AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वाराणसीतून सुरु होणार २ अमृत भारत ट्रेन, युपी-महाराष्ट्राची कनेक्टिव्हीटी होणार सुपरफास्ट

रेल्वे प्रवाशांच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आहे. २८ एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाराणसी येथून दोन नव्या अमृत भारत ट्रेनची सुरुवात होणार आहे. या ट्रेनमुळे महाराष्ट्र ते वाराणसी कनेक्टीव्हीटी चांगली वाढणार आहे.

वाराणसीतून सुरु होणार २ अमृत भारत ट्रेन, युपी-महाराष्ट्राची कनेक्टिव्हीटी होणार सुपरफास्ट
amrit bharat trains
| Updated on: Apr 24, 2026 | 3:54 PM
Share

रेल्वे प्रवाशांच्या दृष्टीने आनंदाची बातमी आहे. येत्या २८ एप्रिलपासून वाराणसीतून दोन नवीन अमृत भारत ट्रेनची सुरुवात होणार आहे. ज्यामुळे उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्राच्या दरम्यानचा प्रवास अधिक जलद आणि सोपा आणि स्वस्त होणार आहे. या दोन ट्रेन सुरु झाल्यानंतर लांबचा प्रवास करणारे प्रवासी आणि धार्मिक पर्यटन करणाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी २८ एप्रिल रोजी या दोन नवीन अमृत भारत ट्रेना हिरव्या झेंडा दाखवून रवाना करणार आहेत.

या दोन मार्गांवर धावणार नवीन ट्रेन

यातील पहिली ट्रेन वाराणसी ( बनारस ) ते हडपसर ( पुणे ) दरम्यान चालविली जाणार असून या ट्रेनचा क्रमांक 22589/22590 असा आहे. ही ट्रेन प्रयागराज, झाँसी, इटारसी आणि भुसावळ सारख्या प्रमुख स्थानकांवर थांबा घेणार आहे. या मार्गाचा प्रवासाचा वेळ सुमारे २८ ते ३० तास असा असणार आहे. दुसरी ट्रेन अयोध्या ते मुंबई दरण्यान चालविली जाणार आहे. ही ट्रेन उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातून मुंबईत पोहचणार आहे.या ट्रेनमुळे उत्तर भारत आणि आर्थिक राजधानी मुंबईची कनेक्टिव्ही आणखी मजबूत होणार आहे..

प्रवाशांना मिळणार खास सुविधा –

अमृत भारत ट्रेन आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असणार आहेत. यात पुश-पुल तंत्राचा वापर केला जाणार आहे, ज्यामुळे ट्रेनचा वेग आणि परऑर्मेन्स चांगला असेल . या ट्रेनमध्ये नॉन-एसी कोच असणार आहे. ज्यात बहुतांशी स्लीपर आणि जनरल डब्यांचा समावेश केला आहे. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना स्वस्तात प्रवास करण्याचा पर्याय मिळणार आहे. याशिवाय आरामदायक सीटींग आणि इतर आवश्यक सुविधा देखील मिळणार आहेत.

कोणत्या लोकांना जास्त फायदा –

या ट्रेनचा फायदा खासकरुन धार्मिक पर्यटन करणाऱ्या प्रवाशांना आणि लांबपल्ल्याच्या प्रवाशांना होणार आहे. अयोध्या आणि वाराणसी सारख्या शहरांना मुंबई सारख्या शहराला जोडल्याने धार्मिक आणि व्यावसायिक दोन्ही प्रवास सोपे होणार आहेत.

प्रवास स्वस्त आणि वेळेची बचत –

नवीन ट्रेन सुरु झाल्याने प्रवाशांना थेट कनेक्टिव्हीटी मिळेल, ज्यामुळे वारंवार ट्रेन बदलण्याची गरज राहणार नाही. यामुळे न केवळ वेळेची बचत होईल. शिवाय प्रवास खूप स्वस्तात होईल. सरकारचे हे पाऊल देशाच्या रेल्वे नेटवर्कला मजबूत करण्याच्या दिशेने एक मोठा प्रयत्न मानला जात आहे. युपी आणि महाराष्ट्र सारख्या मोठ्या राज्यात चांगल्या कनेक्टिव्हीटीमुळे व्यापार, पर्यटन आणि सर्वसामान्य लोकांना प्रवास करणे सोपे होणार आहे.

Follow Us
जळगावात महायुती विरुद्ध महायुती? रेश्मा काळेंचा बंडखोर पवित्रा कायम
Jalgaon | जळगावात महायुती विरुद्ध महायुती? रेश्मा काळेंचा बंडखोर पवित्रा कायम
मुंबई ते दिल्ली प्रवासाआधीच विमानात बिघाड होताच... प्रवासाबाबत सुनेत्र
मुंबई ते दिल्ली प्रवासाआधीच विमानात बिघाड होताच... प्रवासाबाबत सुनेत्रा पवार काय म्हणाल्या?
राज्य थरथरलं! अनेक वर्ष चालला काळा कारभार, अल्पवयीन मुलीवर दोघं...भाजप
राज्य थरथरलं! अनेक वर्ष चालला काळा कारभार, अल्पवयीन मुलीवर दोघं... भाजप नगरसेविकेच्या भावाचं हादरवणारं कांड
गोकुळ गीते यांचं बंड आता थंड होण्याची दाट शक्यता?
Gokul Gite Nashik | नाशिकच्या राजकारणात गेमचेंजर घडामोड; गोकुळ गीते यांचं बंड आता थंड होण्याची दाट शक्यता
पाणी सोडलं नाही म्हणून थेट वस्तीवर हल्ला! बुलढाण्यात तुफान राडा
Buldhana News | पाणी सोडलं नाही म्हणून थेट वस्तीवर हल्ला! बुलढाण्यात तुफान राडा, 15 जण जखमी
मोठी बातमी! बड्या अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडलं; सापळा रचला अन् धडक कारवाई
मोठी बातमी! बड्या अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडलं; सापळा रचला अन् धडक कारवाई, चक्क 6 लाख...
पंढरपुरात राजकीय भूकंप! तीर्थक्षेत्र आघाडीचे 9 नगरसेवक भाजपच्या तंबूत
Pandharpur | पंढरपुरात राजकीय भूकंप! तीर्थक्षेत्र आघाडीचे 9 नगरसेवक भाजपच्या तंबूत
अखंडित काँग्रेस उभी राहणार? शरद पवार यांना पुढाकार घेण्याचं राऊतांचं
अखंडित काँग्रेस उभी राहणार? शरद पवार यांना पुढाकार घेण्याचं राऊतांचं आवाहन; देशात मोठ्या उलथापालथी होणार?
पंडित नेहरुंचा कार्यकाळ बारा नाहीतर सोळा वर्षांचा... संजय राऊतांनी
पंडित नेहरुंचा कार्यकाळ 12 नाहीतर 16 वर्षांचा... संजय राऊतांनी मांडलं गणित, काय म्हणाले?
जगातील सर्वात मोठ्या FIFA World Cup ला सुरुवात; भारत World Cup बाहेर?
FIFA World Cup 2026 | जगातील सर्वात मोठ्या FIFA World Cup ला सुरुवात; 104 सामन्यांचा रंगणार थरार, पण भारत पुन्हा World Cup बाहेर?