AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्रानंतर आता बिहारमध्ये मोठ्या राजकीय भूकंपाची शक्यता, नितीश कुमारांनी जेडीयूच्या सर्व खासदार आमदारांची बैठक

जेडीयूचे सर्वेसर्वा नितीश कुमार यांनी आपल्या सर्व आमदार आणि खासदाराची बैठक बोलावण्यात आली आहे. ही बैठक बिहारची राजधानी पाटना इथं होणार आहे. या बैठकीत जेडीयू मोठा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जातेय.

महाराष्ट्रानंतर आता बिहारमध्ये मोठ्या राजकीय भूकंपाची शक्यता, नितीश कुमारांनी जेडीयूच्या सर्व खासदार आमदारांची बैठक
नितीश कुमार, मुख्यमंत्री, बिहारImage Credit source: Google
| Updated on: Aug 07, 2022 | 4:55 PM
Share

नवी दिल्ली : महाराष्ट्रात मोठ्या राजकीय भूकंपानंतर आता बिहारमध्येही मोठी राजकीय (Bihar Politics) उलथापालथ होण्याची चिन्ह दिसत आहेत. भाजप आणि जनता दल युनायटेडमध्ये सुरु असलेल्या अंतर्गत कलहामुळे बिहार सरकार अडचणीत येण्याची शक्यता आहे. आज जेडीयूचे सर्वेसर्वा नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी आपल्या सर्व आमदार आणि खासदाराची बैठक बोलावण्यात आली आहे. ही बैठक बिहारची राजधानी पाटना इथं होणार आहे. या बैठकीत जेडीयू मोठा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जातेय. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राजदच्या तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांनी आपल्या सर्व आमदारांना 10 ते 12 ऑगस्टदरम्यान पाटन्यातच राहण्यास सांगितलं आहे.

बिहारमध्ये गेल्या काही दिवसांत राजकीय उलथापालथीची शक्यता व्यक्त केली जात आहे. नितीश कुमार पुन्हा एकदा भाजपची साथ सोडून राजदला सोबत घेऊन सत्ता स्थापन करतील, अशीही चर्चा सध्या बिहारच्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. त्यातच मुख्यमंत्री नितीश कुमारच असतील, मात्र यावेळी उपमुख्यमंत्री कुणी नसेल. पण सरकार राजदच्या पाठिंब्यानं चालेल. या शक्यतांना किती अर्थ आहे हे येणाऱ्या काही दिवसांत स्पष्ट होईल. मात्र, आगामी काही दिवस बिहारच्या राजकारणासाठी अत्यंत महत्वाचे मानले जात आहेत.

भाजपच्या बैठकांकडे नितीश कुमारांची पाठ

गेल्या काही दिवसांत भाजपच्या दोन वरिष्ठ नेत्यांनी बिहारमध्ये बैठक घेतली, रोड शो केला. इतकंच नाही तर 2024 आणि 2025 नंतरही जेडीयूसोबत युती असले असं जाहीर केलं. मात्र, नितीश कुमार भाजप नेत्यांच्या बैठका, माजी राष्ट्रपतींनी दिलेलं भोजन, राष्ट्रपतींचा शपथविधी, निती आयोगाची बैठक अशा महत्वाच्या क्षणी अनुपस्थित राहून, बिहारमध्ये भाजप आणि जेडीयूमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचंच सांगत आहेत.

निती आयोगाच्या बैठकीपासूनही नितीश कुमार दूरच

आज राजधानी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली निती आयोगाची बैठक होत आहे. या बैठकीला नितीश कुमार उपस्थित राहिले नाहीत. नितीश कुमारांची अनुपस्थितीमुळे अनेक सवाल उपस्थित होत आहेत. बिहारमधील भाजप आणि जेडीयू सरकारमध्ये आलबेल नाही? भाजप आणि जेडीयूमधील तणाव इतका वाढला की नीतीश कुमार पंतप्रधान मोदींच्या बैठकीकडेही पाठ फिरवत आहेत? असा प्रश्न आता बिहारच्या राजकीय वर्तुळात विचारले जात आहेत.

नीतीश कुमार कोरोनातून नुकतेच बरे

नितीश कुमार दुसऱ्यांना पंतप्रधान मोदींच्या बैठकीला अनुपस्थित आहेत. मिळालेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वीच नितीश कुमार कोरोनातून बरे झाले. त्यामुळे त्यांना अजूनही थकवा जाणवतोय. त्यामुळे ते प्रवास करत नाहीत. तसंच बिहारमध्ये अडकून राहिलेली कामं मार्गी लावण्याकडे त्यांचा कल आहे. निती आयोगाच्या बैठकीत उपमुख्यमंत्र्यांनी सहभागी व्हावं, अशी नितीश कुमारांची अपेक्षा होती. मात्र बैठकीला केवळ मुख्यमंत्रीच हजर राहणार असल्याने बिहारमधून कुणीही या बैठकीला उपस्थित नाही.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.