AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दुसरा प्रस्ताव दिला, राज्यपाल विचार करतो म्हणाले, आम्ही राजकीय भाष्य करणार नाही : जयंत पाटील

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधानपरिषदेवरील नियुक्तीबाबत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Jayant Patil meet Governot Bhagat Singh Koshyari) यांनी लवकर निर्णय घ्यावा, यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज (28 एप्रिल) राजभवन येथे जावून राज्यपालांची भेट घेतली.

दुसरा प्रस्ताव दिला, राज्यपाल विचार करतो म्हणाले, आम्ही राजकीय भाष्य करणार नाही : जयंत पाटील
| Updated on: Apr 28, 2020 | 7:50 PM
Share

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधानपरिषदेवरील नियुक्तीबाबत (Jayant Patil meet Governot Bhagat Singh Koshyari) राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी लवकर निर्णय घ्यावा, यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज (28 एप्रिल) राजभवन येथे जाऊन राज्यपालांची भेट घेतली. यावेळी त्यांनी राज्यपालांना स्मरणपत्र दिलं आणि उद्धव ठाकरे यांच्या विधानपरिषदेवरील नियुक्तीबाबत लवकर निर्णय घ्यावा, अशी विनंती केली. या विनंतीवर राज्यपालांनी विचार करतो, असं म्हटलं असल्याची माहिती राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली (Jayant Patil meet Governot Bhagat Singh Koshyari).

“राज्यपाल भगसिंग कोश्यारी यांना आम्ही 9 एप्रिल रोजी पत्र पाठवल होतं. विधानपरिषदेच्या ज्या दोन जागा रिक्त झाल्या होत्या त्यासंदर्भात ते पत्र होतं. दरम्यान आम्हाला राज्यपालांकडून कोणतीही माहिती मिळाली नसल्यामुळे, काल पुन्हा मंत्रिमंडळ बैठकीत त्याबाबत निर्णय घेऊन आम्ही स्मरणपत्र पाठवलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावाचं शिफारस पत्र आम्ही राज्यपालांना दिलं आहे”, असं जयंत पाटील यांनी सांगितलं.

“राज्याच्या मंत्रिमंडळाने दुसऱ्यांदा ठराव करुन जो प्रस्ताव आपल्याला दिलेला आहे, त्यावर आपण लवकर निर्णय घ्यावा, अशी विनंती राज्यपालांना करण्यात आली. राज्यपालांनी यावर विचार करतो असं सांगितलं आहे”, असं जयंत पाटील म्हणाले.

“आम्ही आता कोणतेही राजकीय भाष्य करणार नाही. यासंदर्भात लवकरच राज्यपाल कायदेशीर निर्णय घेतील. राज्यात स्थिर सरकार असायला हवं. आम्ही सध्या मुख्यमंत्र्यांसह सर्व यंत्रणा कोरोनाविरोधात लढण्यात गुंतलेलो आहोत. राज्यपाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सहा महिन्यांचा कालावधी पूर्ण होण्याआधी हा प्रस्ताव मंजूर करतील, अशी आम्हाला अपेक्षा आहे”, असं जयंत पाटील म्हणाले.

संबंधित बातम्या :

देशात कोरोनाचा कहर, 24 तासात 1543 नवे रुग्ण, बाधितांचा आकडा 29,435 वर

उत्तर प्रदेशमध्ये मंदिरात झोपलेल्या 2 साधूंची हत्या, उद्धव ठाकरेंचा योगी आदित्यनाथ यांना फोन

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...