AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पृथ्वीच्या मदतीमुळे चंद्रावर तयार होतंय पाणी, Chandrayaan-1 च्या डेटामुळे झाला खुलासा

चंद्रावर पाणी कसे आणि कुठे मिळेल किंवा किती वेळात तयार करता येईल याची माहिती जर शोधता आली तर भविष्यात चंद्रावर मनुष्यवस्ती वसवण्यास मदत मिळेल.

पृथ्वीच्या मदतीमुळे चंद्रावर तयार होतंय पाणी, Chandrayaan-1 च्या डेटामुळे झाला खुलासा
chandrayaan-1Image Credit source: socialmedia
| Updated on: Sep 15, 2023 | 9:23 PM
Share

नवी दिल्ली | 15 सप्टेंबर 2023 : भारताच्या चंद्रयान-3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी सॉफ्ट लॅंडींग करुन इतिहास घडविला आहे. परंतू इस्रोच्या चंद्रयान-1 ने साल 2008 मध्ये चंद्रावर पाण्याचे अंश असल्याचा शोध लावला होता. परंतू आता चंद्रयान-1 च्या डाटाचा अभ्यास करुन संशोधकांनी दावा केला आहे की पृथ्वीमुळेच चंद्रावर पाणी तयार होत आहे. पृथ्वीवरुन जाणारे हाय एनर्जी इलेक्ट्रॉन्स चंद्रावर पाणी तयार करण्यासाठी मदत करीत आहेत. हे संशोधन अमेरिकेतील मनोवा येथील हवाई युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी केले आहे.

पृथ्वीवरील इलेक्ट्रॉन चंद्रावर पाणी तयार करण्यास हातभार लावत आहेत. अमेरिकेतील संशोधकांच्या अभ्यासात असे आढळले की पृथ्वीवरील उपस्थित प्लाझा शिटमुळे चंद्रावरील दगड वितळतात किंवा त्यांची झिज होते. आणि खनिजांची निर्मिती होत असते. किंवा ते बाहेर येतात. तसेच चंद्राचा पृष्ठभाग आणि वातावरण बदलत असते. हा अभ्यास अलिकडेच नेचर एस्ट्रॉनॉमी जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे. त्यात म्हटले आहे की इलेक्ट्रॉन्समुळेच चंद्रावर पाणी तयार होते. चंद्रावर पाण्याचे किती प्रमाण आहे हे अजूनही कळलेले नाही. आणि त्याचा शोध घेणेही कठीण आहे. त्यामुळे चंद्रावरील पाण्याच्या उत्पत्तीच्या कारणांचा शोध लागलेला नाही.

तरच चंद्रावर मनुष्यवस्ती शक्य

चंद्रावर पाणी कसे आणि कुठे मिळेल किंवा किती वेळात तयार करता येईल याची माहिती जर शोधता आली तर भविष्यात चंद्रावर मनुष्यवस्ती वसवण्यास मदत मिळेल. चंद्रयान-1च्या एका यंत्राने चंद्राच्या पृष्ठभागावर पाण्याचे कण शोधले होते. हे भारताचे पहिले मिशन होते. चंद्र आणि पृथ्वी दोघेही सौर हवेच्या क्षेत्रात येतात. सौर हवेतील एनर्जी कण उदा. प्रोटोन आणि इलेक्टॉन वेगाने चंद्राच्या पृष्ठभागावर मारा करतात. त्यामुळे चंद्रावर पाणी तयार होत आहे असे संशोधकांचे म्हणणे आहे. सौर हवा जेव्हा पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रातून जाते तेव्हा ती चंद्राला वाचविते. परंतू पृथ्वी सुर्यापासून निघणाऱ्या हलक्या कणांपासून चंद्राला ती वाचवू शकत नाही.

पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राचा परिणाम

चंद्र पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रातून बाहेर असतो तेव्हा सुर्याच्या गरम हवेचा मारा त्याच्यावर जादा होतो. आणि पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राच्या आत असतो तेव्हा सुर्याच्या हवेचा काहीही मारा होत नाही. अशा वेळी पाणी तयार होण्याची प्रक्रिया बंद होते. पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रामुळे चंद्रावर पाणी बनण्याच्या प्रक्रियेत वेग किंवा शैथिल्य येते. याचा अर्थ पाणी तयार करण्यास चुंबकीय क्षेत्र थेट जबाबदार नाही. परंतू त्याचा प्रभाव मात्र आहे. सौर हवेतील हाय एनर्जी प्रोटोन्स-इलेक्ट्रॉन्सचा परिणाम होतो. सहायक संशोधक शुआई ली आणि त्यांचे साथीदार चंद्रयान-1 च्या मून मिनरोलॉजी मॅपर इंस्ट्रूमेंटने पाठविलेल्या डेटाचे वर्गीकरण केले आहे.

Follow Us
उदय सामंत: 'एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य'
उदय सामंत: एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य
मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे
'मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे', रिक्षाचालकांच्या मराठी सक्तीवरून शिंदेंची प्रतिक्रिया
मराठी न बोलल्यास परवाना रद्द करण्याच्या धमक्यांवरचा दुबेंचा इशारा
संजय दुबे यांचा प्रताप सरनाईक यांच्या मराठी भाषेच्या सक्तीला थेट विरोध
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल:
शरद पवार एनडीएमध्ये जाणार नाहीत, विरोधातच राहणार
पवारांकडून एनडीएमध्ये जाण्याच्या चर्चा फेटाळल्या; पक्ष कार्यकर्त्यांना दिले स्पष्ट निर्देश
देशमुखांचं कारागृह महानिरीक्षकांना पत्र; गैरप्रकारांच्या चौकशीची मागणी
धनंजय देशमुखांचे बीड कारागृह महानिरीक्षकांना पत्र: गैरप्रकार चौकशी आणि आरोपी स्थलांतराची मागणी
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर? ठाण्यातील कार्यक्रमात भाजप नेत्यांची अनुपस्थिती
बेस्ट कामगारांचा बेमुदत संप; प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
बेस्ट कामगारांचा मंगळवारपासून बेमुदत संप: प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
पालकमंत्री महाजनांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना मदत
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना अवयव प्रत्यारोपणासाठी मदत