Delhi Metro Stations : लंच पर्यंत बघतो, नाही तर मग..16 मेट्रो स्टेशन्स बंद, मुख्य न्यायाधीशांचं महत्वाचं वक्तव्य

Delhi Metro Stations : भाजपने मेट्रो स्टेशन्स बंद करण्याऐवजी विद्यार्थ्यांसोबत चर्चा केली पाहिजे असं विरोधी पक्षाच्या नेत्यांनी म्हटलं आहे. दिल्लीतल्या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे.

Delhi Metro Stations : लंच पर्यंत बघतो, नाही तर मग..16 मेट्रो स्टेशन्स बंद, मुख्य न्यायाधीशांचं महत्वाचं वक्तव्य
Supreme Court
| Updated on: Jul 23, 2026 | 11:59 AM

दिल्लीत जंतर-मंतरवर सीजेपीचं आंदोलन सुरु आहे. हजारो विद्यार्थी या आंदोलनात सहभागी झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर 16 मेट्रो स्टेशन्स बंद करण्यात आली आहेत. हा विषय आता सुप्रीम कोर्टात पोहोचला आहे. सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष विकास सिंह यांनी CJI सूर्यकांत यांच्या बेंचसमोर हा विषय उपस्थित केला. लंचपर्यंत मेट्रो स्टेशन्स उघडण्यासाठी काही निर्णय झाला नाही तर आम्ही हस्तक्षेप करु असं विकास सिंह यांनी म्हटलं आहे. न्यायालयाने दखल देण्याची गरज भासू शकते असं सीजेआय म्हणाले. लंच पर्यंत त्यांनी काही केलं नाही, तर आम्ही दखल देऊ असं न्यायालयाने म्हटलं आहे.

राजीव चौक, केंद्रीय सचिवालय, मंडी हाउस, आयटीओ आणि खान मार्केट सह दिल्लीतील 16 मेट्रो स्टेशन्स पुढील आदेशापर्यंत सुरक्षाकारणांमुळे गुरुवार सकाळपर्यंत बंद करण्यात आले आहेत. दिल्ली मेट्रो रेल कॉरपोरेशनने (डीएमआरसी) ही माहिती दिली. जंतर-मंतर वर सुरु असलेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनात गर्दी वाढल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

कुठली स्टेशन्स बंद?

राजीव चौक, मंडी हाउस आणि केंद्रीय सचिवालय मेट्रो स्टेशन्सवर लाइन बदलण्यासाठी प्रवाशांना सुविधा उपलब्ध असेल. डीएमआरसीने सोशल मीडिया मंच एक्स वर एक पोस्ट केलीय. त्यानुसार लोक कल्याण मार्ग, राजीव चौक, पटेल चौक, रामकृष्ण आश्रम मार्ग, बाराखंभा रोड, सुप्रीम कोर्ट, सेवा तीर्थ, जनपथ, मंडी हाउस, केंद्रीय सचिवालय, आयटीओ, दिल्ली गेट, इंद्रप्रस्थ, खान मार्केट, जोर बाग आणि शिवाजी स्टेडियम मेट्रो स्टेशन्स पुढील आदेशापर्यंत बंद करण्यात आले आहेत.

भाजपने मेट्रो स्टेशन्स बंद करण्याऐवजी…

सुरक्षा कारणांमुळे दिल्लीतील जवळपास 16 मेट्रो स्टेशन्स बुधवारी जवळपास आठ तास बंद होते. त्यामुळे ऑफिसला जाणारे हजारो लोक, विद्यार्थी आणि प्रवासी अडकले. दिल्ली मेट्रो रेल निगम डीएमआरसीने सकाळी 16 स्टेशन्स बंद केले होते.दुपारी झंडेवालानचा सुद्धा यात समावेश करण्यात आला. संध्याकाळी ही सर्व स्टेशन्स पुन्हा सुरु झाली. भाजपने मेट्रो स्टेशन्स बंद करण्याऐवजी विद्यार्थ्यांसोबत चर्चा केली पाहिजे असं विरोधी पक्षाच्या नेत्यांनी म्हटलं आहे.

Follow Us