AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

युद्धविरामानंतर इराणचा सर्वात मोठा धक्का; भारत मोठ्या संकटात, मित्र असूनही शत्रूसारखा वागला

अमेरिका आणि इराणमध्ये अखेर युद्धविराम झाला आहे. बुधवारी युद्धविरामाची घोषणा करण्यात आली. मात्र युद्धविरामाच्या दुसऱ्याच दिवशी इराणने मोठा निर्णय घेतला आहे, यामुळे आता संपूर्ण जगात मोठं संकट निर्माण होण्याची शक्यता आहे.

युद्धविरामानंतर इराणचा सर्वात मोठा धक्का; भारत मोठ्या संकटात, मित्र असूनही शत्रूसारखा वागला
pezeshkianImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 09, 2026 | 9:29 PM
Share

इराण, अमेरिका आणि इस्त्रायलमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे मध्य पूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला होता. अखेर इराण आणि अमेरिकेमध्ये युद्धविरामाची घोषणा झाली आहे. बुधवारी युद्धविरामाची घोषणा करण्यात आली. युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणने स्ट्रीट ऑफ होर्मूज वाहतुकीसाठी बंद केला होता. त्यामुळे जगातील अनेक देशांवर मोठं ऊर्जा संकट निर्माण झालं होतं. याचा मोठा फटका हा भारताला देखील बसला. कारण भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा कच्च्या तेलाचा आयातदार देश आहे. भारताचे अनेक जहाज हे या मार्गावर अडकून पडले होते. दरम्यान आता अमेरिका आणि इराणमध्ये युद्धविराम झाला आहे, त्यामुळे परिस्थिती पूर्वपदावर येईल, ऊर्जा संकट दूर होईल असं वाटत असतानाच. इराणे जगाला आणखी एक मोठा झटका दिला आहे.

युद्ध सुरू होण्यापूर्वी म्हणजे 28 फेब्रुवारी पूर्वी स्ट्रीट ऑफ होर्मूजवर इराणकडून कोणतेही प्रतिबंध लावण्यात आले नव्हते. मात्र त्यानंतर युद्ध सुरू झाल्यानंतर इराणकडून स्ट्रीट ऑफ होर्मूजवर अनेक प्रतिबंध घालण्यात आले. आता मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे जरी युद्धविरामाची घोषणा झाली असली तरी देखील इराणने स्ट्रीट ऑफ होर्मूजच्या सामुद्रधुनीवर घातलेले प्रतिबंध कायम ठेवले आहेत. सध्या एका दिवसामध्ये फक्त 15 च कच्च्या तेलाचे जहाजन या मार्गाने जातील असं इराण म्हटलं आहे.

रशियन वृत्तसंस्था असलेल्या तास च्या एका रिपिर्टनुसार आता युद्धविराम झाल्यानंतर देखील इराणने होर्मूजच्या सामुद्रधुनीवरील प्रतिबंध हटवण्यास नकार दिला आहे. एका दिवसात या मार्गाने फक्त 15 च जहाजन जातील असं इराणने म्हटलं आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार इराणला स्ट्रीट ऑफ होर्मूजवरील आपली पकड ढिल्ली होऊ द्यायची नाहीये, त्यामुळे इराणकडून आता हा निर्णय घेण्यात आला आहे.

भारतालाही फटका

दरम्यान युद्धविराम झाल्यानंतर परिस्थिती पूर्वपदावर येईल, ऊर्जा संकट दूर होईल असं वाटत असतानाच आता इराणने मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जोपर्यंत इराण ही बंदी पूर्णपणे उठवत नाही, तोपर्यंत ऊर्जा संकट कायम राहण्याची शक्यता आहे. एका दिवशी केवळ 15 जहाजांनाच जाण्याची परवानगी देण्यात आल्यामुळे या मार्गाने सध्यातरी पूर्वी इतका पुरवठा होण्याची शक्यता कमी आहे. याचा फटका हा भारताला देखील आता बसू शकतो.

Follow Us
मराठा आरक्षणावर 12 डिसेंबरला मनोज जरांगे पाटील घेणार मोठा निर्णय!
मराठा आरक्षणावर 12 डिसेंबरला मनोज जरांगे पाटील घेणार मोठा निर्णय!
मुंबई उच्च न्यायालयाने अन्न व औषध प्रशासनाला फटकारले...
'तुम्ही स्वतःला देव समजता का?' मुंबई उच्च न्यायालयाचा तुकाराम मुंडेंच्या अन्न व औषध प्रशासनाला सवाल
'नमो सहकार टॅक्सी'अंतर्गत मुंबै बँकेमार्फत टॅक्सी खरेदीसाठी 95% कर्ज
प्रवीण दरेकर यांची मोठी घोषणा; नमो सहकार टॅक्सी अंतर्गत मुंबै बँकेमार्फत टॅक्सी खरेदीसाठी 95 टक्के कर्ज...
मुंबईत मोठ्या गणेश मंडळांच्या बाप्पांचे जल्लोषात आगमन!
मुंबईत मोठ्या गणेश मंडळांच्या बाप्पांचे जल्लोषात आगमन; गणेशोत्सवाला उत्साहात सुरुवात!
विठ्ठलवाडी आगाराच्या बस चालकाची दादागिरी; थेट ॲम्ब्युलन्सच अडवली...
कल्याणमध्ये विठ्ठलवाडी आगाराच्या बस चालकाची दादागिरी; ॲम्ब्युलन्स अडवली, नागरिकांचा संताप...
अस्वच्छतेमुळे सिंधुदुर्ग रुग्णालयाचे उपहारगृह बंद; परवाना निलंबित
सिंधुदुर्ग शासकीय रुग्णालयाच्या उपहारगृहात मिसळमध्ये आढळले झुरळ; एफडीएची कारवाई
नेपाळ महापुरात बँकेची तिजोरी नदीत वाहून गेली
नेपाळ महापुरात बँकेची तिजोरी नदीत वाहून गेली. २९ जणांना लुटमारीचा प्रयत्न करताना अटक
कुंभमेळ्याला बदनाम करणे थांबवा, अन्यथा नाशिककर चोप देतील; राऊतांना...
कुंभमेळ्याला बदनाम करणे थांबवा, अन्यथा नाशिककर चोप देतील; बड्या नेत्याचा राऊतांना इशारा
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी गृहमंत्री अमित शाह यांना बांधली राखी,
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी गृहमंत्री अमित शाह यांना बांधली राखी, पहा खास क्षणाचा व्हिडीओ
ममता बॅनर्जींवर थेट गुन्हा दाखल, कोर्टाच्या आदेशात...नेमकं प्रकरण काय?
ममता बॅनर्जींवर थेट गुन्हा दाखल, कोर्टाच्या आदेशात... नेमकं प्रकरण काय?