AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घडामोडींना वेग! भाजपच्या सर्व आमदारांची दिल्लीत बैठक, मोठा निर्णय होण्याची शक्यता

BJP MLA Meeting : मणिपूरमध्ये सत्ता स्थापनेसाठी भाजपने तयारी सुरू केली आहे. भाजप हायकमांडने मणिपूरमधील आपल्या सर्व आमदारांना तसेच एनडीएच्या सहयोगी पक्षांच्या आमदारांना तातडीने दिल्लीला बोलावले आहे.

घडामोडींना वेग! भाजपच्या सर्व आमदारांची दिल्लीत बैठक, मोठा निर्णय होण्याची शक्यता
MJP MLAImage Credit source: Google
| Updated on: Feb 01, 2026 | 6:35 PM
Share

गेल्या वर्षी मणिपूरमध्ये मोठा हिंसाचार पहायला मिळाला होता. त्यामुळे या राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्यात आलेली आहे. आता काही दिवसांनी राष्ट्रपती राजवट संपणार आहे. त्यामुळे मणिपूरमध्ये सत्ता स्थापनेसाठी भाजपने तयारी सुरू केली आहे. भाजप हायकमांडने मणिपूरमधील आपल्या सर्व आमदारांना तसेच एनडीएच्या सहयोगी पक्षांच्या आमदारांना तातडीने दिल्लीला बोलावले आहे. त्यामुळे राजकीय चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

भाजपच्या आमदारांची दिल्लीत बैठक

भाजपने 31 जानेवारी रोजी पक्षाच्या आमदारांना 2 फेब्रुवारी रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत राष्ट्रीय राजधानीत उपस्थित राहण्याबाबत आदेश जारी केला आहे. आजच काही आमदार दिल्लीकडे रवाना झाले आहेत. पक्षाने हे अत्यंत महत्त्वाचे पाऊल अशावेळी उचलले आहे, जेव्हा राज्यातील राष्ट्रपती राजवट संपण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत. या राज्यात फेब्रुवारी 2025 पासून राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आलेली आहे, विधानसभेचे कामकाज स्थगित आहे. 12 फेब्रुवारी रोजी राष्ट्रपती राजवटीला एक वर्ष पूर्ण होणार आहे. त्यामुळे संभाव्य राजकीय पुनर्रचना, प्रशासन निर्णय आणि राज्याच्या भविष्यासाठी रोडमॅपची चर्चा करण्यासाठी आमदारांना दिल्लीत बोलावण्यात आले आहे.

भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने या बैठकीबाबत सविस्तर माहिती दिलेली नाही. मात्र या बैठकीत राजकीय पुनर्रचना, प्रशासन निर्णय आणि राज्याच्या भविष्यासाठी रोडमॅपची चर्चा होण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार भाजप प्रदेशाध्यक्ष ए. शारदा देवी यांनी आमदारांना दिल्लीत बोलावून घेतले आहे. तसेच भाजपचे ईशान्य समन्वयक संबित पात्रा यांनी आमदारांशी वैयक्तिकरित्या संपर्क साधला आहे, आता 2 फेब्रुवारी रोजी दिल्लीत ही बैठक पार पडणार आहे. या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

13 फेब्रुवारीला राष्ट्रपती राजवट संपणार

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 13 फेब्रुवारी रोजी मणिपूरमधील राष्ट्रपती राजवट संपणार आहे. त्यामुळे राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी शेवटचा प्रयत्न केला जाण्याची शक्यता आहे. आता एका आठवड्यात मणिपूरमध्ये नवीन सरकार स्थापन होऊ शकते. त्याच्यात तयारीसाठी भाजपने आपल्या आमदारांना दिल्लीत बोलावले आहे. त्यामुळे आता मणिपूरमध्ये कधी सरकार स्थापन होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
SRPF परीक्षेत खासगी प्रकाशनामधील ८५ प्रश्न जसेच्या तसे, कसं आलं समोर
SRPF परीक्षेत खासगी प्रकाशनामधील ८५ प्रश्न जसेच्या तसे, कसं आलं समोर.
...म्हणून नसरापूर प्रकरणातील आरोपीनं मोबाईल वापरणं बंद केलं होतं,
...म्हणून नसरापूर प्रकरणातील आरोपीनं मोबाईल वापरणं बंद केलं होतं,.
मोठी बातमी! ममता बॅनर्जी यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यास नकार
मोठी बातमी! ममता बॅनर्जी यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यास नकार.
भोंदू खरातसाठी 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी
भोंदू खरातसाठी 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी.
अमित शहा ठरवणार बंगालचा मुख्यमंत्री, पक्षाने दिली सर्वात मोठी जबाबदारी
अमित शहा ठरवणार बंगालचा मुख्यमंत्री, पक्षाने दिली सर्वात मोठी जबाबदारी.
8 ग्रॅम सोनं, महिलांना 2500 रुपये, थलापती निवडणुकीत विजयी कसा झाला?
8 ग्रॅम सोनं, महिलांना 2500 रुपये, थलापती निवडणुकीत विजयी कसा झाला?.
तिला कॅफेमध्ये बोलवलं अन्...एका चुकीमुळे भांडाफोड; बीडमधील आक्षेपार्ह
तिला कॅफेमध्ये बोलवलं अन्...एका चुकीमुळे भांडाफोड; बीडमधील आक्षेपार्ह.
फडणवीस सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये; नसरापूर प्रकरणानंतर नो पॅरोल धोरण लागू?
फडणवीस सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये; नसरापूर प्रकरणानंतर नो पॅरोल धोरण लागू?.
मोठी अपडेट! अत्याचारानंतर मुलीचा मृत्यू ऑस्फक्सियामुळे, मेंदूसह इतर...
मोठी अपडेट! अत्याचारानंतर मुलीचा मृत्यू ऑस्फक्सियामुळे, मेंदूसह इतर....
दिवाळीआधीच शिंदेंचा मोठा डाव? शिंदेंच्या ऑपरेशन टायगरची चर्चा.....
दिवाळीआधीच शिंदेंचा मोठा डाव? शिंदेंच्या ऑपरेशन टायगरची चर्चा......