AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पळून जाऊन लग्न करताय? पोलीस संरक्षण देणार का? कोर्टाचा हा निकाल वाचाच

Allahabad High Court Decision : पळून जाऊन लग्न करताय, अथवा करण्याचा विचार करत असाल तर मग हा बातमी वाचाच. तुम्ही प्रेम विवाह करून पोलिसांकडून संरक्षण घेण्याचा विचार करत असाल तर कोर्टाचा हा निकाल एकदा वाचाच.

पळून जाऊन लग्न करताय? पोलीस संरक्षण देणार का? कोर्टाचा हा निकाल वाचाच
काय म्हणाले हायकोर्ट?Image Credit source: गुगल
| Updated on: Apr 17, 2025 | 10:02 AM
Share

लग्न हा आयुष्यातील मोठा टप्पा असतो. काही घरच्यांच्या मर्जीने लग्नाची गाठ बांधतात. तर काही जण इश्‍काच्या धुंदीत पळून जाऊन लग्न करतात. काहींना प्रेम विवाहाचे वेड असते. पळून जाऊन लग्न करताय, अथवा करण्याचा विचार करत असाल तर मग हा बातमी वाचाच. तुम्ही प्रेम विवाह करून पोलिसांकडून संरक्षण घेण्याचा विचार करत असाल तर कोर्टाचा हा निकाल एकदा वाचाच.

कोर्टाचा निकाल काय?

अलाहाबाद हायकोर्टाने एका याचिकेत महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. आई-वडिलांच्या मर्जीविरोधात, त्यांच्या पसंतीविरोधात लग्न करणारे प्रेमी जोडपे पोलीस सुरक्षेचा दावा करू शकत नाही, असा निकाल कोर्टाने दिला आहे. जोपर्यंत त्यांचे जीविताला आणि स्वातंत्र्याला धोका होत नाही, तोपर्यंत ते पोलीस सुरक्षेसाठी दावा करू शकत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

तरच पोलीस संरक्षणाचा दावा

न्यायमूर्ती सौरभ श्रीवास्तव यांच्या खंडपीठासमोर प्रकरणात सुनावणी झाली. एका जोडप्याने पोलीस संरक्षण मिळावे यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यांनी पोलीस संरक्षण देण्याची विनंती याचिकेत केली होती. सुनावणीअंती न्यायालयाने स्वतःच्या इच्छेने लग्न करणाऱ्या जोडप्यांना पोलीस संरक्षणाचा अधिकार नसल्याचे स्पष्ट केले. त्यांच्या जीविताला अथवा त्यांच्या स्वातंत्र्याला जर धोका असेल तरच ते पोलीस संरक्षण मागू शकतात असे हायकोर्टाने निकालात स्पष्ट केले.

मग समाजाचा सामना करा

योग्य प्रकरणात प्रेमी जोडपे न्यायालयात पोलीस संरक्षणासाठी याचिका दाखल करू शकतात. पण त्यांच्या समोर जर कोणत्याही प्रकारचा धोका नसेल. त्यांच्या कुटुंबाकडून जीविताला धोका नसेल तर प्रेम विवाह करणाऱ्या दोघांनी एकमेकांचा आधार व्हायला हवे. तरुण आणि तरुणीने एकमेकांना मदत करायला हवी. या दोघांनी समाजाचा सामना करायला हवा. याप्रकरणात याचिकाकर्त्यांचे जबाब, कुटुंबाची मते आणि त्याविषयीची कागदपत्रे कोर्टात सादर करण्यात आली होती. त्यात या प्रेमी जोडप्याला कुठलाही धोका नसल्याचे समोर आले. त्यामुळे न्यायालयाने योग्य तो निकाल देत ही याचिका निकाली काढली.

Follow Us
अजितदादांच्या अपघाताला 2 महिने झाले तरी उद्याप न्याय मिळाला नाही
अजितदादांच्या अपघाताला 2 महिने झाले तरी उद्याप न्याय मिळाला नाही.
बुलढाण्यात इंधन टंचाई; एकाच पंपावर गर्दी, अफवांमुळे तुटवडा वाढला?
बुलढाण्यात इंधन टंचाई; एकाच पंपावर गर्दी, अफवांमुळे तुटवडा वाढला?.
ठाकरेंच्या काळात पाणी दिलं हा आरोप दिशाभूल करणारा
ठाकरेंच्या काळात पाणी दिलं हा आरोप दिशाभूल करणारा.
पेट्रोल-डिझेल दरवाढीबाबत फडणवीसांचं मोठं विधान
पेट्रोल-डिझेल दरवाढीबाबत फडणवीसांचं मोठं विधान.
लॉकडाऊन लागणार नाही, अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार - CM फडणवीस
लॉकडाऊन लागणार नाही, अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार - CM फडणवीस.
छत्रपती संभाजीनगर महापालिकेत सभागृहात गोंधळ; ठाकरेंच्या नगरसेवकांना...
छत्रपती संभाजीनगर महापालिकेत सभागृहात गोंधळ; ठाकरेंच्या नगरसेवकांना....
बुलढाणा चांदी बाजारात मंदी; LPGच्या तुटवड्यामुळे दागिन्यांचे काम ठप्प
बुलढाणा चांदी बाजारात मंदी; LPGच्या तुटवड्यामुळे दागिन्यांचे काम ठप्प.
राजकारण संपल्यानंतर काय करणार? पंकजा मुंडे यांचं मोठं विधान काय?
राजकारण संपल्यानंतर काय करणार? पंकजा मुंडे यांचं मोठं विधान काय?.
सुप्रिया सुळेंच्या त्या वक्तव्यावर काँग्रेसची टीका; फडणवीस यांच्या....
सुप्रिया सुळेंच्या त्या वक्तव्यावर काँग्रेसची टीका; फडणवीस यांच्या.....
पुन्हा लॉकडाऊन?केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरींचं ट्विट काय
पुन्हा लॉकडाऊन?केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरींचं ट्विट काय.