AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पृथ्वीच्या मदतीमुळे चंद्रावर तयार होतंय पाणी, Chandrayaan-1 च्या डेटामुळे झाला खुलासा

चंद्रावर पाणी कसे आणि कुठे मिळेल किंवा किती वेळात तयार करता येईल याची माहिती जर शोधता आली तर भविष्यात चंद्रावर मनुष्यवस्ती वसवण्यास मदत मिळेल.

पृथ्वीच्या मदतीमुळे चंद्रावर तयार होतंय पाणी, Chandrayaan-1 च्या डेटामुळे झाला खुलासा
chandrayaan-1Image Credit source: socialmedia
| Updated on: Sep 15, 2023 | 9:23 PM
Share

नवी दिल्ली | 15 सप्टेंबर 2023 : भारताच्या चंद्रयान-3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी सॉफ्ट लॅंडींग करुन इतिहास घडविला आहे. परंतू इस्रोच्या चंद्रयान-1 ने साल 2008 मध्ये चंद्रावर पाण्याचे अंश असल्याचा शोध लावला होता. परंतू आता चंद्रयान-1 च्या डाटाचा अभ्यास करुन संशोधकांनी दावा केला आहे की पृथ्वीमुळेच चंद्रावर पाणी तयार होत आहे. पृथ्वीवरुन जाणारे हाय एनर्जी इलेक्ट्रॉन्स चंद्रावर पाणी तयार करण्यासाठी मदत करीत आहेत. हे संशोधन अमेरिकेतील मनोवा येथील हवाई युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी केले आहे.

पृथ्वीवरील इलेक्ट्रॉन चंद्रावर पाणी तयार करण्यास हातभार लावत आहेत. अमेरिकेतील संशोधकांच्या अभ्यासात असे आढळले की पृथ्वीवरील उपस्थित प्लाझा शिटमुळे चंद्रावरील दगड वितळतात किंवा त्यांची झिज होते. आणि खनिजांची निर्मिती होत असते. किंवा ते बाहेर येतात. तसेच चंद्राचा पृष्ठभाग आणि वातावरण बदलत असते. हा अभ्यास अलिकडेच नेचर एस्ट्रॉनॉमी जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे. त्यात म्हटले आहे की इलेक्ट्रॉन्समुळेच चंद्रावर पाणी तयार होते. चंद्रावर पाण्याचे किती प्रमाण आहे हे अजूनही कळलेले नाही. आणि त्याचा शोध घेणेही कठीण आहे. त्यामुळे चंद्रावरील पाण्याच्या उत्पत्तीच्या कारणांचा शोध लागलेला नाही.

तरच चंद्रावर मनुष्यवस्ती शक्य

चंद्रावर पाणी कसे आणि कुठे मिळेल किंवा किती वेळात तयार करता येईल याची माहिती जर शोधता आली तर भविष्यात चंद्रावर मनुष्यवस्ती वसवण्यास मदत मिळेल. चंद्रयान-1च्या एका यंत्राने चंद्राच्या पृष्ठभागावर पाण्याचे कण शोधले होते. हे भारताचे पहिले मिशन होते. चंद्र आणि पृथ्वी दोघेही सौर हवेच्या क्षेत्रात येतात. सौर हवेतील एनर्जी कण उदा. प्रोटोन आणि इलेक्टॉन वेगाने चंद्राच्या पृष्ठभागावर मारा करतात. त्यामुळे चंद्रावर पाणी तयार होत आहे असे संशोधकांचे म्हणणे आहे. सौर हवा जेव्हा पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रातून जाते तेव्हा ती चंद्राला वाचविते. परंतू पृथ्वी सुर्यापासून निघणाऱ्या हलक्या कणांपासून चंद्राला ती वाचवू शकत नाही.

पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राचा परिणाम

चंद्र पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रातून बाहेर असतो तेव्हा सुर्याच्या गरम हवेचा मारा त्याच्यावर जादा होतो. आणि पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राच्या आत असतो तेव्हा सुर्याच्या हवेचा काहीही मारा होत नाही. अशा वेळी पाणी तयार होण्याची प्रक्रिया बंद होते. पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रामुळे चंद्रावर पाणी बनण्याच्या प्रक्रियेत वेग किंवा शैथिल्य येते. याचा अर्थ पाणी तयार करण्यास चुंबकीय क्षेत्र थेट जबाबदार नाही. परंतू त्याचा प्रभाव मात्र आहे. सौर हवेतील हाय एनर्जी प्रोटोन्स-इलेक्ट्रॉन्सचा परिणाम होतो. सहायक संशोधक शुआई ली आणि त्यांचे साथीदार चंद्रयान-1 च्या मून मिनरोलॉजी मॅपर इंस्ट्रूमेंटने पाठविलेल्या डेटाचे वर्गीकरण केले आहे.

Follow Us
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून...
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून....
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न.
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट....
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.