
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या निवडणुका लागलेल्या आहेत. या निवडणुकीमुळे तेथील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आपली सत्ता कायम राखण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर तृणमूल काँग्रेसच्या काळात पश्चिम बंगालमध्ये मोठे अराजक निर्माण झाले आहे, असा आरोप भाजपाकडून केला जातोय. काहीही झालं तरी यावेळी तेथे सत्तापालट करून भाजपाचा मुख्यमंत्री करण्यासाठी तेथे भाजपा पक्ष पूर्ण ताकदीने उतरला आहे. बंगालच्या निवडणुकीत राष्ट्रीय नेत्यांनीही लक्ष घातले आहे. दरम्यान, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आक्रमक होत पश्चिम बंगालमधील सध्या सत्तेत असलेल्या तृणमूल काँग्रेसवर सडकून टीका केली. बंगालमधील ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्त्वातील सरकारमध्ये अराजकता निर्माण झाली आहे, असा हल्लाबोल त्यांनी केला.
“पश्चिम बंगालमध्ये गेल्या 15 वर्षांपासून भ्रष्टाचार, लांगुलचालन, राजकीय हिंसा, घुसखोरी यांना संरक्षण देणारे सरकार कार्यरत आहे. हिंसा, घुसखोरी, लांगुलचालन तेथे राजकीय व्यवस्थेचा भाग झाले आहे. पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्त्वातील सरकार हे अविश्वास, अराजकता, भय याचे दुसरे रुप झाले आहे. जनतेचा विश्वास पूर्णपणे उडाला आहे,” असा हल्लाोबल धर्मेंद्र प्रधान यांनी केला.
तसेच, पश्चिम बंगालमधील विधानसभेची निवडणूक ही फक्त सत्ता परिवर्तनाचा भाग नाीही, तर ही निवडणूक म्हणजे राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा झाली आहे. पश्चिम बंगालच्या सीमा या देशाच्या सुरक्षेशी निगडित आहेत. पश्चिम बंगालमधील सरकारच्या ढिसाळ धोरणामुळे हा विषय जास्तच गंभीर झाला आहे. ‘सोनार बांग्ला’च्या नावाखाली सिंडिकेट, भ्रष्टाचार, लाचखोरी यासारख्या कुशासनाच्या माध्यमातून लोकांना छळले जात आहे, अशीही टीका त्यांनी केली.
पश्चिम बंगाल में पिछले 15 वर्षों से एक ऐसी सरकार सत्ता में है जिसने घुसपैठ, राजनीतिक हिंसा, तुष्टिकरण और भ्रष्टाचार को न केवल संरक्षण दिया, बल्कि उसे व्यवस्था का हिस्सा बना दिया। ममता बनर्जी के नेतृत्व में तृणमूल कांग्रेस का शासन आज भय, अराजकता और अविश्वास का पर्याय बन चुका है,… https://t.co/MxueXrMWsI
— Dharmendra Pradhan (@dpradhanbjp) March 28, 2026
पश्चिम बंगालमध्ये महिलांविरोधातील गुन्ह्यांत वाढ होत आहे. युवक बेरोजगार युवक, हतबल शेतकरी, कोडमडलेली आरोग्य व्यवस्ता, घसरत चाललेला साक्षरता दर तसेच प्रत्येक क्षेत्रातील अपयश हीच बंगालची ओळख होत आहे. तृणमूल काँग्रेसच्या सत्तेमुळे पश्चिम बंगाल खूप मागे गेला आहे, असेही मत त्यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये व्यक्त केले.