5 states Poll Schedule : पश्चिम बंगाल ते तामिळनाडू, 4 राज्यांत विधानसभा निवडणुकीचं बिगूल वाजलं, मदतान कधी निकाल कधी? वाचा A टू Z
निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम या चार राज्यांची तसेच पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशाची निवडणूक जाहीर केली आहे. निवडणूक आयुक्तांनी पत्रकार परिषदेत सर्व निवडणूक कार्यक्रम सांगितला आहे.

Vidhan Sabha Poll Schedule for 5 states : गेल्या अनेक दिवसांपासून देशात पश्चिम बंगाल, आसाम यासार इतरही तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची चर्चा चालू होती. या निवडणुकीची घोषणा नेमकी कधी होईल? असे विचारले जात होते. कोणत्याही क्षणी निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता असल्याने त्यासाठी राजकीय पक्षांकडून तयारीही केली जात होती. विशेष म्हणजे ज्या राज्यांत निवडणूक होणार आहे, तेथे सत्ताधारी भाजपा तसेच तेथील प्रादेशिक पक्षांकडून मोठ्या सभांचे आोयजन केले जात होते. पश्चिम बंगालसारख्या राज्यामध्ये खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही काही सभा घेतल्या आहेत. दरम्यान, आता देशातील एकूण पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची प्रतीक्षा आता संपली असूल निवडणूक आयोगाने आज (15 मार्च) पत्रकार परिषद घेऊन एकूण या सर्व राज्यांच्या निवडणुकीची घोषणा केली आहे. या घोषणेनुसार आता पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ या चार राज्यांची तर पुद्दुचेरी या केंद्रसाशित प्रदेसात निवडणूक होणार आहे. या सर्व राज्यातील निवडणुकीचा निकाल 4 मे रोजी लागणार आहे.
कोणत्या राज्यात कधी मतदान, कधी निकाल?
निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार येत्या 9 एप्रिल रोजी आसाम, केरळ या दोन राज्यांत तसेच पुद्दुचेरी या केंद्रशाशित प्रदेशात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होईल. तामिळनाडू येथे 23 एप्रिल रोजी मतदान होईल. तर पश्चिम बंगाल या एमेकव राज्यात दोन 23 एप्रिल आणि 29 एप्रिल अशा दोन टप्प्यांत मतदान होईल. या सर्व चार राज्ये तसेच एका केंद्रशाशित प्रदेशाच्या निवडणुकीचा निकाल 4 मे रोजी लागणार आहे.
मतदान कधी होणार, निकाल कधी लागणार?
आसाम
मतदान – 9 एप्रिल
निकाल- 4 मे
केरळ
मतदान – 9 एप्रिल
निकाल – 4 मे
पुद्दुचेरी
मतदान – 9 एप्रिल
निकाल – 4 मे
तामिळनाडू
मतदान – 23 एप्रिल
निकाल – 4 मे
बंगाल – दोन टप्प्यांत निवडणूक
मतदान – 23 एप्रिल आणि 29 एप्रिल
निकाल – 4 मे
दरम्यान, या निवडणुकीत पश्चिम बंगाल या राज्याकडे सर्वांचेच लक्ष असेल. कारण या राज्यातील तृणमूल काँग्रेसची सत्ता उलथवून लावण्यासाठी भाजपा पूर्ण ताकदीने प्रयत्न करणार आहे. तर तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांच्यापुढे सत्ता कायम ठेवण्याचे आव्हान असेल. दक्षिणेकडील राज्यांतही नेमकं काय होणार? भाजपाचा जनाधार वाढणार का? याकडे सर्वांचेच लक्ष असेल.
