AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भगवान श्रीकृष्णसंदर्भातील या सोप्या प्रश्नांची उत्तरे देताना ‘बाल संत’ अभिनव अरोडाची भंबेरी, दिली चुकीची उत्तरे

Abhinav Arora: दहा वर्षीय अभिनव स्वत:ला भगवंत श्रीकृष्ण यांचे मोठे भक्त सांगतात. त्यांना एका मुलाखतीत भगवान श्रीकृष्णसंदर्भात चार प्रश्न विचारण्यात आले. त्यातील एकाच प्रश्नाचे उत्तर ते देऊ शकले. त्यामुळे सोशल मीडियावर ते चांगले ट्रोल झाले आहेत.

भगवान श्रीकृष्णसंदर्भातील या सोप्या प्रश्नांची उत्तरे देताना 'बाल संत' अभिनव अरोडाची भंबेरी, दिली चुकीची उत्तरे
Abhinav Arora
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Oct 31, 2024 | 10:00 AM
Share

Abhinav Arora: वादग्रस्त बालकथा वाचक अभिनव अरोड सध्या चर्चेत आहे. सोशल मीडियावर ते चांगले ट्रोल होत आहे. अभिनव यांचा वापर त्यांचे आई-वडील रिल बनवण्यासाठी करत असल्याचे आरोप आहे. रिल बनवून अभिनव अरोडा लोकांच्या श्रद्धेची खेळ करत असल्याचा आरोप होत आहे. दहा वर्षीय अभिनव स्वत:ला भगवंत श्रीकृष्ण यांचे मोठे भक्त सांगतात. त्यांना एका मुलाखतीत भगवान श्रीकृष्णसंदर्भात चार प्रश्न विचारण्यात आले. त्यातील एकाच प्रश्नाचे उत्तर ते देऊ शकले. त्यामुळे सोशल मीडियावर ते चांगले ट्रोल झाले आहेत. कृष्ण भक्त असणे आणि पुस्तकी ज्ञान पाठ करणे यामध्ये फरक असल्याच्या कमेंट लोकांनी केल्या आहेत.

असे प्रश्न विचारले

अभिनव अरोडा हे बालसंत म्हणून प्रसिद्ध झाले. परंतु त्यांच्याबाबत वादही निर्माण झाले आहे. एका वृत्तवाहिनीने त्यांची मुलाखत घेतली. त्यावेळी भगवान श्रीकृष्ण यांच्यासंदर्भात चार प्रश्न विचारले. पहिला प्रश्न होता, भगवान श्रीकृष्ण यांना सुदर्शन चक्र कोणी दिले? त्यावर ते म्हणाले, त्या प्रश्नाचे उत्तर देताना ते अडखडले. मग शिव महापुराणचा संदर्भ दिला. त्यानंतर भगवान शंकरांनी त्यांना सुदर्शन चक्र दिल्याचे सांगितले. हे उत्तर चुकीचे होते. भगवान श्रीकृष्ण यांना सुदर्शन चक्र परशुराम यांनी दिले होते.

कृष्ण नावाचा अर्थ असा सांगितला

अभिनव यांना दुसरा प्रश्न भगवान कृष्ण यांचा नावाचा अर्थ काय असा विचारला? त्यावर अभिनव म्हणाले, कृष्ण नावाचा अर्थ सुंदर आहे. त्यांना पुन्हा हा प्रश्न विचारल्यावर ते इकडे तिकडे पाहू लागले. त्यानंतर ‘कष्ट हरने वाला।’ असे उत्तर दिले. परंतु भगवान कृष्ण यांचा नावाचा अर्थ श्याम आहे. कृष्ण हा शब्द कोणत्या भाषेतून आला, त्याचे उत्तर ते देऊ शकले नाही.

हे एकमेव उत्तर बरोबर

भगवान कृष्ण यांचे पूर्ण नाव काय? असा तिसरा प्रश्न विचारला. तेव्हा त्यांनी कृष्ण असेच उत्तर दिले. परंतु भगवान कृष्ण यांचे पूर्ण नाव श्रीकृष्ण वासुदेव आहे. चौथे आणि शेवटचा प्रश्न अभिनव यांना विचारले. वासुदेव कोणाचे नाव आहे? त्याचे उत्तर अभिनव यांनी बरोबर दिले. वासुदेव भगवान कृष्ण यांच्या वडिलांचे नाव असल्याचे उत्तर त्यांनी दिले. त्यांचे हे एकमेव उत्तर बरोबर होते.

Follow Us
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता
...तरच राष्ट्रवादीचं विलिनीकरण शक्य; त्या एका अटीबाबत रोहित पवारांची..
...तरच राष्ट्रवादीचं विलिनीकरण शक्य; त्या एका अटीबाबत रोहित पवारांची मोठी प्रतिक्रिया
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक...
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक यांनी सांगितला भाजपचा खास प्लॅन
तीन टेस्ट, पक्षाची संघटना ते निवडणूक आयोगाची भूमिका, शिंदे गटाचा युक्त
तीन टेस्ट, पक्षाची संघटना ते निवडणूक आयोगाची भूमिका, शिंदे गटाचा युक्तिवाद काय? वाचा महत्त्वाचे मुद्दे
आता मूळ पक्ष कोणता हा मुद्दा... आजच्या सुनावणीतील महत्त्वाचे अपडेट्स
Shivsena Hearing : आता मूळ पक्ष कोणता हा मुद्दा... आजच्या सुनावणीतील महत्त्वाचे अपडेट्स
मुंबईतील जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोर्टात याचिका, नेमकं..
मुंबईतील जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोर्टात याचिका, नेमकं काय घडतंय?
आदिवासी शाळांची दुरवस्था समोर आणण्यासाठी सीजेपीचे ‘स्कूल ठीक करो...
आदिवासी शाळांची दुरवस्था समोर आणण्यासाठी सीजेपीचे ‘स्कूल ठीक करो’ अभियानाची तुफान चर्चा