अरे ते जेंनझी त्यांच्या आई वडिलांचे ऐकत नाहीत ते तुमचे काय.. अभिजीत दिपकेचा सरकारला इशारा..
अभिजीत दिपके यांचे आंदोलन जंतर मंतरवर सुरू आहे. मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. त्यामध्येच सरकारला मोठा इशारा देण्यात आला. नरेंद्र मोदी यांच्याबद्दल अभिजीत दिपके यांनी मोठे विधान केले.

कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन जंतर मंतरवर सुरू आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचे सातत्याने सांगितले जातंय. आंदोलन अधिक आक्रमक झाले आहेत. यादरम्यानच अत्यंत मोठी धमकी नुकताच देण्यात आली. अभिजीत दिपके यांनी म्हटले की, जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत आंदोलन संपणार नाही. हेच नाही तर पंतप्रधानांनाही राजीनामा देण्याची वेळ येऊ शकते. पुन्हा एकदा चहाचा स्टॉल लावावा लागेल, असे त्यांनी म्हटले. राघव चड्ढा याला समोसाचे दुकान त्याबाजूलाच लावण्याची वेळ येईल, असे मोठे विधान अभिजीत दिपकेने केले. कॉकरोज जनता पार्टीच्या आंदोलनाची व्याप्ती वाढत आहे. देशभरात विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. दिल्ली पोलिसांवर अभिजीत दिपके याने निशाणा साधला. विद्यार्थ्यांना पोलिसांनी त्रास देणे थांबवावे नाही तर आम्हाला पोलिस मुख्यालयाबाहेर आंदोलन करावे लागेल असेही अभिजीत दिपकेने म्हटले.
अभिजीत दिपके यांनी म्हटले की, हे जेंनझी कोणाचेही ऐकत नाहीत. ते त्यांच्या आई वडिलांचेही ऐकत नाहीत ते तुमचे काय ऐकणार? जेंनझी कोणत्याही व्यवस्थेला घाबरत नाहीत, ते कोणाचे ऐकत नाहीत, फक्त त्यांचे ऐकले जाते. त्यांना बोलायची सवय आहे. जर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतल नाही तर पंतप्रधानांना राजीनामा द्यायला लावू असे अभिजीत दिपकेने म्हटले.
जेवढे लोक तुम्ही जेलमध्ये टाकाल तेवढे जास्त आंदोलनात येतील. 20 तारखेला तुम्ही जे काही विद्यार्थ्यांसोबत केले त्यानंतर तुम्ही लोकांना लाजून मेले पाहिजे. तुमच्या लेकरांनाही तुमचा चेहरा बघायला आवडणार नाही. जेंव्हा तुम्ही तुमच्या घरी जात असाल तर त्यावेळी तुमचे लेकरं म्हणत असतील की, लेकरांना मारणारा गुंड आला.
दिल्ली पोलिसांमुळे जगात भारताचे नाव खराब होत आहे, असेही अभिजीत दिपकेने म्हटले. जंतर मंतरवर विद्यार्थ्यांची संख्या अधिक वाढत आहे. देशभरात मोर्चे काढली जात आहेत. मुंबईमध्येही मोठ्या मोर्चाचे आयोजन करण्यात आले. शिवाजी पार्क परिसरात विद्यार्थी आंदोलने करताना दिसत आहेत.