कुत्र्यांच्या दहशतीने दहा शाळांना टाळे, मुलांना ऑनलाईन शिक्षण देण्याची वेळ, कुठे घडला हा प्रकार
हिंसक कुत्र्यांच्या हल्ल्याचे व्हिडीओ पाहून आता सर्वत्र त्यांची दहशत पसरली आहे. आता एका जिल्ह्यात कुत्र्यांच्या दहशतीने शाळा बंद ठेवून ऑनलाईन शाळा सुरु केल्या आहेत.

उत्तराखंडाच्या चमोली जिल्ह्यातील नारायणबगड येथे कुत्र्यांच्या दहशतीने १० शाळांना बंद करण्याची नौबत प्रशासनावर आली आहे.येथे आता मुलांचे वर्ग आता ऑनलाईन घेतले जात आहेत. कुत्र्यांनी या भागात आतापर्यंत ११ जणांना चावा घेतल्याने लोक घरातून बाहेर पडताना काठी घेऊनच बाहेर पडत आहेत.त्यामुळे या ठिकाणी ६०० हुन अधिक मुलांचे शिक्षण आता ऑनलाईन करण्याची वेळ आली आहे. कुत्र्यांना पकडण्यासाठी आता वनविभागाची मदत घेतली जात आहे.
उत्तराखंडात चमोली जिल्ह्यातील नारायणबगड भागात कुत्रांनी चावा घेतल्याने ११ जणांना रुग्णालयात जाऊन इंजेक्शन घेण्याची वेळ आली आहे. या भागातील भटक्या कुत्र्यांनी लोकांना इतके दहशती खाली टाकले आहे की लहान मुलांना शाळेत पाठवणे लोकांनी बंद केले आहे.या गावातील लोक घराबाहेर पडताना मोठी काठी घेऊन बाहेर पडत आहेत. या चमोलीचे कलेक्टर गौरव कुमार याच्या आदेशाने मुख्य शिक्षण अधिकारी आकाश सारस्वत यांनी शाळांना सुट्टी देणारा आदेश काढला आहे. आधी २० ते १३ ऑगस्ट असे चार दिवस शाळांना बंद ठेवण्याचा आदेश काढला होता. आता ही सुट्टी घटवून दोन दिवस करण्यात आली आहे. हिंसक आणि पिसाळलेल्या कुत्र्यांना पकडण्यासाठी आता वन विभागाने क्विक रिस्पॉन्स टीमची मोहिम सुरु केली आहे. आता पर्यंत या टीमने तीन कुत्र्यांना पकडले आहे. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार एका पिसाळलेल्या कुत्र्याने अन्य कुत्र्यांना चावल्याने या क्षेत्रातील अनेक कुत्री पिसाळली आहेत.ज्यानंतर या भागातील अनेक कुत्रे आक्रमक झाल्याचे म्हटले जाते. या दाव्याला दुजोरा मात्र मिळालेला नाही.
स्थानिक लोकांच्या माहितीनुसार रविवार आणि सोमवारी तीन लोकांवर कुत्र्यांनी हल्ला केला. मंगळवारी कुत्र्यांनी शाळकरी मुलांसह चार लोकांचा चावा घेतला. बुधवारी तीन शाळकरी मुलांसह चार अन्य लोकांवर हल्ला करण्यात आला. काल जमखी झालेल्या दीपांशु बिष्ट, मानवी, वैष्णवी, मजदूर प्रकाश आणि पंती गावाचे रहिवासी लक्ष्मी यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांना येथे एण्टी रेबिजचे इंजेक्शन देण्यात आले आहेत.
देशात ही दुसरी घटना आहे की कुत्र्यांच्या उपद्रवाने शाळा बंद ठेवण्याची वेळ आली आहे. याआधी जम्मू-कश्मीरातील राजौरीत कुत्र्यांच्या दहशतीने ८ पंचायतीच्या शाळांना एक दिवसांसाठी बंद ठेवण्यात आले होते. तेथे लोकांच्या सुरक्षेसाठी सीआरपीएफच्या टीमला तैनात करण्यात आले होते.
कुत्रे हा होत आहेत हिंसक
रस्त्यावरील कुत्र्यांना बाईकस्वार किंवा वाहनचालक जखमी करतात त्यामुळे ते हिंसक झालेले असतात. मेटिंग आणि प्रजननाच्यावेळी देखील कुत्री हिंसक झालेली असतात. रस्त्यावरील कुत्र्यांना पाळीव कुत्र्यांप्रमाणे शांत करता येत नाही. त्यामुळे अनेक शहरात कुत्रे मानवावर हल्ले करताना दिसत आहेत.