AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

8 लेकरांची माय, जावयावर जडला जीव; नंतर केलं नको ते कांड, सासरा कोमात…

Crime : आग्र्यातील 8 मुलांची आई जावयासोबत पळून गेल्याचे प्रकरण समोर आले आहे. अछनेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात ही घटना घडली आहे.

8 लेकरांची माय, जावयावर जडला जीव; नंतर केलं नको ते कांड, सासरा कोमात...
Agra CrimeImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: May 02, 2026 | 2:47 PM
Share

उत्तर प्रदेशातील आग्रा जिल्ह्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. 8 मुलांची आई जावयासोबत पळून गेल्याचे प्रकरण समोर आले आहे. अछनेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात ही घटना घडली आहे. विशेष म्हणजे तो जावईही पाच मुलांचा पिता आहे. या घटनेनंतर दोन्ही कुटुंबांमध्ये आणि संपूर्ण गावात खळबळ उडाली आहे. हे प्रकरण नेमकं काय आहे याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

समोर आलेल्या माहितीनुसार, ही संपूर्ण घटना एका कौटुंबिक लग्नसमारंभादरम्यान सुरू झाली. आरोपी जावई आपल्या सासरी आला होता. दुपारच्या सुमारास त्याने मेहंदीची पाने तोडण्याच्या बहाण्याने सासूला घरामागील शेतात बोलावलं. बराच वेळ दोघे न परतल्याने कुटुंबातील लोक त्यांना शोधण्यासाठी गेले. त्यावेळी कुटुंबीयांनी दोघांना आक्षेपार्ह अवस्थेत पाहिलं, ज्यामुळे घरात गोंधळ उडाला. पकडले जाण्याच्या भीतीने आणि गोंधळ वाढल्याने जावई आपल्या सासूला मोटारसायकलवर बसवून तेथून पळून गेला.

12 वर्षांपूर्वीपासून सुरू होती प्रेमकथा

ही सासू-जावयाची जोडी गेल्या काही काळापासून चर्चेत आहे. या कुटुंबातील दोन सख्ख्या भावांची लग्नं दोन सख्ख्या बहिणींशी झाली होती. लग्नानंतर तीन वर्षांनी मोठ्या जावयाचे आणि त्याच्या सासूची जवळीक वाढली. त्यावेळी 12 वर्षांपूर्वी ते एकदा घर सोडून पळून गेले होते. दोघांचा शोध घेतल्यानंतर दिल्लीतील एका कंपनीतून पकडून परत आणण्यात आलं होतं. कुटुंबाच्या प्रतिष्ठेसाठी दोघांवर कारवाई करण्यात आली नव्हती. मात्र आता पुन्हा एकदा दोघेजण पळून गेले आहेत.

कुटुंबाची बदनामी

आग्रा येथील या घटनेमुळे दोन्ही कुटुंबांना मोठा धक्का बसला आहे. पीडित पती, जो आठ मुलांचा पिता आहे, त्याला आपल्या पत्नी आणि जावयाच्या या कृत्यामुळे मोठा धक्का बसला आहे. तर पाच मुलांची आई असलेल्या आरोपीच्या पत्नीचीही अवस्था वाईट आहे. गावात या अनैतिक संबंधाबाबत विविध चर्चा सुरू आहेत. दोन्ही कुटुंबाची मोठ्या प्रमाणात बदनामी झाली आहे.

पोलीसांकडून तपासाला सुरुवात

या घटनेनंतर महिलेच्या पतीने या प्रकरणात फरह पोलीस ठाण्यात आपल्या जावयाविरुद्ध लेखी तक्रार दिली आहे. त्याने जावयावर आपल्या पत्नीला फूस लावून पळवून नेल्याचा आरोप केला आहे. आता पोलीस या प्रकरणाची गांभीर्याने चौकशी करत असून दोघांचा शोध घेण्यासाठी पथके नेमण्यात आली आहेत.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी