AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी | अयोध्येतलं राम मंदिर उडवून देण्याची धमकी, अल् कायदाचं भारतीय मुस्लिमांना ‘हे’ आवाहन

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरोधातही अल कायदाने जहरी वक्तव्य केली आहेत. भारतातल्या मुस्लिमांना जिहादचं समर्थन करण्याचंही आवाहन केलंय.

मोठी बातमी | अयोध्येतलं राम मंदिर उडवून देण्याची धमकी, अल् कायदाचं भारतीय मुस्लिमांना 'हे' आवाहन
Image Credit source: social media
| Updated on: Jan 06, 2023 | 9:01 AM
Share

नवी दिल्लीः अवघ्या देशाचं लक्ष लागलेलं अयोध्येतील राम मंदिर (Ram Temple) कधी उघडणार याची तारीख कालच गृहमंत्री अमित शाह (Amit shah) यांनी घोषित केली. अन् आज दुसऱ्या दिवशी मोठी बातमी समोर आली आहे. उत्तर प्रदेश राज्यातील अयोध्येतील हे राम मंदिर उडवून देण्याची धमकी अल कायदा (al Qaeda) या दहशतवादी संघटनेने दिल्याचं वृत्त हाती आलं आहे.

आंतरराष्ट्रीय जिहादी संघटनेने गझवा-ए-हिंद या त्यांच्या नियतकालिकात यासंबंधीची धमकी दिली आहे.  या नियतकालिकाच्या ताज्या अंकात अल कायदा ही संघटना अयोध्येतील राम मंदिर तोडून त्या ठिकाणी मस्जिद बांधणार असल्याचं म्हटलं आहे.

तसेच जिहादी समूहाच्या एका ऑनलाइन पत्रिकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात गरळ ओकण्यात आली आहे. भारतातील सर्व मुस्लिमांना या जिहादमध्ये सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलंय.

माध्यमांतील वृत्तांनुसार, सदर 110 पानांचे नियतकालिक आहे. संपादकीयात म्हटलंय की, ज्या प्रकारे बाबरी मशिदीच्या ढाच्यावर राम मंदिर बांधण्यात येतंय, ते पाडलं जाईल. मूर्तींच्या जागी अल्लाहच्या नावाने बाबरी मशिद बांधली जाईल. या सगळ्यासाठी बलिदान हवंय.

विशेष म्हणजे या नियतकालिकातील मजकूर हा एखाद्या भारताशी संबंधित व्यक्तीने लिहिला असल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय

मुस्लिमांना काय आवाहन ?

अल कायदाने भारतीय मुस्लिमाना आवाहन केलंय की, तुम्ही या मुद्द्यात भौतिक नुकसानाला घाबरू नका. अनेक दशकांपासून जीवन आणि संपत्तीचं नुकसान आपण झेललंय. हे जीवन जिहादसाठी वापरलं असतं तर एवढं नुकसान झालं नसतं….

भारतीय मुस्लिमांनी लक्षात ठेवावं… धर्मनिरपेक्षता ही नरकासमान आहे. हिंदु-मुस्लिम भाईचारा हे धोकादायक ठरू शकते.

पत्रिकेत पुढे म्हटलंय, ही केवळ पोकळ चर्चा नाहीये. बाबरी मशीद ३० वर्षांपूर्वी पाडण्यात आली होती. गुजरातमधील अहमदाबादेत २० वर्षांपूर्वी गर्भवती महिलांना बाळासह पोट कापून जाळण्यात आलं होतं. आज सर्वत्र बुलडोझर चालवण्यात येत आहेत. जामिया मिलिया (इस्लामिया) आणि अलीगडपासून जामिया उस्मानिया (हैदराबाद उपनगर) तसेच देवबंद शहरापर्यंत हिंदूंकडून धोका आहे.

हिंदूंना लाठ्या-काठ्या शिकवल्या जातायत-अल कायदा

अलकायदाने पुढे म्हटलंय, सर्वच हिंदूंना लाठ्या-काठ्या शिकवल्या जात आहेत. हिंदू महिलांकडून मुस्लिमांचे चेहरे आणि डोकी छाटण्याची भाषा केली जातेय. अल कायदा या सगळ्याला जिहादने उत्तर देणार आहे. यामुळे संपूर्ण भारतीय उपखंड इस्लामी जगाचा भाग बनेल आणि मूर्तीपूजा बंद होईल…

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...