ममता बँनर्जींच्या 20 बंडखोर खासदारांना भाजपचा सर्वात मोठा झटका, पश्चिम बंगालच्या राजकारणात पुन्हा घडामोडींना वेग

विधानसभा निवडणुकीमध्ये तृणमूलचा पराभव झाल्यानंतर पक्षातून वीस खासदारांनी बंडखोरी केली होती, त्यांनी एनसीपीआय पक्षात प्रवेश केला. मात्र आता या खासदारांना भाजपने मोठा झटका दिला असून, पश्चिम बंगालमधून मोठी बातमी समोर आली आहे.

ममता बँनर्जींच्या 20 बंडखोर खासदारांना भाजपचा सर्वात मोठा झटका, पश्चिम बंगालच्या राजकारणात पुन्हा घडामोडींना वेग
तृणमूलच्या बंडखोर खासदारांना भाजपचा झटका
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 27, 2026 | 4:50 PM

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपने ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वातील तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का दिला. पश्चिम बंगालच्या निवडणुकीत तृणमूलचा पराभव झाला तर भाजपने सत्ता स्थापन केली. दरम्यान विधानसभा निवडणुकीत भाजपचा विजय होताच. पश्चिम बंगालमध्ये वारं फिरल्याचं पहायला मिळालं. तृणमूलमध्ये मोठी फूट पडली, सुरुवातीला तब्बल 58 आमदार पक्षातून बाहेर पडले, त्यांनी वेगळा गट स्थापन केला आणि पक्षावरच दावा केला. तर दुसरीकडे त्यानंतर वीस खासदार देखील फुटले. या खासदारांनी वेगळा गट करून दुसर्‍या पक्षात प्रवेश केला, दरम्यान सध्या या खासदारांच्या गटासंदर्भात लोकसभा अध्यक्षांचा निर्णय येणं बाकी आहे, तसेच दुसरीकडे पक्षात झालेल्या या बंडखोरीविरोधात सध्या सुप्रीम कोर्टात देखील सुनावणी सुरू आहे.

यामुळे तृणमूलच्या खासदारांचं आधीच टेन्शन वाढलेलं असताना आता मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे या खासदारांना भाजपनं मोठा झटका दिला आहे. भाजपने या खासदारांच्या गटासोबत मिळून कोलकाता महापालिकेच्या निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे. हा या खासदारांसाठी मोठा धक्का मानला जात आहे. टीएमसीच्या सर्व बंडखोर खासदारांनी तृणमूलमधून एनसीपीआयमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर खासदार सुदीप बंदोपाध्याय यांनी अशी घोषणा देखील केली होती की आगामी कोलकाता महापालिका निवडणूक आम्ही भाजपसोबत मिळून लढू, मात्र भाजपने या बंडखोर खासदारांसोबत ही निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे.

सुदीप बंदोपाध्याय यांनी बुधवारी मोठं विधान केलं होतं, आम्ही कोलकाता महापालिकेची निवडणूक एनडीएचा एक भाग म्हणून लढू, मात्र त्यानंतर अवघ्या काही तासांमध्येच भाजपचे राज्यमंत्री आणि निवडणूक प्रभारी सुकांत मजूमदार यांनी मोठी घोषणा केली आहे, आम्ही या निवडणुकीमध्ये कोणासोबतही युती करणार नाही, आम्ही ही निवडणूक स्वबळावर लढू असं सुदीप बंदोपाध्याय यांनी म्हटलं आहे. आमच्या प्रदेशाध्यक्षांनी आधीच त्याबद्दल सांगितलं होतं. भाजप ही निवडणूक स्वबळावर लढणार आहे, असं सुदीप बंदोपाध्याय यांनी म्हटलं आहे, त्यामुळे आता या खासदारांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

Follow Us