AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ओडिशातील ‘त्या’ अपघातापेक्षाही मोठी दुर्घटना घडली असती; कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे अनेकांचे वाचले जीव…

ओडिशा दुर्घटनेनंतर तामिळनाडूतील रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली आहे. त्यामुळे हे एक मोठे संकट टळले आहे.साहजिकच कर्मचाऱ्यांनी सतर्कता दाखवली नसती तर रेल्वेचा आणखी एक मोठा अपघात घडला असता.

ओडिशातील 'त्या' अपघातापेक्षाही मोठी दुर्घटना घडली असती; कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे अनेकांचे वाचले जीव...
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: Jun 06, 2023 | 12:25 AM
Share

 चेन्नई :  तामिळनाडूतील रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे आणखी रेल्वेचा मोठा अपघात होता होता टळला. तामिळनाडूमध्ये रेल्वेच्या डब्याच्या चेसिसला तडा गेल्याने रेल्वे अधिकाऱ्यांच्या सावधानगिरीमुळे हा मोठा अपघात टळला. याविषयी अधिकाऱ्यांनी तात्काळ कोल्लम-चेन्नई एक्स्प्रेस रेल्वेला जोडलेला डबा वेगळा करण्यात आला. ओडिशातील मोठ्या रेल्वे अपघातानंतर ही घटना समोर आल्याने अनेकांना याचा धक्का बसला आहे. ओडिशाती अपघातात 275 लोकं ठार झाली असून 1 हजारहून अधिक जण जखमी झाले.

तामिळनाडूमधील सेंगोटाई रेल्वे स्थानकावर रोलिंग स्टॉकच्या तपासणीदरम्यान रविवारी संध्याकाळी रेल्वेच्या बोगीत तडा गेल्याचे कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले.

यावेळी दक्षिण रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, काल रविवारी दुपारी 3:36 वाजता, तामिळनाडूतील सेंगोटाई स्थानकात प्रवेश करताना त्या रेल्वेतील एका डब्याला तडा गेल्याचे दिसून आले.

तडा गेल्याचे लक्षात आल्यानंतर हा डबा त्या ट्रेनमधून वेगळा करून नवीन डबा जोडण्यात आला. तो डबा वेगळा करण्यासाठी किमान एक तास उशीर झाल्याने काही रेल्वेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला होता.

याविषयी दक्षिण रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, डब्याला असलेले क्रॅक शोधणाऱ्या कर्मचाऱ्यांचे यानिमित्ताने रेल्वेकडून सत्कार करण्यात येणार आहे.

डब्याजवळ हा तडा गेल्याने त्यामुळे रेल्वेचा मोठा अपघात झाला असता. कामगारांनी सतर्कता दाखवली नसती तर मोठा अनर्थ घडला असता.

ओडिशामध्ये शुक्रवारी संध्याकाळी मोठा रेल्वे अपघात झाला आहे, त्यामध्ये 275 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे, आणि 1 हजाराहून अधिक लोक जखमी झाले आहेत. या ओडिशातील त्या अपघातानंतर अजूनही तेथील रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले आहे.

ओडिशा दुर्घटनेनंतर तामिळनाडूतील रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली आहे. त्यामुळे हे एक मोठे संकट टळले आहे.साहजिकच कर्मचाऱ्यांनी सतर्कता दाखवली नसती तर रेल्वेचा आणखी एक मोठा अपघात घडला असता.

Follow Us
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न.
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट....
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांचा मराठ्यांसाठी एल्गार, सरकार वारंवार...
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांचा मराठ्यांसाठी एल्गार, सरकार वारंवार....