AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aslam Shaikh | उद्धवजींनी महाराष्ट्राला सांभाळलं, भाजपच्या पोटात दुखतंय : अस्लम शेख

भाजपच्या पोटात दुखत आहे, म्हणून मुख्यमंत्र्यांना बदनाम करण्यासाठी असे वक्तव्य करत आहेत. प्रत्येक दिवशी एक नेत्याला समोर करुन बदनामीचं काम केलं जात आहे, असं अस्लम शेख म्हणाले

Aslam Shaikh | उद्धवजींनी महाराष्ट्राला सांभाळलं, भाजपच्या पोटात दुखतंय : अस्लम शेख
| Updated on: Jul 01, 2020 | 9:16 PM
Share

मुंबई : “देशातील सध्याची परिस्थिती पाहिली असता, ज्या (MLA Aslam Shaikh Criticize BJP) पद्धतीने उद्धवजींनी महाराष्ट्राला सांभाळलं आहे. केंद्राने त्यांचे कौतुक केलं आहे. राज्य सरकारने कोरोना असताना देखील मुंबईमध्ये चांगलं काम केलेलं आहे. भाजपला हे समजत नाही”, अशी टीका मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी (MLA Aslam Shaikh Criticize BJP) केली आहे.

“भाजपच्या पोटात दुखत आहे, म्हणून मुख्यमंत्र्यांना बदनाम करण्यासाठी असे वक्तव्य करत आहेत. प्रत्येक दिवशी एक नेत्याला समोर करुन बदनामीचं काम केलं जात आहे. उद्धव ठाकरे एक नंबर काम करत आहेत”, असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून भाजपकडून सातत्याने महाविकास आघाडी सरकारवर टीका केली जात आहे. कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात राज्य सरकार फोल ठरतेय, असं म्हणत भाजपकडून सरकारवर निशाणा साधला जात आहे (MLA Aslam Shaikh Criticize BJP).

शरद पवारांच्या वक्तव्यावरुन काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजी नाही : अस्लम शेख

काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार वादावरही अस्लम शेख यांनी मत मांडलं आहे. राहुल गांधी आणि शरद पवार यांना त्यांचं मत मांडण्याचा अधिकार आहे, असं मत अस्लम शेख यांनी व्यक्त केलं.

“राहुल गांधी यांनी आपलं मत मांडलं आणि शरद पवार यांनी त्यांचं मत मांडलं आहे. प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. त्यामुळे शरद पवारांनी राहुल गांधींबद्दल काय विधान केलं, त्याला इतकं महत्त्व नाही”, असं ते म्हणाले.

“शरद पवार यांच्या वक्तव्यावरुन काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणतीही नाराजी नाही. कोणी कितीही म्हटलं, तरी हे सरकार पाच वर्ष टिकणार आहे”, असा विश्वास अस्लम शेख यांनी व्यक्त केला (MLA Aslam Shaikh Criticize BJP).

संबंधित बातम्या :

संकट टळलं, यंत्रणा सज्ज होती, आता देवाकडे प्रार्थना, हे वादळ देशाबाहेर जावं : अस्लम शेख

Nisarga Cyclone : मुंबई शहराचे पालकमंत्री मध्यरात्रीही अॅक्शन मोडमध्ये, मढ-भाटीत मच्छिमारांची भेट

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.