तृणमूलचा भाजपला मोठा धक्का, ममता बॅनर्जींचं जोरदार कमबॅक, पश्चिम बंगालमध्ये विधानसभेनंतर दोनच महिन्यात वारं फिरलं

पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीमध्ये तृणमूल काँग्रेसचा मोठा पराभव झाला होता, भाजपला मोठं यश मिळालं होतं. मात्र आता राज्यातून मोठी बातमी समोर येत आहे. ममता बॅनर्जी यांनी भाजपला मोठा धक्का दिला आहे.

तृणमूलचा भाजपला मोठा धक्का, ममता बॅनर्जींचं जोरदार कमबॅक, पश्चिम बंगालमध्ये विधानसभेनंतर दोनच महिन्यात वारं फिरलं
Mamata Banerjee
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 20, 2026 | 8:54 AM

दोन महिन्यांपूर्वी पश्चिम बंगाल विधानसभेची निवडणूक झाली, या निवडणुकीमध्ये भाजपने ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वातील तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का दिला. या निवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय झाला तर तृणमूलला मात्र पराभवाचा सामना करावा लागला. पश्चिम बंगालमध्ये भाजपची सत्ता आली. दरम्यान पश्चिम बंगालमध्ये भाजपची सत्ता येताच, तृणमूलमध्ये मोठी फूट पडल्याचं पहायला मिळालं. तृणमूल जवळपास ममता बॅनर्जी यांच्य हातातून निसटल्याचं पहायला मिळत आहे. आधी आमदारांनी पक्षातून बंडखोरी करत आपला वेगळा गट स्थापन केला. त्यानंतर 20 खासदार देखील पक्षातून फुटले, तृणमूलला अशाप्रकारे एकामागून एक झटके बसत असताना आता पक्षासाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे, ती म्हणजे विधानसभा निवडणुकीनंतर दोन महिन्यांनी पुन्हा एकदा पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसने पुन्हा एकदा कमबॅक केलं आहे. भाजपला मोठा धक्का बसला आहे.

तृणमूल काँग्रेसने बार काउंसिलच्या निवडणुकीत आपला दबदबा पुन्ह एकदा कायम राखत, भाजपला धक्का दिला आहे. 23 जागांपैकी 15 जागा या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने जिंकल्या आहेत. तर दुसरीकडे भाजपला मात्र या निवडणुकीत पराभवाचा मोठा धक्का बसला आहे. भाजपला या निवडणुकीत केवळ तीनच जागा जिंकता आल्या आहेत. बार काउंसिलच्या 23 जागांसाठी ही निवडणूक झाली, या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला मोठं यश मिळालं आहे. बार काउंसीलच्या निवडणुकीत 23 पैकी 15 जागा जिंकून तृणमूलने सत्ता कायम ठेवली आहे, तर दुसरीकडे या निवडणुकीत भाजपला मात्र पराभवाचा मोठा धक्का बसला आहे. भाजपला या निवडणुकीत केवळ तीनच जागा जिंकता आल्या आहेत. तर काँग्रेसला दोन जागा मिळल्या आहेत.

गेल्या निवडणुकीत काय होतं चित्र?

भाजपला गेल्या निवडणुकीत देखील तीनच जागा मिळाल्या होत्या, याही निवडणुकीत तीनच जागा मिळाल्या आहेत. मात्र यावेळची स्थिती वेगळी होती, कारण नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला राज्यात मोठं यश मिळालं आहे. तृणमूल काँग्रेसला पराभवाचा धक्का बसला होता. मात्र असं असताना देखील या निवडणुकीत भाजपचा फार काही प्रभाव पडू शकला नाही, भाजपच्या अवघ्या तीनच जगा निवडून आल्या आहेत, तर तृणमूलला या निवडणुकीत मोठं यश मिळालं असून, तृणमूल काँग्रेसचे उमदेवार 15 जगांवर विजयी झाले आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us