AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता मनीष तिवारींच्या पुस्तकावरून वाद, 26/11 नंतर PAK वर कारवाई न करणे मनमोहन सरकारची कमजोरी होती, भाजपने मागितले उत्तर

मनीष तिवारी यांनी त्यांच्या नव्या पुस्तकात लिहिले आहे की, मुंबई हल्ल्यानंतर तत्कालीन यूपीए सरकारने पाकिस्तानवर कठोर कारवाई करायला हवी होती. ही अशी वेळ होती जेव्हा कारवाई करणे आवश्यक होते. एक देश (पाकिस्तान) निरपराध लोकांना मारतो आणि त्याबद्दल त्यांना कोणताही पश्चाताप नाही, असे त्यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिले आहे.

आता मनीष तिवारींच्या पुस्तकावरून वाद, 26/11 नंतर PAK वर कारवाई न करणे मनमोहन सरकारची कमजोरी होती, भाजपने मागितले उत्तर
Manish Tiwari
| Edited By: Devashri Bhujbal | Updated on: Nov 23, 2021 | 3:42 PM
Share

नवी दिल्लीः कॉंग्रेस ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांच्यानंतर आता काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री मनीष तिवारी यांचं एक पुस्तक प्रकाशीत होणार आहे, ज्याच्यावरून वाद निर्माण झाला आहे. नव्या पुस्तकात तिवारी यांनी आपल्याच सरकारच्या रणनीतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मनमोहन सिंग यांच्या यूपीए सरकारवर त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. मुंबईतील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानविरुद्ध कोणतीही कारवाई न करणे हे यूपीए सरकारचे कमजोरीपणा आहे, असं व्यक्तव्य त्यांनी केले आहे. मनीष तिवारींच्या नवीन पुस्तकाचे नाव 10 Flash Points, 20 Years असं आहे. या नव्या पुस्तकावर भारतीय जनता पक्षही आक्रमक झाला असून सोनिया गांधींना मौन तोडून उत्तर देण्याची मागणी केली आहे.

मनीष तिवारी यांनी मोदी सरकारवरही हल्लाबोल केला आहे. 26/11 ची परिस्थिती हाताळल्याबद्दल तिवारी यांनी सरकारवर केलेल्या टीकेवर केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले की, 26/11 असो वा अन्य कोणताही विषय, एकूण परिस्थिती कशी हाताळली गेली हे देशाला माहित आहे. मला या प्रकरणाचे राजकारण करायचे नाही. मोदी सरकारचे धोरण दहशतवादाबाबत शून्य सहनशीलतेचे आहे.

मनीष तिवारी यांनी त्यांच्या नव्या पुस्तकात लिहिले आहे की, मुंबई हल्ल्यानंतर तत्कालीन यूपीए सरकारने पाकिस्तानवर कठोर कारवाई करायला हवी होती. ही अशी वेळ होती जेव्हा कारवाई करणे आवश्यक होते. एक देश (पाकिस्तान) निरपराध लोकांना मारतो आणि त्याबद्दल त्यांना कोणताही पश्चाताप नाही, असे त्यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिले आहे. यानंतरही जर आपण संयम बाळगत राहिलो तर ते ताकदीचे नसून दुर्बलतेचे लक्षण आहे. माजी केंद्रीय मंत्र्यांनी 26/11 च्या हल्ल्याची तुलना अमेरिकेच्या 9/11 हल्ल्याशी केली आहे.

मनीष तिवारी यांच्या नव्या पुस्तकाचा वाद समोर आल्यानंतर भारतीय जनता पक्षाने (भाजप) काँग्रेसवर प्रश्न उपस्थित केले आहेत. पक्षाचे प्रवक्ते गौरव भाटिया यांनी तत्कालीन यूपीए सरकारचे हेतू वाईट असल्याचे म्हटले. भाटिया म्हणाले की, तत्कालीन एअर चीफ मार्शल म्हणाले होते की, आमचे हवाई दल प्रत्युत्तर देण्यासाठी तयार आहे, परंतु कारवाई करण्यास परवानगी देण्यात आली नाही. यावर आता काँग्रेसने उत्तर द्यावे.

