहुकून काढावा, अशी मागणी ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांनी केली. मराठा आरक्षणामुळे ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का बसेल, हा समज चुकीचा आहे. माझा मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे, असे हरिभाऊ राठोड यांनी सांगितले. (Haribahu Rahtod on Maratha Reservations)

ते बुधवारी मुंबईतील पत्रकारपरिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणासंदर्भात केंद्र सरकारने हस्तक्षेप करण्याची मागणी केली. मराठा आरक्षणासाठी केंद्र सरकारने वटहुकूम काढावा. वटहुकूम काढल्यानंतर संसदेत घटनादुरूस्ती करावी लागेल. यासाठी मी छत्रपती संभाजीराजे यांना घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याचेही हरिभाऊ राठोड यांनी सांगितले.

गेल्या काही दिवसांत राज्यात मराठा आरक्षणासंदर्भातील घडामोडींना वेग आला आहे. माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील यांनी आज नवी मुंबईच्या माथाडी भवनमध्ये मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची पुढील रणनीती ठरवण्यासाठी बैठक आयोजित केली आहे. या बैठकीला हरिभाऊ राठोड आणि मुस्लिम ओबीसी संघाचे अध्यक्ष युसूफ मणियार हेदेखील उपस्थित होते.  छत्रपती संभाजीराजे या बैठकीला उपस्थित आहेत. त्यामुळे आता या बैठकीअंती मराठा समाजाचे नेते काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

छत्रपती संभाजीराजेंची राज्य सरकारवर टीका

मराठा आरक्षणासंदर्भातील पुढील रणनीती ठरवण्यासाठी आज नवी मुंबईत मराठा नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. यावेळी छत्रपती संभाजीराजे यांनी महाविकासआघाडी सरकारच्या भूमिकेवर टीका केली. राज्य सरकार मराठा आरक्षणाबाबत चालढकल करत आहे. मराठा समाजाला सरकारने फसवलं. राज्य सरकार त्यांच्या हातात असलेल्या गोष्टीही करत नाही. सारथी संस्था सुद्धा तुम्ही बुडीत घातली, अण्णासाहेब पाटील महामंडळाला काय दिलं?, फक्त राज्य सरकारने खेळखंडोबा केला, अशी टीका संभाजीराजे यांनी केली.

संबंधित बातम्या:

माझी खुर्ची समाजाच्या बरोबर हवी, समाजाच्या वर नको- संभाजीराजे

मोठी बातमी! मराठा आरक्षणाच्या बैठकीला उदयनराजेंची दांडी; संभाजीराजेंची हजेरी!

(Haribahu Rahtod on Maratha Reservations)

Follow Us
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी.