AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Deool Band 2: शाहरुख खानची 42 लाखांची मदत, आता ‘देऊळ बंद 2’चा नफा कुठे जाणार? निर्मात्यांचा मोठा निर्णय

Deool Band 2: प्रवीण तरडेंच्या 'देऊळ बंद 2' या चित्रपटासाठी शाहरुख खानने 42 लाख रुपयांचा बिल माफ केला. त्यानंतर आता निर्मात्यांनी या चित्रपटाचा नफा शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी देत असल्याचं जाहीर केलं.

Deool Band 2: शाहरुख खानची 42 लाखांची मदत, आता ‘देऊळ बंद 2’चा नफा कुठे जाणार? निर्मात्यांचा मोठा निर्णय
प्रवीण तरडे, देऊळ बंद 2, शाहरुख खानImage Credit source: Instagram
| Updated on: Aug 28, 2026 | 12:17 PM
Share

दिग्दर्शक प्रवीण तरडेंच्या ‘देऊळ बंद 2’ या मराठ चित्रपटासाठी सुपरस्टार शाहरुख खान याने केलेली मदत सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. ‘देऊळ बंद 2’ या मराठी चित्रपटाच्या प्रदर्शनाआधी निर्मात्यांसमोर मोठं आर्थिक संकट उभं राहिलं होतं. त्यावेळी शाहरुख खानच्या ‘रेड चिलीज एंटरटेन्मेंट’ या कंपनीकडे असलेलं तब्बल 42 लाख रुपयांचं DCP बिल माफ करण्यात आलं. प्रवीण तरडे यांनी या मदतीमागची कहाणी सांगितली होती. विशेष म्हणजे, चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठं यश मिळवल्यानंतर निर्मात्यांनी नफा स्वतःकडे न ठेवता शेतकरी कुटुंबातील मुलांच्या शिक्षणासाठी देण्याचा निर्णय घेतला आहे.

‘देऊळ बंद 2’ हा तुलनेनं मर्यादित बजेटमध्ये तयार झालेला चित्रपट आहे. थिएटरमध्ये डिजिटल पद्धतीने चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी आवश्यक असलेल्या डिजिटल सिनेमा पॅकेज म्हणजेच DCPसाठी निर्मात्यांना सुरुवातीला सुमारे 12 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित होता. मात्र, प्रत्यक्ष बिल जवळपास 42 लाख रुपये आलं होतं. इतकी मोठी रक्कम उभी करणं निर्मात्यांसाठी कठीण होतं. त्यामुळे त्यांनी रेड चिलीज एंटरटेन्मेंटशी संपर्क साधून आपली आर्थिक परिस्थिती समजावून सांगितली. मराठी चित्रपट असून बजेट मर्यादित असल्याचं त्यांनी कंपनीला सांगितलं. हा चित्रपट मोठ्या प्रमाणावर प्रदर्शित करण्याची इच्छा असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

ही बाब अखेर शाहरुख खानपर्यंत पोहोचली. प्रवीण तरडे यांच्या म्हणण्यानुसार, शाहरुखला चित्रपटाच्या टीमबद्दल आधीपासून माहिती होती. ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटाच्या टीमने ‘देऊळ बंद 2’ तयार केला असल्याचं त्याला सांगण्यात आलं. चित्रपटाचा DCP तयार असूनही केवळ बिलाची रक्कम न भरल्यामुळे तो पुढे नेता येत नसल्याचं कळल्यानंतर शाहरुखने बिल माफ करण्याचे निर्देश दिले. ‘चित्रपट चांगला असेल तर पैसे नंतर पाहू’ या भूमिकेतून त्याने निर्मात्यांना मदत केल्याचं तरडे यांनी सांगितलं.

‘देऊळ बंद 2’ने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली आहे. चित्रपटाने 100 कोटींचा टप्पा गाठला आहे. मात्र, या यशाचा वैयक्तिक फायदा करून घेण्याऐवजी निर्मात्यांनी सामाजिक उपक्रमाचा निर्णय घेतला आहे. चित्रपटाची निर्मिती किंमत वजा केल्यानंतर मिळणारा संपूर्ण नफा आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी देण्यात येत आहे. विशेषतः दुष्काळग्रस्त भागातील मुलांना शिक्षण सुरू ठेवण्यासाठी या निधीचा उपयोग केला जात आहे.

याशिवाय या चित्रपटाच्या माध्यमातून जवळपास 250 मुलांना दिवसातून दोन वेळचं जेवण देण्याचाही उपक्रम सुरू असल्याचं प्रवीण तरडे यांनी सांगितलं. त्यामुळे ‘देऊळ बंद 2’चं यश केवळ बॉक्स ऑफिसच्या आकड्यांपुरतं मर्यादित न राहता सामाजिक मदतीच्या रूपातही पुढे जात आहे.

Follow Us
अंबादास दानवेंच्या निवासस्थानी रक्षाबंधन सण उत्साहात साजरा, Video पहा
अंबादास दानवेंच्या निवासस्थानी रक्षाबंधन सण उत्साहात साजरा, Video आला समोर
कुणीही घरी बसू नका; अंतरवाली सराटीत या' मनोज जरांगेचं मोठं आवाहन
Manoj Jarange On Hunger Strike | 'कुणीही घरी बसू नका; अंतरवाली सराटीत या' मनोज जरांगेचं मोठं आवाहन
हिरव्या निसर्गाच्या सान्निध्यात मुंबई-गोवा हायवेचं विलोभनीय सौंदर्य,
हिरव्या निसर्गाच्या सान्निध्यात मुंबई-गोवा हायवेचं विलोभनीय सौंदर्य, पाहा मनमोहक दृश्य
आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात श्रीकांत शिंदे ॲक्टिव्ह मोडवर; 12 तासांतच
आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात खासदार श्रीकांत शिंदे ॲक्टिव्ह मोडवर;12 तासांतच...
एमपीएससी पेपरफुटी: ऋतुजा पाटीलची प्रश्नपत्रिकेसाठी ५ लाखांची मागणी
एमपीएससी पेपरफुटी: ऋतुजा पाटीलची प्रश्नपत्रिकेसाठी ५ लाखांची मागणी
मुंबईत दुधाच्या दरात 1 सप्टेंबरपासून 9 रुपयांची वाढ
मुंबईत दुधाच्या दरात 1 सप्टेंबरपासून 9 रुपयांची वाढ
नेपाळमध्ये अडकलेल्या साताऱ्यातील महिला पर्यटकांशी शिंदेंचा संवाद
नेपाळमध्ये अडकलेल्या साताऱ्यातील महिला पर्यटकांशी उपमुख्यमंत्री शिंदेंचा व्हिडीओ कॉल
नेपाळमध्ये अडकलेल्या ११५ महाराष्ट्रीयांना मुख्यमंत्र्यांकडून मदत
नेपाळमध्ये अडकलेल्या ११५ महाराष्ट्रीयांना मुख्यमंत्र्यांकडून मदतीचा हात, सुखरूप परत आणणार
मुंबई महापालिकेकडून शालेय साहित्य वाटपास विलंब: इराण युद्ध कारणीभूत
मुंबईतील शालेय मुलांना छत्र्या मिळेनात: मुंबई महापालिकेचे अजब उत्तर इराण युद्ध
शिल्पा गवारे कुटुंबीयांकडून छळाचा आरोप, न्यायची मागणी
पिंपरी चिंचवडमधील शिल्पा गवारे मृत्यू प्रकरण: पती, सासू-सासरे आणि दिराला पोलीस कोठडी