AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सरकार कुणाचंही असो, मुख्यमंत्रिपद नीतीश कुमार यांच्याचकडे का?; बिहारच्या राजकारणातला ‘नीतीश फॅक्टर’ काय?

JDU Leader Nitish Kumar Career and Bihar Political Crisis : बिहारचे 'इंजिनिअर बाबू' ते नऊ वेळा बिहारचे मुख्यमंत्री; 17 वर्षं बिहारच्या राजकारणावर पकड ठेवण्यात नीतीश कुमार यशस्वी कसे झाले? सध्याच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर बिहारमधील 'नीतीश कुमार पॅटर्न' जाणून घेऊयात. वाचा सविस्तर...

सरकार कुणाचंही असो, मुख्यमंत्रिपद नीतीश कुमार यांच्याचकडे का?; बिहारच्या राजकारणातला 'नीतीश फॅक्टर' काय?
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Jan 28, 2024 | 2:58 PM
Share

पटना, बिहार | 28 जानेवारी 2024 : बिहारच्या राजकारणात मोठे बदल होत आहेत. नीतीश कुमार यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर आता थोड्याच वेळात एनडीए सरकारचा शपथविधी होणार आहे. नितीश कुमार पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. आज नितीश कुमार हे नवव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. पण इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलेले ‘इंजिनिअर बाबू’ बिहारच्या राजकारणात इतके महत्वाचे का ठरतात? मागची 17 वर्षे नीतीश कुमार यांची बिहारच्या राजकारणावर घट्ट पकड असण्याची कारणं काय आहेत? पाहुयात…

17 वर्षांपासून वर्चस्व कायम

बिहारच्या राजकारणात सतत बदल होत असतात. सातत्याने राजकीय युत्या आघाड्या होतात आणि त्या मोडतानाही दिसतात. अशात या राजकीय डावपेचात टिकून राहणं महत्वाचं ठरतं. यात नीतीश कुमार वरचढ ठरतात. कारण मागच्या 17 वर्षांपासून बिहारच्या राजकारणात सक्रीय आणि आपली स्पेशल स्पेस टिकवून आहेत. जरी आघाडी किंवा युती तोडली तरी बिहारमध्ये आपलं वर्चस्व निर्माण करण्यासाठी राजकीय पक्षांना नीतीश कुमार यांनी आपल्या बाजूने असणं फायदेशीर ठरतं.

युतीचं टायमिंग

सत्तेत एनडीए असो की युपीए… पण बिहारच्या मुख्यमंत्रिपदी मागच्या कित्येक वर्षांपासून एकच चेहरा दिसतो आहे. नीतीश कुमार कधी राजदसोबत जात सरकार स्थापन करतात. तर कधी भाजपशी हात मिळवणी करतात. नीतीश कुमार यांची पुढची चाल काय असेल आणि ते कुणासोबत युती करतील याचा अंदाज बांधता येत नाही. मागच्या कित्येक दिवसांपासून नीतीश कुमार हे इंडिया आघाडीसोबत होते. अचानकपणे त्यांनी आता भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतलाय. थोडक्यात काय… तर जिथे स्पेस मिळेल त्यांच्याशी नीतीश कुमार हात मिळवणी करतात. तसे निर्णय घेतात.

 मुख्यमंत्री म्हणून नीतीश कुमार नवव्यांदा शपथ घेणार

नीतीश कुमार उच्च शिक्षित आहेत. त्यांनी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं आहे. जेव्हा नीतीश कुमार शिक्षण घेत होते. तेव्हा त्यांना ‘इंजिनिअर बाबू’ या नावाने ओळखलं जायचं पुढे हेच इंजिनिअर बाबूंनी बिहारच्या राजकारणात आपला जम बसवला. तसंच आजही त्यांची जादू कायम आहे. थोड्याच वेळात ते बिहारचे मुख्यमंत्री म्हणून नवव्यांदा शपथ घेतील.

Follow Us
मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवर पुन्हा दरड कोसळली; वाहतूक एकाच लेनवर
Breaking! मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवर पुन्हा दरड कोसळली; वाहतूक एकाच लेनवर, प्रशासन अॅक्शन मोडमध्ये
'दादांच्या आठवणी कुठे नाहीत...' पंढरपूर वारीदरम्यान सुनेत्रा पवारांचं
Sunetra Pawar | 'दादांच्या आठवणी कुठे नाहीत...' पंढरपूर वारीदरम्यान सुनेत्रा पवारांचं भावनिक विधान
कल्याण-डोंबिवलीत पुन्हा पावसाचा कहर! मुसळधार सरींनी नागरिकांची धावपळ
Heavy Rain | कल्याण-डोंबिवलीत पुन्हा पावसाचा कहर! अचानक मुसळधार सरींनी नागरिकांची धावपळ
जयंत पाटील–विनोद तावडे भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ
NDAमध्ये शरद पवारांची एन्ट्री? जयंत पाटील–विनोद तावडे भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ
इतका भयंकर वेग की मोठमोठे कंटेनर फरफटले गेले, दोघांचा मृत्यू अन्...
इतका भयंकर वेग की मोठमोठे कंटेनर फरफटले गेले, दोघांचा मृत्यू अन्... भुस्खलनाचा थरारक व्हिडीओ समोर
मृत्यूवर हसलो नाही! अमित साटम यांचा सभागृहात मोठा खुलासा; म्हणाले...
Amit Satam | मृत्यूवर हसलो नाही! अमित साटम यांचा सभागृहात मोठा खुलासा; म्हणाले...
देवस्थानाच्या पाहणीला गेले अन् कार चिखलातच अडकली; गिरीश महाजन यांनाही
देवस्थानाच्या पाहणीला गेले अन् कार चिखलातच अडकली; गिरीश महाजन यांनाही पूरस्थितीचा फटका
खाली धावपट्टी आहे की नाही? हेच समजेना! अखेर वैमानिकाने... अंगावर काटा
Navi Mumbai | खाली धावपट्टी आहे की नाही? हेच समजेना! अखेर वैमानिकाने... अंगावर काटा आणणारा व्हिडीओ
स्थानिकांना दिलासा! वाऱ्यांची दिशा बदलेली अन् मोठं संकट टळलं, आता...
स्थानिकांना दिलासा! वाऱ्यांची दिशा बदलेली अन् मोठं संकट टळलं, आता या शहरावर ओढावलं ढगफुटीचं संकट
संत एकनाथ महाराजांची पालखी पंढरपूरकडे रवाना! 427 वर्षांची परंपरा...
Ashadhi Wari 2026 | संत एकनाथ महाराजांची पालखी पंढरपूरकडे रवाना! 427 वर्षांची परंपरा, विठ्ठल... विठ्ठलच्या गजरात दुमदुमलं पैठण