AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एका लग्नाची भयंकर गोष्ट! तिच्याशी धुमधडाक्यात लग्न, अन् हनीमूनच्या रात्री कळलं ती ती नाही तर…

तरुणाने या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तरुणाची सर्व काहानी ऐकून पोलीसही हैराण झाले आहेत. या तरुणाने आम्हाला तोंडी तक्रार दिली आहे.

एका लग्नाची भयंकर गोष्ट! तिच्याशी धुमधडाक्यात लग्न, अन् हनीमूनच्या रात्री कळलं ती ती नाही तर...
एका लग्नाची भयंकर गोष्ट! तिच्याशी धुमधडाक्यात लग्न, अन् हनीमूनच्या रात्री कळलं ती ती नाही तर...Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 01, 2022 | 4:56 PM
Share

हरिद्वार: आपल्याला सोशल मीडियातून (social media) फ्रेंड रिक्वेस्ट येते. आपण ती स्वीकारतो आणि पुढे मैत्री (friend request) जमते. सोशल मीडियातून नातीही जुळतात. पण सोशल मीडियात जसं दिसतं तसं कधीच नसतं. अनेकदा सोशल मीडियात आपली खरी ओळख लपवून ठेवतात. त्यातून फार मोठा फटका बसू शकतो किंवा फार मोठा फ्रॉडही होऊ शकतो. उत्तराखंडच्या (uttarakhand) हरिद्वारमध्येही असाच एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. येथील एका तरुणाच्या बाबतीत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. ही माहिती ऐकून तुम्हालाही धक्का बसेल अशीच आहे.

हरिद्वारच्या लक्सरमधील रायसी चौकी गावात हा धक्कादायक प्रकार घडला. या गावातील एका तरुणाची सोशल मीडियावर एका मुलीशी मैत्री झाली. या तरुणीच्या नावाने असलेल्या अकाऊंटवरून या तरुणीला फ्रेंड रिक्वेस्ट गेली.

या तरुणाने ती रिक्वेस्ट स्वीकारली. त्यानंतर दोघांमध्ये बोलणं सुरू झालं. त्यानंतर दोघांनी एकमेकांचे नंबर दिले. दोघांमध्ये फोनवरून बातचीत होऊ लागली.

या तरुणीने ती हरियाणाच्या हिसारमधील असल्याचं या तरुणाला सांगितलं. दोघांच्या गप्पा एवढ्या वाढल्या की दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर या दोघांनी एकत्र राहण्याचा विचार केला.

या तरुणाने तरुणीला लग्नाची मागणी घातली. तिला लग्न करण्यासाठी तयार केलं. त्यानंतर लग्नाचंही ठरलं आणि लग्नाची जोरदार तयारीही झाली.

ही तरुणी लग्नासाठी लक्सरला आली. त्यानंतर या दोघांनी एका मंदिरात विवाहही केला. लग्नाच्यावेळी या तरुणीच्या घरातील एकही व्यक्ती उपस्थित नव्हता. लग्नानंतर हा तरुणी तिला घेऊन आपल्या गावी घेऊन गेला.

गावाला आल्यावर हनिमूनच्या दिवशी जे घडलं ते भयंकरच होतं. लग्नाच्या पहिल्या रात्री आपण जिच्याशी लग्न केलं ती स्त्री नसून तृतीयपंथी असल्याचं या तरुणाला कळलं आणि त्याला धक्काच बसला.

हादरून गेलेल्या या तरुणाने या मुलीशी काडीमोड घेण्याचा निर्णय घेतला. पण तिने काडीमोड घेण्यासाठी या तरुणाकडे पाच लाख रुपये मागितल्याचा आरोप आहे.

तरुणाने या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तरुणाची सर्व काहानी ऐकून पोलीसही हैराण झाले आहेत. या तरुणाने आम्हाला तोंडी तक्रार दिली आहे. पीडित तरुणाने लेखी तक्रार केली तर पुढील कारवाई करण्यात येईल, असं पोलीस अधिकारी यशपाल सिंह बिष्ट यांनी सांगितलं.

Follow Us
खड्डे, बंद कंपन्या आणि बेरोजगारी! वाजेंनी सरकारला एकाच वेळी घेरलं
Rajabhau Waje | खड्डे, बंद कंपन्या आणि बेरोजगारी! राजाभाऊ वाजेंनी सरकारला एकाच वेळी घेरलं
शिवसेनेच्या आमदारांना पवईच्या हॉटेलमध्ये... नरेश म्हस्के काय म्हणाले?
शिवसेनेच्या आमदारांना पवईच्या हॉटेलमध्ये... नरेश म्हस्केंनी सांगितलं पक्ष फुटीच्या अगदी काही दिवसांपूर्वी काय काय घडलं होतं?
एक तरी पत्र दाखवलं तर मी राजीनामा देईन.... शिंदे गटातील नेत्याचं विधान
एक तरी पत्र दाखवलं तर मी राजीनामा देईन नाहीतर.... शिंदे गटातील बड्या नेत्याचं राऊतांना खुलं चॅलेंज
मुंबईत मध्यरात्री मोठी दुर्घटना! घाटकोपरमध्ये घरांवर दरड कोसळली....
मुंबईत मध्यरात्री मोठी दुर्घटना! घाटकोपरमध्ये घरांवर दरड कोसळली, ५-६ जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती
संजय राऊतांची सुप्रीम कोर्टाकडे मोठी मागणी! चुकीच्या लोकांच्या...
संजय राऊतांची सुप्रीम कोर्टाकडे मोठी मागणी! चुकीच्या लोकांच्या हातात शिवसेनेचं चिन्ह...
शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचा? राऊतांचं मोठं विधान; म्हणाले…
शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचा? निकालाआधी राऊतांचं मोठं विधान; म्हणाले…
राऊतांनी म्हस्केंना बोलावलं अन् पुढे जे घडलं ते पाहून सगळेच हसले!
Sanjay Raut - Naresh Mhaske | सुप्रीम कोर्टाबाहेर राऊतांनी म्हस्केंना बोलावलं अन् पुढे जे घडलं ते पाहून सगळेच हसले!
राज ठाकरे अचानक फडणवीसांच्या भेटीला! भेटीचं नेमकं कारण काय?
मोठी बातमी! भाजपवर टीका अन् अचानक मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला! राज ठाकरेंच्या भेटीचं नेमकं कारण काय?
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप,
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप, अखेर मुख्यमंत्र्यांनी...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण... अखेर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनचे टोचले कान, काय घडलं?