AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : आयुष्यात कधी गरिबीचं तोंड पहावं लागणा नाही, फक्त या गोष्टींवर नियंत्रण ठेवा

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये त्यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळातही मार्गदर्शक ठरतात. चाणक्य म्हणतात जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात यश मिळवायचं असेल तर काही गोष्टींवर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे.

Chanakya Niti : आयुष्यात कधी गरिबीचं तोंड पहावं लागणा नाही, फक्त या गोष्टींवर नियंत्रण ठेवा
ChanakyaImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jul 13, 2026 | 7:56 PM
Share

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ देखील होते. चाणक्य हे एक अर्थतज्ज्ञ असल्यामुळे माणसाने आपल्या जीवनात पैशांचं नियोजन कसं करावं? कुठे पैसा खर्च करावा? आणि कुठे करू नये? याबद्दल देखील चाणक्य यांनी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. माणसाच्या जीवनात आर्थिक स्थिती ही अतिशय महत्त्वाची असते, असं चाणक्य म्हणतात. माणसाने आपल्या आयुष्यात यश कसं मिळावं याबद्दल सांगताना चाणक्य म्हणतात की माणसाला यश हे असंच मिळत नाही, त्यासाठी प्रचंड कष्ट करावे लागतात. अनेकदा तुम्हाला तुमच्या प्रयत्नामध्ये अपयश देखील येऊ शकतं, त्यामुळे कष्ट कधीच मध्ये सोडू नका. जोपर्यंत तुम्हाला यशाची प्राप्ती होत नाही, तोपर्यंत कष्ट सुरूच ठेवा. पंरतु यश मिळवण्यासाठी फक्त कष्ट करून चालत नाही, तर त्यासाठी काही गोष्टींवर नियंत्रण देखील ठेवावं लागतं, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

राग -चाणक्य म्हणतात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रागावर नियंत्रण ठेवायला शिका, कारण या जगात राग जेवढं तुमचं नुकसान करतो, तेवढं इतर कोणीही करू शकत नाही. कारण राग आल्यानंतर तुम्ही तुमचं स्वत:वरील नियंत्रण गमावून बसता आणि रागाच्या भरात असा एखादा तडकाफडकी निर्णय घेत की त्यामुळे तुम्हाला नंतर आयुष्यभर पश्चाताप करण्याची वेळ येते. त्यामुळे माणसाने नेहमी रागावर नियंत्रण ठेवले पाहिजे असं चाणक्य म्हणतात

आळस – चाणक्य म्हणतात जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात एखादं निश्चित असं ध्येय प्राप्त करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला प्रचंड कष्ट करावे लागणार आहेत, आणि हे तेव्हाच शक्य होईल, जेव्हा तुम्ही तुमचा आळस झटकून कामाला लागाल. त्यामुळे माणसाचं आळसावर नियंत्रण असणं गरजेचं आहे. ज्या व्यक्तीचं आळसावर नियंत्रण आहे, असा व्यक्ती आयुष्यात प्रचंड यशस्वी होतो, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

इच्छा – चाणक्य म्हणतात यशस्वी होण्यासाठी तुम्ही तुमच्या इच्छावर नियंत्रण ठेवलं पाहिजे. अनेक जण शेजाऱ्याने एखादी नवी वस्तू आणली की दु:खी होतात. त्यांना देखील ती वस्तू हवी असते, त्यामुळे असे लोक गरज नसताना देखील त्या वस्तुची खरेदी करतात. यामुळे मोठ्या प्रमाणात पैसा खर्च होतो, पंरतु प्रत्यक्षात माणूस कधीही, सुखी किंवा आयुष्यात यशस्वी होऊ शकत नाही. त्यामुळे तुमचं तुमच्या इच्छावर नियंत्रण असावं , असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
अंबादास दानवेंच्या निवासस्थानी रक्षाबंधन सण उत्साहात साजरा, Video पहा
अंबादास दानवेंच्या निवासस्थानी रक्षाबंधन सण उत्साहात साजरा, Video आला समोर
कुणीही घरी बसू नका; अंतरवाली सराटीत या' मनोज जरांगेचं मोठं आवाहन
Manoj Jarange On Hunger Strike | 'कुणीही घरी बसू नका; अंतरवाली सराटीत या' मनोज जरांगेचं मोठं आवाहन
हिरव्या निसर्गाच्या सान्निध्यात मुंबई-गोवा हायवेचं विलोभनीय सौंदर्य,
हिरव्या निसर्गाच्या सान्निध्यात मुंबई-गोवा हायवेचं विलोभनीय सौंदर्य, पाहा मनमोहक दृश्य
आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात श्रीकांत शिंदे ॲक्टिव्ह मोडवर; 12 तासांतच
आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात खासदार श्रीकांत शिंदे ॲक्टिव्ह मोडवर;12 तासांतच...
एमपीएससी पेपरफुटी: ऋतुजा पाटीलची प्रश्नपत्रिकेसाठी ५ लाखांची मागणी
एमपीएससी पेपरफुटी: ऋतुजा पाटीलची प्रश्नपत्रिकेसाठी ५ लाखांची मागणी
मुंबईत दुधाच्या दरात 1 सप्टेंबरपासून 9 रुपयांची वाढ
मुंबईत दुधाच्या दरात 1 सप्टेंबरपासून 9 रुपयांची वाढ
नेपाळमध्ये अडकलेल्या साताऱ्यातील महिला पर्यटकांशी शिंदेंचा संवाद
नेपाळमध्ये अडकलेल्या साताऱ्यातील महिला पर्यटकांशी उपमुख्यमंत्री शिंदेंचा व्हिडीओ कॉल
नेपाळमध्ये अडकलेल्या ११५ महाराष्ट्रीयांना मुख्यमंत्र्यांकडून मदत
नेपाळमध्ये अडकलेल्या ११५ महाराष्ट्रीयांना मुख्यमंत्र्यांकडून मदतीचा हात, सुखरूप परत आणणार
मुंबई महापालिकेकडून शालेय साहित्य वाटपास विलंब: इराण युद्ध कारणीभूत
मुंबईतील शालेय मुलांना छत्र्या मिळेनात: मुंबई महापालिकेचे अजब उत्तर इराण युद्ध
शिल्पा गवारे कुटुंबीयांकडून छळाचा आरोप, न्यायची मागणी
पिंपरी चिंचवडमधील शिल्पा गवारे मृत्यू प्रकरण: पती, सासू-सासरे आणि दिराला पोलीस कोठडी