Budget 2026 : तुमच्याही मनात भरेल अशी साडी! निर्मला सीतारमण यांचा ‘बजेट लूक’ पुन्हा चर्चेत, काय आहे साडीचे वैशिष्ट्ये

Budget 2026 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतरमण यांनी आज रविरवारी 1 फेब्रुवारी रोजी बजेटचं वाचन करायला सुरूवात केली आहे. दरम्यान, दरवर्षीप्रमाणे यंदाही त्यांच्या बजेट लूकची चर्चा रंगली आहे.

Budget 2026 :  तुमच्याही मनात भरेल अशी साडी! निर्मला सीतारमण यांचा बजेट लूक पुन्हा चर्चेत, काय आहे साडीचे वैशिष्ट्ये
Nirmala Sitaraman Saree look
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Feb 01, 2026 | 11:32 AM

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 1 फेब्रुवारी रोजी देशाचा अर्थसंकल्पाचं 2026 संसदेत वाचन सुरु केले आहे. हा त्यांचा सलग नववा अर्थसंकल्प असेल. अर्थसंकल्पाच्या दिवशी निर्मला सीतारमण यांची साडी नेहमीच चर्चेत असते. खरेतर, अर्थसंकल्पाच्या निमित्ताने त्या जी साडी नेसतात, त्यात भारताच्या संस्कृतीची छाप दिसते. यंदा अर्थमंत्र्यांनी बजेटच्या दिवशी हाताने विणलेली वांगी रंगाची कांचीवरम सिल्क साडी नेसली आहे, जी तमिळनाडूच्या प्राचीन विणकाम परंपरेशी जोडलेली आहे. या साडीवर हलके सोनेरी रंगाचे चेक्स आहेत आणि सोनेरी धाग्याच्या कामासह कॉफी ब्राउन बॉर्डर आहे.

वांगी रंग काय सांगतो?

निर्मला सीतारमण यांनी नेसलेल्या साडीचा रंग वांगी आहे. वांगी रंग हा महिला सशक्तीकरण, गरिमा, न्याय आणि समानतेचा प्रतीक मानले जातो. हा रंग आंतरराष्ट्रीय महिला दिन आणि स्त्री हक्कांच्या चळवळीशीही जोडला गेला आहे. अशा प्रकारे, यंदाच्या अर्थसंकल्पात महिलांसाठी विशेष योजना, शिक्षण, आरोग्य किंवा आर्थिक मदतीवर विशेष भर असेल का, असा संकेत मिळतो.

मागील वर्षी ‘मधुबनी कला’ची साडी

मागील वर्षी २०२५ च्या अर्थसंकल्पात निर्मला सीतारमण यांनी बिहारच्या ‘मधुबनी कला’ने सजलेली ऑफ-व्हाइट सिल्क साडी परिधान केली होती. ही साडी त्यांना पद्म पुरस्कार विजेत्या दुलारी देवी यांनी भेट दिली होती. साडीवर ‘मास्या’चे डिझाइन होते, जे सुख, समृद्धी आणि विकासाचे प्रतीक आहे.

निर्मला सीतारमण यांच्याबद्दल थोडक्यात

निर्मला सीतारमण यांचा जन्म १८ ऑगस्ट १९५९ रोजी तमिळनाडूच्या मदुराई येथे झाला. त्यांनी तिरुचिरापल्लीच्या सीतालक्ष्मी रामास्वामी कॉलेजमधून अर्थशास्त्रात पदवी आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. राजकारणात येण्यापूर्वी त्या कॉर्पोरेट क्षेत्राशी जोडलेल्या होत्या. २००६ मध्ये भारतीय जनता पार्टी (भाजपा) सोबत त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली. २०१४ मध्ये मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात त्यांना स्थान मिळाले. पहिल्या कार्यकाळात त्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या स्वतंत्र प्रभारी मंत्री होत्या. २०१७ मध्ये त्या संरक्षणमंत्री झाल्या. २०१९ पासून त्या देशाच्या अर्थमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळत आहेत.