AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Love Story : आमच्या मृत मुलीच्या गळ्यात मंगळसूत्र बांध तरच..8 वर्षाच्या प्रेमाची दुर्देवी गोष्ट, आई-वडिलांनी कीर्तीचा मृतदेह प्रियकराच्या दारात नेला

Love Story : साई सुमंता सध्या कतरमध्ये सॉफ्यवेअर इंजिनिअर म्हणून नोकरी करत होता. वेगवेगळ्या शहरात, देशात राहत असूनही दोघे परस्परांच्या संपर्कात होते. वेळोवेळी ते भेटायचे.

Love Story : आमच्या मृत मुलीच्या गळ्यात मंगळसूत्र बांध तरच..8 वर्षाच्या प्रेमाची दुर्देवी गोष्ट, आई-वडिलांनी कीर्तीचा मृतदेह प्रियकराच्या दारात नेला
Love Story
| Updated on: Jul 18, 2026 | 11:32 AM
Share

काही जणांना प्रेमात अपयश पचवता येत नाही. प्रेमात अपयश आलं म्हणून ते टोकाचा निर्णय घ्यायला मागे-पुढे पाहत नाहीत. यात एकतर ते आपल्या जोडीदाराला संपवतात किंवा स्वत:ला. अड्डागल्ला कीर्तीने (24) सुद्धा असाच आई-वडिलांचा कुठलाही विचार न करता टोकाचा निर्णय घेतला. पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या कीर्तीने प्रेमात अपयश आलं म्हणून स्वत:च जीवन संपवलं. मुंबईत नोकरीला असलेली किर्ती पीजी हॉस्टेलमध्ये रहायला होती. 14 जुलै रोजी तिने हॉस्टेलच्या रुममध्ये आपलं जीवन संपवून घेतलं. आंध्र प्रदेशच्या प्रकाशम जिल्ह्यातील तंगुतुरु मंडलच्या पाँडुरु गावात रहाणाऱ्या साई सुमंता बरोबर तिची सोशल मीडियावरुन ओळख झाली. ओळखीचं रुपांतर हळूहळू प्रेमात झालं.

आठ वर्षांपासून दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. पण साई सुमंता तिच्याबरोबर लग्न करायला तयार नव्हता. म्हणून किर्तीने आयुष्य संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला. किर्तीच्या अशा अकाली मृत्यूने तिच्या आई-वडिलांच्या मनाला खूप वेदना झाल्या. किर्तीचे पालक आणि नातेवाईक तिचा मृतदेह साईच्या पाँडुरु गावी घेऊन गेले. आमच्या मृत मुलीच्या गळ्यात मंगळसूत्र बांध. त्यानंतरच मृतदेहावर अंत्यसंस्कार करु अशी मागणी किर्तीचे सर्व नातेवाईक करत होते. त्यामुळे काही काळ पाँडुरु गावात तणाव निर्माण झालेला. पोलीस आणि ग्रामस्थांनी समजूत काढल्यानंतर किर्तीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलीस आता या प्रकरणी चौकशी करतायत.

त्यामुळे ती खचून गेली

साई सुमंता सध्या कतरमध्ये सॉफ्यवेअर इंजिनिअर म्हणून नोकरी करत होता. वेगवेगळ्या शहरात, देशात राहत असूनही दोघे परस्परांच्या संपर्कात होते. वेळोवेळी ते भेटायचे. किर्तीच्या नातेवाईकांनी सांगितलं की, अलीकडचे साईच्या कुटुंबाने त्याचं लग्न दुसऱ्या युवतीसोबत ठरवलेलं. या बद्दल समजल्यानंतर मला तुझ्याशीच लग्न करायचं आहे, असं किर्तीने साईला सांगितलं. पण त्याने नकार दिला. त्यामुळे ती खचून गेली होती. यानंतर दोन्ही कुटुंबांमध्ये ओंगोल येथे बोलणं झालं. पण काही तोडगा निघाला नाही. साई लग्नासाठी तयार झाला नाही. मग किर्तीला समजावून पुन्हा मुंबईला पाठवण्यात आलं. पण तिने जीवन संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला.

Follow Us
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट; सप्टेंबरमध्येही कमी पावसाचा अंदाज
हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते?
Krushnaraj Mahadik On MNS | हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते? म्हणत कृष्णराज महाडिक आक्रमक
मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी...
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी हालचालींना वेग!
आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम
Praveen Swami | आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम, प्रवीण स्वामी थेट म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी..
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी व्यापाऱ्यांना आणखी 1 वर्षाची दिली मुभा
भाजप कार्यकर्त्यांना येऊ द्या, पण... मनसेचा थेट इशारा काय?
MNS | भाजप कार्यकर्त्यांना येऊ द्या, पण जाताना त्यांच्यासाठी ॲम्बुलन्स पाठवावी!; मनसेचा थेट इशारा
अंधारेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल; रंग बदलू फडणवीस! म्हणत बावनकुळे...
Sushma Andhare on Bawankule | सुषमा अंधारेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल; रंग बदलू फडणवीस! म्हणत बावनकुळे अन् मोदींनाही घेरलं
माहिममध्ये भाजप युवा मोर्चाचे अमित ठाकरेंविरोधात आंदोलन
BJP Protest Against Amit Thackeray : माहिममध्ये भाजप युवा मोर्चाचे अमित ठाकरेंविरोधात आंदोलन
50 लाखांच्या फॉर्च्युनर, HSRP प्लेट नाही! पडळकरांच्या गाड्यांवरून वाद
Gopichand Padalkar | 50 लाखांच्या फॉर्च्युनर, पण HSRP प्लेट नाही! गोपीचंद पडळकरांच्या गाड्यांवरून नवा वाद; व्हिडीओ होतोय व्हायरल
सीजेपीचा 5 सप्टेंबरचा दिल्ली मोर्चा अखेर रद्द! सौरभ दास यांची घोषणा
CJP Protest | सीजेपीचा 5 सप्टेंबरचा दिल्ली मोर्चा अखेर रद्द! सुप्रीम कोर्टातील सुनावणीनंतर सौरभ दास यांची मोठी घोषणा