बापरे! बिहारमध्ये वीज पडून 33 लोकांनी गमावला जीव, वीज कोसळून मोठी जीवितहानी

Bihar Storm Lighting in Rain killed 33 people : वातावरणातील बदलाचा मोठा फटका बिहारला बसलाय. अस्मानी संकटामुळे 33 लोकांनी जीव गमावल्यानंतर आता प्रशासनाकडूनही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

बापरे! बिहारमध्ये वीज पडून 33 लोकांनी गमावला जीव, वीज कोसळून मोठी जीवितहानी
वीज कोसळून मोठी जीवितहानीImage Credit source: instagram
Follow us
| Updated on: May 21, 2022 | 7:06 AM

बिहार : बिहारमध्ये (Bihar News) 33 लोकांचा वीज पडून मृत्यू (Death after lighting) झाला आहे. प्रचंड गरमीनंतर आलेल्या अस्नामी संकटानं बिहारमधील 33 लोकांचा जीव घेतल्यानं एकच खळबळ उडाली. काही तास झालेल्या मुसळधार पावसानं बिहारमधील जनजीवन विस्कळीत झालं होतं. वादळासारख्या झालेल्या पावसानं विजांच्या कडकडाटासह तब्बल 33 लोकांचा जीव घेतलाय. वीज कोसळलून 16 जिल्ह्यांमधील 33 लोकांचा मृत्यू झाला आहे. यानंतर आता बिहार सरकारनं मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदतीची घोषणाही केली आहे. मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Bihar CM Nitin Kumar) यांच्याकडून करण्यात आली आहे. दरम्यान, आता मुसळधार पावसामुळे सतर्कतेचा इशाराही देण्यात आला य. बिहारच्या भागलपूर या भागात सर्वाधित नुकसान झालंय. एकट्या भागलपूर भागात सात लोकांचा वीज कोसळून मृत्यू झाला आहे. तर मुजफ्फरपूरमध्ये 6 जण दगावलेत. गुरुवारी दुपारी बिहारमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली होती. सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या बिहारमधील पावसानं सगळ्यांची दाणादाण उडवली होती.

मुख्यमंत्र्यांचं आवाहन

मुसळधार पावसानंतर बिहारचं जनजीवन प्रभावित झालंय. त्यानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मृतांच्या नातलगांना प्रत्येकी चार लाख रुपयांची घोषणा करताना 33 लोकांचा मृत्यू वीज कोसळून झाली असल्याची माहिती दिली . 33 जणांच्या मृत्यूबाबत नितीश कुमार यांनी दुःख व्यक्त केलं आहे. तसंच ज्यांच्या शेतीचं नुकसान झालं आहे, त्यांनादेखील तत्काळ नुकसान भरपाई दिली जावी, असे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.

पाहा Video : नितेश राणेंची आदित्य ठाकरेंवर टीका

सतर्कतेचं आवाहन

वातावरणातील बदलाचा मोठा फटका बिहारला बसलाय. अस्मानी संकटामुळे 33 लोकांनी जीव गमावल्यानंतर आता प्रशासनाकडूनही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. आपत्कालीन यंत्रणेनं केलेल्या आवाहनाला लोकांनी सहकार्य करावं. तसंच गरज नसेल, तर घरातच थांबावं, अशा सूचना केल्या गेल्यात.

शेतमालाच्या नुकसानीची भीती

सुरुवातीला वीज कोसळून किती जणांचा मृत्यू झाला, याची आकडेवारी समोर आलेली नव्हती. त्यानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी ट्वीट करत वाईट हवामानामुळे 33 जणांचा जीव घेतल्याची माहिती दिली. धुव्वाधार पावसाचा फटका शेतकऱ्यांनाही बसण्याची भीती व्यक्त केली जाते आहे. बिहारमधील प्रशासनाकडून आता नुकसान झालेल्यांसाठी बचावकार्य करण्याचे निर्देश जारी करण्यात आले आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील बिहारमधील घटनेबाबत खेद व्यक्त केलाय.

Non Stop LIVE Update
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा.
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.