AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बापरे! बिहारमध्ये वीज पडून 33 लोकांनी गमावला जीव, वीज कोसळून मोठी जीवितहानी

Bihar Storm Lighting in Rain killed 33 people : वातावरणातील बदलाचा मोठा फटका बिहारला बसलाय. अस्मानी संकटामुळे 33 लोकांनी जीव गमावल्यानंतर आता प्रशासनाकडूनही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

बापरे! बिहारमध्ये वीज पडून 33 लोकांनी गमावला जीव, वीज कोसळून मोठी जीवितहानी
वीज कोसळून मोठी जीवितहानीImage Credit source: instagram
सिद्धेश सावंत
सिद्धेश सावंत | Updated on: May 21, 2022 | 7:06 AM
Share

बिहार : बिहारमध्ये (Bihar News) 33 लोकांचा वीज पडून मृत्यू (Death after lighting) झाला आहे. प्रचंड गरमीनंतर आलेल्या अस्नामी संकटानं बिहारमधील 33 लोकांचा जीव घेतल्यानं एकच खळबळ उडाली. काही तास झालेल्या मुसळधार पावसानं बिहारमधील जनजीवन विस्कळीत झालं होतं. वादळासारख्या झालेल्या पावसानं विजांच्या कडकडाटासह तब्बल 33 लोकांचा जीव घेतलाय. वीज कोसळलून 16 जिल्ह्यांमधील 33 लोकांचा मृत्यू झाला आहे. यानंतर आता बिहार सरकारनं मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदतीची घोषणाही केली आहे. मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Bihar CM Nitin Kumar) यांच्याकडून करण्यात आली आहे. दरम्यान, आता मुसळधार पावसामुळे सतर्कतेचा इशाराही देण्यात आला य. बिहारच्या भागलपूर या भागात सर्वाधित नुकसान झालंय. एकट्या भागलपूर भागात सात लोकांचा वीज कोसळून मृत्यू झाला आहे. तर मुजफ्फरपूरमध्ये 6 जण दगावलेत. गुरुवारी दुपारी बिहारमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली होती. सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या बिहारमधील पावसानं सगळ्यांची दाणादाण उडवली होती.

मुख्यमंत्र्यांचं आवाहन

मुसळधार पावसानंतर बिहारचं जनजीवन प्रभावित झालंय. त्यानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मृतांच्या नातलगांना प्रत्येकी चार लाख रुपयांची घोषणा करताना 33 लोकांचा मृत्यू वीज कोसळून झाली असल्याची माहिती दिली . 33 जणांच्या मृत्यूबाबत नितीश कुमार यांनी दुःख व्यक्त केलं आहे. तसंच ज्यांच्या शेतीचं नुकसान झालं आहे, त्यांनादेखील तत्काळ नुकसान भरपाई दिली जावी, असे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.

पाहा Video : नितेश राणेंची आदित्य ठाकरेंवर टीका

सतर्कतेचं आवाहन

वातावरणातील बदलाचा मोठा फटका बिहारला बसलाय. अस्मानी संकटामुळे 33 लोकांनी जीव गमावल्यानंतर आता प्रशासनाकडूनही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. आपत्कालीन यंत्रणेनं केलेल्या आवाहनाला लोकांनी सहकार्य करावं. तसंच गरज नसेल, तर घरातच थांबावं, अशा सूचना केल्या गेल्यात.

शेतमालाच्या नुकसानीची भीती

सुरुवातीला वीज कोसळून किती जणांचा मृत्यू झाला, याची आकडेवारी समोर आलेली नव्हती. त्यानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी ट्वीट करत वाईट हवामानामुळे 33 जणांचा जीव घेतल्याची माहिती दिली. धुव्वाधार पावसाचा फटका शेतकऱ्यांनाही बसण्याची भीती व्यक्त केली जाते आहे. बिहारमधील प्रशासनाकडून आता नुकसान झालेल्यांसाठी बचावकार्य करण्याचे निर्देश जारी करण्यात आले आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील बिहारमधील घटनेबाबत खेद व्यक्त केलाय.

Follow Us
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं...
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं का म्हणाले? टर्निंग पॉइंट ठरणारा मुद्दा काय?
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर... अखेर कपिल सिब्बल यांची कोर्टाकडे मोठी मागणी
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...
Manoj Jarange Video | भर मंचावरून मनोज जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीरावरून, चेहऱ्यावरून...
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण...
Sukhbir Singh Badal | पंजाबच्या माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण काय? याआधीही... मोठी अपडेट समोर
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय...
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे...
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे आदेश आयोगाला देऊ शकत नाही, मग...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल यांनी नेमका युक्तिवाद काय लढवला?
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजून झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या...
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजूने झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर युक्तिवाद, कोर्टाचं निदर्शन काय?
कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
शिवसेना पक्षचिन्ह प्रकरण: कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
पेगलवाडी रस्त्याची पाहणी. विद्यार्थ्यांशी साधला संवाद.
आदित्य ठाकरे यांच्याकडून त्र्यंबकेश्वरमधील पेगलवाडी रस्त्याची पाहणी. विद्यार्थ्यांशी साधला संवाद.