काँग्रेसवर हल्लाबोल करताना ते म्हणाले की, राष्ट्रीय सुरक्षेसारख्या मुद्द्यांवर त्यांना भारताच्या अखंडतेचीही चिंता वाटत नाही. आज काँग्रेसच्या राजवटीत मंत्री राहिलेल्या मनीष तिवारी यांनी आपल्या सरकारने राष्ट्रीय सुरक्षा पणाला लावल्याची कबुली दिली आहे. ते विचारले की, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी जी, आज राहुल गांधी आपले मौन तोडणार का?

अमित मालवीय यांनी ट्विटमध्ये काल मणिशंकर अय्यर यांनी संरक्षण खर्चावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि आज मनीष तिवारी यांनी 26/11 रोजी यूपीएच्या कमकुवत प्रतिसादाबद्दल खेद व्यक्त केला.

इतर बातम्या-

Farm Laws: सरकार शेतकऱ्यांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे, सरकारी अधिकारी तज्ज्ञ झाले आहेत- शेतकरी नेते टिकैत यांचा आरोप

‘तलवार नही, कलम जिंदा रखेगी तुमको’, सोलापुरात ओवेसींकडून ‘फुले आंबेडकरांचा’ धडा, नेमके काय म्हणाले?

Follow Us
कांदाप्रश्न सोडव्यासाठी थेट दिल्लीला साकडं, सरकारचं शिष्टमंडळ राजधानीत
कांदाप्रश्न सोडव्यासाठी थेट दिल्लीला साकडं, सरकारचं शिष्टमंडळ राजधानीत.
आता काही खरं नाही! मोटेगावकरचा पाय आणखी खोलात, NEET स्पेशल बॅचबाबत...
आता काही खरं नाही! मोटेगावकरचा पाय आणखी खोलात, NEET स्पेशल बॅचबाबत....
महायुतीतील तिढा आज सुटणार? मुख्यमंत्र्यांनी बोलावली महत्त्वाची बैठक
महायुतीतील तिढा आज सुटणार? मुख्यमंत्र्यांनी बोलावली महत्त्वाची बैठक.
इंधन संकटामुळे ST महामंडळ अलर्ट मोडवर; प्रताप सरनाईकांचा मोठा निर्णय!
इंधन संकटामुळे ST महामंडळ अलर्ट मोडवर; प्रताप सरनाईकांचा मोठा निर्णय!.
कांदा आंदोलन पेटलं! थेट रोहित पवारांसह आणखी दोघं पोलिसांच्या ताब्यात
कांदा आंदोलन पेटलं! थेट रोहित पवारांसह आणखी दोघं पोलिसांच्या ताब्यात.
24 रुपयांचं आश्वासन हवेत? कांदा प्रश्नावर पवारांचा सरकारवर हल्लाबोल
24 रुपयांचं आश्वासन हवेत? कांदा प्रश्नावर पवारांचा सरकारवर हल्लाबोल.
मोठी बातमी! TCS प्रकरणात फॉरेन्सिक टीमची एन्ट्री, मतीन पटेल निदा खानशी
मोठी बातमी! TCS प्रकरणात फॉरेन्सिक टीमची एन्ट्री, मतीन पटेल निदा खानशी.
कांद्याने रडवलं! महामार्ग रोखत शेतकऱ्यांचा आक्रोश, ही फक्त सुरुवात आहे
कांद्याने रडवलं! महामार्ग रोखत शेतकऱ्यांचा आक्रोश, ही फक्त सुरुवात आहे.
धक्कादायक! वाल्मिक कराड जेलमध्ये तरीही गँग सक्रीय, 3 लाखांच्या खंडणी..
धक्कादायक! वाल्मिक कराड जेलमध्ये तरीही गँग सक्रीय, 3 लाखांच्या खंडणी...
विधान परिषद जागावाटपावरून महायुतीत धुसफूस; दिल्ली-पासून मुंबईपर्यंत...
विधान परिषद जागावाटपावरून महायुतीत धुसफूस; दिल्ली-पासून मुंबईपर्यंत....