AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऑपरेशन करण्यापूर्वी इथे डॉक्टर सर्वातआधी रुग्णांची जात विचारतात, कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का

एखाद्या व्यक्तीचं ऑपरेशन करायाचं आहे, तर अशा स्थितीमध्ये सर्वसामान्यपणे डॉक्टर त्या व्यक्तीच्या आरोग्याची माहिती घेतात. परंतु भारतामध्ये असे काही ठिकाणं आहेत, जिथे रुग्णाला सर्वात आधी त्याची जात विचारली जाते.

ऑपरेशन करण्यापूर्वी इथे डॉक्टर सर्वातआधी रुग्णांची जात विचारतात, कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का
ऑपरेशन करण्यापूर्वी डॉक्टर जात का विचारतात?Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 01, 2026 | 7:03 PM
Share

एखाद्या व्यक्तीचं ऑपरेशन करायचं असेल तर डॉक्टर सामान्यपणे त्या व्यक्तीची आरोग्यस्थिती जाणून घेतो. ऑपरेशन करण्यापूर्वी संबंधित रुग्णाचा बीपी किती आहे? शुगर किती आहे? त्याचा रक्तगट कोणता आहे? या सर्व गोष्टींची नोंद ठेवली जाते. तसेच पूर्वी या व्यक्तीला एखादा आजार होता का? त्याची मेडिकल हिस्ट्री देखील चेक केली  जाते. ऑपरेशन करण्यापूर्वी डॉक्टर संबंधीत रुग्णाच्या बदलत जाणाऱ्या आरोग्याच्या बाबतीत बारीक -बारीक तपशीलाची देखील नोंद करून ठेवतात, आणि त्यानंतर रुग्णाचं ऑपरेशन करण्यासाठी त्याला भूल दिली जाते.

परंतु तुम्ही कधी असं ऐकलं आहे का? की अशेही काही रुग्णालय आहेत, जिथे रुग्णाला ऑपरेशन करण्यापूर्वी त्याची जात विचारली जाते? हे तुम्हाला ऐकायला थोडं विचित्र वाटेल परंतु ही गोष्ट सत्य आहे, भारतामधील असे काही भाग आहेत, जिथे रुग्णाला ऑपरेशन करण्यापूर्वी त्याची जात विचारली जाते. त्या मागचं कारण देखील तितकचं महत्त्वाचं आहे.

तामिळनाडू, आध्रप्रदेश, तेलंगाणा, कर्नाटक सारख्या काही राज्यांमध्ये वास्तव्यास असलेल्या काही विशिष्ट समाजामध्ये जसं की, आर्य वैश्य तसेच कोमुट्टी चट्टियार समाजाच्या लोकांमध्ये अनुवंशिकपणे स्यूडोकोलिनस्टेरेज (Pseudocholinesterase)  नावाच्या एन्झाइमची कमतरता आढळते, जवळपास सर्वच लोकांमध्ये ही समस्या आढळते. यामुळे होतं असं की, जेव्हा ही समस्या एखाद्या व्यक्तीला असते, तेव्हा त्या व्यक्तीला भूलीचं इजेक्शन दिल्यानंतर त्याचा परिणाम हा इतर रुग्णांच्या तुलनेत खूप जास्त काळ  राहतो. अशा स्थितीमध्ये संबंधित रुग्णाच्या शरीरात काही गुंतागुंत वाढण्याचा धोका असतो. ही रीस्क टाळण्यासाठीच तामिळनाडू, कर्नाटक, तेलंगणा, आंध्रप्रदेश या सारख्या राज्यात काही रुग्णालयांमध्ये ऑपरेशन करण्यापूर्वी रुग्णाची जात विचारली जाते. या संदर्भात एका वृत्तवाहिनी माहिती दिली आहे.

त्या अनुषंगाने अधिक काळजी घेणं डॉक्टराला सोपं जातं. रुग्णाच्या शरीरात ऑपरेशन करण्यापूर्वी नेमकं किती भुलीचं औषध इजेक्ट करायचं आहे, याची मात्र ठरवता येते. त्यामुळे काही ठिकाणी डॉक्टर रुग्णालचं ऑपरेशन करण्यापूर्वी त्याची जात विचारतात, आणि त्यानुसार योग्य ते उपचार सुरू करतात.

Follow Us
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट; सप्टेंबरमध्येही कमी पावसाचा अंदाज
हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते?
Krushnaraj Mahadik On MNS | हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते? म्हणत कृष्णराज महाडिक आक्रमक
मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी...
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी हालचालींना वेग!
आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम
Praveen Swami | आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम, प्रवीण स्वामी थेट म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी..
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी व्यापाऱ्यांना आणखी 1 वर्षाची दिली मुभा
भाजप कार्यकर्त्यांना येऊ द्या, पण... मनसेचा थेट इशारा काय?
MNS | भाजप कार्यकर्त्यांना येऊ द्या, पण जाताना त्यांच्यासाठी ॲम्बुलन्स पाठवावी!; मनसेचा थेट इशारा
अंधारेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल; रंग बदलू फडणवीस! म्हणत बावनकुळे...
Sushma Andhare on Bawankule | सुषमा अंधारेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल; रंग बदलू फडणवीस! म्हणत बावनकुळे अन् मोदींनाही घेरलं
माहिममध्ये भाजप युवा मोर्चाचे अमित ठाकरेंविरोधात आंदोलन
BJP Protest Against Amit Thackeray : माहिममध्ये भाजप युवा मोर्चाचे अमित ठाकरेंविरोधात आंदोलन
50 लाखांच्या फॉर्च्युनर, HSRP प्लेट नाही! पडळकरांच्या गाड्यांवरून वाद
Gopichand Padalkar | 50 लाखांच्या फॉर्च्युनर, पण HSRP प्लेट नाही! गोपीचंद पडळकरांच्या गाड्यांवरून नवा वाद; व्हिडीओ होतोय व्हायरल
सीजेपीचा 5 सप्टेंबरचा दिल्ली मोर्चा अखेर रद्द! सौरभ दास यांची घोषणा
CJP Protest | सीजेपीचा 5 सप्टेंबरचा दिल्ली मोर्चा अखेर रद्द! सुप्रीम कोर्टातील सुनावणीनंतर सौरभ दास यांची मोठी घोषणा