AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ज्योती मल्होत्राचा आणखी एक धक्कादायक व्हिडीओ समोर, पाहा भारत सरकारबद्दल काय म्हणाली होती?

युट्युबर ज्योती मल्होत्राला अटक करण्यात आली आहे. पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा तिच्यावर आरोप आहे. ज्योती मल्होत्राला अटक केल्यानंतर आता तिचा आणखी एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.

ज्योती मल्होत्राचा आणखी एक धक्कादायक व्हिडीओ समोर, पाहा भारत सरकारबद्दल काय म्हणाली होती?
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: May 18, 2025 | 9:35 PM
Share

युट्युबर ज्योती मल्होत्राला अटक करण्यात आली आहे. पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा तिच्यावर आरोप आहे. ज्योती मल्होत्राला अटक केल्यानंतर आता तिचा आणखी एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतरचा आहे. या व्हिडीओमध्ये ज्योती मल्होत्राने पहलगाम हल्ल्यासाठी भारत सरकारला जबाबदार धरलं आहे. कुठेतरी आपण या हल्ल्यासाठी जबाबदार आहोत. जम्मू काश्मीरमध्ये एवढी सुरक्षा असताना देखील असा हल्ला झाला, याचा विचार व्हायला पाहिजे असं तिने आपल्या या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.

ज्योती मल्होत्राने नेमकं काय म्हटलं?

जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला होता, या हल्ल्यामध्ये 26 जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले, या हल्ल्यानंतरचा हा ज्योती म्हल्होत्राचा व्हिडीओ आहे.या हल्ल्यासाठी तीने सरकारला जबाबदार धरलं आहे. ही केवळ सरकारची जबाबदारी नाही तर जम्मू काश्मीरमध्ये येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाची जबाबदारी आहे. पर्यटकांनी देखील सावध असायला हवं. मला माहीत आहे की, जम्मू -काश्मीरमध्ये ठिक-ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त असतो. कडक सुरक्षा व्यवस्था असते. मोठ्या प्रमाणात सुरक्षादलाचे जवान तैनात असतात. मात्र तरी देखील अशा प्रकारचा हल्ला झाला आहे. या सर्वांसाठी आपणच जबाबदार आहोत. कारण हा हल्ला आपल्या चुकीमुळे झाला आहे. आपण सतत सावध असलं पाहिजे, असं तिने म्हटलं आहे.

हा हल्ला झाल्यानंतर ज्योती मल्होत्रा सरकारला ज्ञान देताना दिसत आहे. पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला आहे, जर या दहशतवाद्यांना कोणी सपोर्ट करत असेल तर तो भारतीय असूच शकत नाही. दहशतवाद हा प्रत्येक देशासाठी मोठा धोका आहे. जर कोणी अजूनही त्या दहशतवाद्यांचं समर्थन करत असेल तर ही खूप चुकीची गोष्ट आहे. या सर्वांसाठी कुठे नं कुठे तरी आपलं सरकार जबाबदार आहे. कारण सुरक्षेत कुठेनकुठे तरी चूक झाली आहे, ज्यामुळे हा हल्ला झाला असं ज्योती मल्होत्राने या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.

Follow Us
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!.
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार.....
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार......
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड......
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर.
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी.
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत.
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत...
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत....
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत.
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?.
शिरसाटांचा मोठा दावा- निदा खानला कोणी लपवलं? थेट त्या नेत्याचं नावच...
शिरसाटांचा मोठा दावा- निदा खानला कोणी लपवलं? थेट त्या नेत्याचं नावच....