AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वाढत्या तापमानाने होरपळणार भारतातील ६० कोटी लोकं, वैज्ञानिकांच्या अभ्यासात खळबळजनक खुलासा

तापमान वाढीमुळे लू, चक्रिवादळ, पूर अशा संकटांचा सामना करावा लागणार आहे. यामुळे जागतिक स्तरावरील समुद्रातील पाण्यामध्ये वाढ होईल.

वाढत्या तापमानाने होरपळणार भारतातील ६० कोटी लोकं, वैज्ञानिकांच्या अभ्यासात खळबळजनक खुलासा
| Updated on: May 26, 2023 | 4:24 AM
Share

नवी दिल्ली : वाढत्या तापमानावर नवे अध्ययन समोर आलंय. जगात वाढत्या तापमानामुळे इशारा देण्यात आला आहे. जगात जास्त लोकसंख्येच्या देशांना याचा जास्त फटका बसणार आहे. भारतात वाढत्या तापमानामुळे सुमारे ६० कोटी लोकांना फटका बसणार आहे. जग वातावरणातील बदलामुळे झुंज देत आहे. तरीही ग्लोबल वार्मिंगचे संकट काही टळताना दिसत  नाही. वैज्ञानिकांच्या मते २०८०-२१०० पर्यंत पृथ्वीवरील तापमानात २.७ डिग्री सेल्सिअसची वाढ होईल. याचा पावसावर मोठा परिणाम पडणार आहे. तापमान वाढीमुळे लू, चक्रिवादळ, पूर अशा संकटांचा सामना करावा लागणार आहे. यामुळे जागतिक स्तरावरील समुद्रातील पाण्यामध्ये वाढ होईल. बर्फ वितळून समुद्राच्या पाण्यात येईल.

भारतातील अर्ध्या लोकसंख्येवर होणार परिणाम

संशोधनात ही बाब समोर आली की, २.७ डिग्री सेल्सिअस तापमानात वाढ होणार आहे. याचा परिणाम भारतातील अर्ध्या लोकसंख्येवर होणार आहे. हे संशोधन जर्नल नेचर सस्टेनेबिलीटीमध्ये प्रकाशित झालंय. हे अध्ययन एक्सेटर युनिव्हर्सिटीच्या ग्लोबल सिस्टम इंस्टिट्यूटच्या अर्थ कमिशन आणि नानजिंग युनिव्हर्सिटीने केलंय. भारतापाठोपाठ भीषण गर्मीचा सामना हा नायजेरीया देशाला करावा लागणार आहे. नायजेरीयातील ३० कोटी लोकं या गर्मीचा सामना करतील.

सहा कोटी लोकं करतात लूचा सामना

तापमान वृद्धी ही १.५ डिग्री सेल्सिअस झाल्यास ९ कोटी लोकांना वाढत्या तापमानाचा फटका बसेल. जागतिक स्तरावर एक डिग्री सेल्सिअस तापमान वाढले आहे. समजा ग्लोबल स्तरावर तापमान ३.६ डिग्री सेल्सिअस वाढली तर ४.४ डिग्री सेल्सीअस तापमानात वाढ वाढ होईल. अशावेळी जगातील अर्ध्या लोकांना तापमान वाढीचा फटका बसेल.

सध्या उन्हाळा सुरू असल्याने तापमान वाढीचे चटके बसायला लागले आहेत. शहरात सिमेंटचे रस्ते असल्याने तापमानात वाढ होते. कंपन्या असलेल्या भागात मोठ्या प्रमाणात धूर निघतो. याचाही परिणाम तापमान वाढीवर होते. जागतिक तापमान वाढ होण्याचा धोका आहे. असे झाल्यास याची झळ बहुतेक लोकांना सोसावी लागणार आहे.

काळजी फक्त रोहित पवारांनाच आहे असं नाही; प्रवीण दरेकरांचं मोठं विधान
काळजी फक्त रोहित पवारांनाच आहे असं नाही; प्रवीण दरेकरांचं मोठं विधान.
हर्षवर्धन सपकाळांच्या विधानाविरोधात राज्यभरात आंदोलन
हर्षवर्धन सपकाळांच्या विधानाविरोधात राज्यभरात आंदोलन.
हर्षवर्धन सपकाळ यांच्या व्यक्तव्यावरू पुण्यात भाजप-कॉंग्रेस आमनेसामने
हर्षवर्धन सपकाळ यांच्या व्यक्तव्यावरू पुण्यात भाजप-कॉंग्रेस आमनेसामने.
पुण्याच्या ओंकारेश्वर मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी
पुण्याच्या ओंकारेश्वर मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी.
कोंडेश्वर शिव मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या मोठ्या रांगा
कोंडेश्वर शिव मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या मोठ्या रांगा.
तेजस ठाकरेंवर रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरु! नेमकं काय घडलं?
तेजस ठाकरेंवर रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरु! नेमकं काय घडलं?.
अजित पवारांचा विलीनीकरणासाठी आग्रह होता - जयंत पाटील
अजित पवारांचा विलीनीकरणासाठी आग्रह होता - जयंत पाटील.
हर्षवर्धन सपकाळांच्या वक्तव्याने वाद; भाजप-काँग्रेसमध्ये जुंपली
हर्षवर्धन सपकाळांच्या वक्तव्याने वाद; भाजप-काँग्रेसमध्ये जुंपली.
राज्यभरात एटीएसची मोठी कारवाई; यवतमाळ आणि अहिल्यानगरमध्ये छापे
राज्यभरात एटीएसची मोठी कारवाई; यवतमाळ आणि अहिल्यानगरमध्ये छापे.
अजित पवारांच्या अपघाताप्रकरणी रोहित पवारांचं अमित शाहांना पत्र
अजित पवारांच्या अपघाताप्रकरणी रोहित पवारांचं अमित शाहांना पत्र.