AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अयोध्येतील पराभव भाजपच्या जिव्हारी, काय होतं पराभवामागचं कारण?

भाजपने राम मंदिराच्या नावावर लोकसभा निवडणुकीत मतं मागितली होती. पण ज्या मतदारसंघात राम मंदिर येतं त्याच मतदारसंघात भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपला हा पराभव जिव्हारी लागला आहे. आता पराभवाची कारणं शोधली जात आहेत.

अयोध्येतील पराभव भाजपच्या जिव्हारी, काय होतं पराभवामागचं कारण?
ayodhya
shailesh musale
shailesh musale | Updated on: Jun 13, 2024 | 10:49 PM
Share

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे. भाजपनं एनडीएच्या साथीनं तिसऱ्यांदा सत्तेत कमबॅक केलं. पण अयोध्येतला पराभव भाजप समर्थकांच्या जिव्हारी लागला आहे. आपापल्या परीनं लोकांनी अयोध्येतल्या पराभवाची कारणं सांगितली. मात्र एक कारण सर्वाधिक चर्चेत राहिलं ते म्हणजे रामपथासाठी रस्ते रुंदीकरणात तोडलेली हजारो घरं, असंख्य धार्मिक स्थळं आणि दुकानं. त्याचाच भाग म्हणून की काय उत्तर प्रदेश सरकारनं गोरखपूर ते अयोध्या प्रस्तावित उड्डाणपूल रद्द केला आहे. त्यामुळे आता अयोध्येतली इतर छोटी-मोठी धार्मिक स्थळं शाबूत राहणार आहेत.

रामलल्लाचं मंदिर उभं राहत असताना राम पथ, भक्ती पथ, राम जन्मभूमि पथ, पंच कोसी परिक्रमा मार्ग, चौदह कोसी परिक्रमा, अयोध्या उड्डाणपुलाची निर्मिती केली गेली., मात्र या कामात असंख्य दुकानं-घरं-धार्मिक स्थळं तोडावी लागली. या नव्या परिवर्तनाचं लोकांनी स्वागत केलं. पण त्यात काहींना पूर्ण मोबदला न मिळाल्याचा आरोप झाला. काहींना विस्थापित होण्याची वेळ आल्यानं नाराजीही समोर आली.

तोडकामावर नाराजी असली तरी अयोध्यावासियांनी यंदा लोकसभेत भाजपला लीड दिलं, पण 2019 च्या तुलनेत त्यात मोठी घटही झाली. सपाचे उमेदवार अवधेश प्रसाद यांनी भाजपच्या लल्लू सिंहांना ५० हजारांहून जास्तीच्या फरकानं पराभूत केलं.

जसं महाराष्ट्रात एका लोकसभेत 6 विधानसभा येतात, तसं उत्तर प्रदेशात एका लोकसभेमध्ये 5 विधानसभांचा समावेश येतो. अयोध्या लोकसभेत दरियाबाद, रुदौली, मिल्कीपूर, बीकापूर आणि अयोध्या लोकसभेचा समावेश आहे.

रुदौलीत सपाला 11 हजार 703 चं लीड मिळालं.. मिल्कीपूरमध्ये 7 हजार 733 बिकापूरमध्ये 29 हजार 684 दरियाबादमध्ये 10 हजार 94 आणि एकट्या अयोध्येत भाजप 4 हजार 667 मतांनी आघाडीवर राहिली.

मात्र 2019 ला अयोध्येत भाजपला 25 हजार 587 मतांची आघाडी होती., त्यात यंदा जवळपास 21 हजार मताधिक्क्य घटलंय.

याशिवाय भाजपचे उमेदवार लल्लू सिंह स्वतःच्या कामांऐवजी फक्त मोदींच्या नावावर जिंकून येतात, अशीही तक्रार स्थानिकांची राहिली त्यात संविधान बदलाचं विधान करुन लल्लू सिंहांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला. आणि सपानं खुल्या जागेवर दलित उमेदवार दिल्यानं त्याचा अजून मोठा फटका बसला.

2019 ला अयोध्या लोकसभेत भाजप 5 पैकी 4 विधानसभांमध्ये आघाडीवर होती. 2024 मध्ये मात्र 5 फैकी फक्त एका मतदारसंघात लीड राखता आलं.

Follow Us
कुत्रे भुंकतात… वाघ शिकार करतो! शिंदेंचा ठाकरेंवर थेट हल्लाबोल!
कुत्रे भुंकतात… वाघ शिकार करतो! शिंदेंचा ठाकरेंवर थेट हल्लाबोल!
हिम्मत असेल तर समोर या! शिंदेंचं ठाकरेंना थेट खुलं आव्हान
Eknath Shinde | हिम्मत असेल तर समोर या! शिंदेंचं ठाकरेंना थेट खुलं आव्हान, ऑपरेशन तुडवावर जोरदार पलटवार
माझ्यावरील आरोप खरे असतील तर पक्षप्रमुख पद सोडायला तयार...
Uddhav Thackeray | माझ्यावरील आरोप खरे असतील तर पक्षप्रमुख पद सोडायला तयार; ठाकरेंचे मोठे विधान
ऑपरेशन टायगर नंतर; आधी ऑपरेशन कमळ करावं लागेल, ठाकरेंचा मोठा इशारा
Uddhav Thackeray On Operation Kamal | ऑपरेशन टायगर नंतर; आधी ऑपरेशन कमळ करावं लागेल, ठाकरेंचा मोठा इशारा
आज त्या मतदारांची माफी मागतो! उद्धव ठाकरे भावुक, नेमकं काय म्हाणाले...
Uddhav Thackeray | आज त्या मतदारांची माफी मागतो! उद्धव ठाकरे भावुक, नेमकं काय म्हाणाले....
तुमची पोरं पळवणारी टोळी आहे! ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर हल्लाबोल
तुमची पोरं पळवणारी टोळी आहे! वर्धापन दिनी उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर हल्लाबोल
आम्ही सत्तेसाठी जन्माला आलो नाही, सत्ता आमच्यासाठी जन्माला आली
Uddhav Thackeray | आम्ही सत्तेसाठी जन्माला आलो नाही, सत्ता आमच्यासाठी जन्माला आली; ठाकरेंची सिंहगर्जना
हा फक्त झटका आहे, महापालिकेत मोठा चटका देणार; गुलाबराव पाटलांचा इशारा
Gulabrao Patil | हा फक्त झटका आहे, महापालिकेत मोठा चटका देणार; गुलाबराव पाटलांचा थेट इशारा
2 दिवस थांबा... सगळं स्पष्ट होईल; शिंदेंच्या एका वाक्याने वाढला सस्पेन
2 दिवस थांबा... सगळं स्पष्ट होईल; श्रीकांत शिंदेंच्या एका वाक्याने वाढला सस्पेन्स
मराठा विद्यार्थ्यांनो खुशखबर! भरलेली शैक्षणिक फी परत मिळणार; सरकारची..
मोठी बातमी! मराठा विद्यार्थ्यांनो खुशखबर! भरलेली शैक्षणिक फी परत मिळणार; सरकारची मोठी घोषणा