AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“आम्ही निवडणूक आयोगावर आरोप करत नाही, आम्हाला…”, राहुल गांधींकडून फक्त एकाच गोष्टीची मागणी

महाराष्ट्राची लोकसंख्या ९ कोटी ५४ लाख. मग मतदार त्यापेक्षा अधिक कसे वाढले? निवडणुकीपूर्वी एवढे मतदार कसे आले? पाच महिन्यात सात लाखापेक्षा अधिक मतदार आले. विधानसभेत ३९ लाख नवीन मतदार आले कसे? असे अनेक सवाल राहुल गांधींनी उपस्थित केले.

आम्ही निवडणूक आयोगावर आरोप करत नाही, आम्हाला..., राहुल गांधींकडून फक्त एकाच गोष्टीची मागणी
rahul gandhi
| Updated on: Feb 07, 2025 | 1:06 PM
Share

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले आहे. पण या निकालावर अनेकांनी संशय व्यक्त केला. यानंतर ईव्हीएममध्ये फेरफार केल्याचा आरोप सातत्याने महायुतीवर केला जात आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत संध्याकाळी 6.00 नंतर झालेल्या मतदानाच्या आकडेवारीवर विरोधी पक्षांनी आक्षेप नोंदवला आहे. आता याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत राहुल गांधींनी ईव्हीएममध्ये कशाप्रकारे फेरफार झाला, मतदार कसे वा़ढले, याबद्दल सविस्तर भाष्य केले.

“महाराष्ट्र निवडणुकीतील आम्हाला काही माहिती मिळाली आहे. आम्ही डिटेल्स अभ्यास केला. मतदार यादी आणि व्होटिंग पॅटर्न आम्ही तपासला. त्यात अनेक तफावत दिसून आली. तरुण मुलं मुली लोकशाहीवर विश्वास ठेवतात. सरकारने निवडणुकीसाठी एक समिती स्थापन केली होती. त्यात चीफ जस्टीस असायचे. त्यांना काढून भाजपच्या माणसाला घेतले. निवडणुकीच्या तोंडावर निवडणूक आयुक्त बदलले. विधानसभेत २०१९ आणि लोकसभा २०२४मध्ये ३२ लाख मतदार मतदार अॅड झाले. पाच वर्षात ३४ लाख मतदार वाढले. पाच वर्षाच्या तुलनेत पाच महिन्यात एवढे मतदार कसे वाढले. हो लोक कोण आहेत?” असा सवाल राहुल गांधींनी केला.

“विधानसभेत ३९ लाख नवीन मतदार आले कसे?”

“या निवडणुकीत हिमाचल प्रदेशातील लोकसंख्ये एवढे मतदार वाढले. महाराष्ट्रातील लोकसंख्येच्या तुलनेत मतदार कसे वाढले. महाराष्ट्राची लोकसंख्या ९ कोटी. महाराष्ट्राची लोकसंख्या ९ कोटी ५४ लाख. मग मतदार त्यापेक्षा अधिक कसे वाढले? निवडणुकीपूर्वी एवढे मतदार कसे आले? पाच महिन्यात सात लाखापेक्षा अधिक मतदार आले. विधानसभेत ३९ लाख नवीन मतदार आले कसे?” असे अनेक सवाल राहुल गांधींनी उपस्थित केले.

“निवडणुकीत पारदर्शकता ठेवण्याची जबाबदारी आमची नाही”

“ज्या मतदारांची नावे वगळण्यात आली ते दलित, मुस्लिम आणि आदिवासी समाजातील आहेत. आम्ही याबाबत निवडणूक आयोगाला विचारलं. पण त्यांनी आजतागायत काहीच उत्तर दिलेलं नाही. मी डेटा दिला आहे. मी पुन्हा एकदा निवडणूक आयोगाला विचारत आहोत. महाराष्ट्रातील तीन महत्त्वाचे विरोधी पक्ष म्हणून आम्ही विचारत आहोत. हे मतदार वाढले कसे. निवडणुकीत पारदर्शकता ठेवण्याची जबाबदारी आमची नाही. तुमची आहे. या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे”, असेही राहुल गांधी म्हणाले.

“महाराष्ट्रात प्रौढ मतदारांपेक्षा अधिक मतदार आहेत”

“पाच वर्षात जेवढे मतदार मतदार यादीत अॅड केले होते. त्यापेक्षा जास्त मतदार महाराष्ट्रात पाच महिन्यात अॅड झाले. ३२ लाख मतदार २०१९ ते २०२४ दरम्यान अॅड झाले. विधानसभेत ३९ लाख मतदार अॅड झाले. हिमाचल प्रदेशातील लोकसंख्ये एवढे आहेत. हे मतदार कोण आहेत. कुठून आले? सरकारी आकडेवारी नुसार महाराष्ट्राची प्रोढ मतदारसंघ्या ९.५४ कोटी आहे. निवडणूक आयोगाच्या मते ९.७ कोटी मते महाराष्ट्रात आहे. म्हणजे महाराष्ट्रात प्रौढ मतदारांपेक्षा अधिक मतदार आहेत”, असा खुलासा राहुल गांधींनी केला.

आमचे मत महाराष्ट्रात कमी झाले नाही

“कामठीत १.३४ लाख लोकसभेत काँग्रेसला मते मिळाली. आम्ही जिंकलो. विधानसभेत तेवढीच मते मिळाली. विधानसभेत भाजपला १.१९ लाख मिळतात. या मतदारसंघात ३५ हजार नवीन मतदार अॅड होता. हे सर्व मते भाजपच्या खात्यात जातात आणि भाजप जिंकते. हे एक उदाहरण आहे. असे महाराष्ट्रात अनेक उदहारण आहे. आमचे मत महाराष्ट्रात कमी झाले नाही. भाजपचे मतं जादा झाले आहेत. हे मतदार कुठे अॅड झाले आहे जिथे भाजपची स्ट्राईक रेट ९ टक्क्याहून अधिक आहे. इतिहासात स्ट्राईक रेट ९ टक्क्यापेक्षा अधिक नाही”, असेही राहुल गांधी म्हणाले.

विधानसभेची मतदार यादी निवडणूक आयोगाने द्यावी

“आम्ही निवडणूक आयोगावर आरोप करत नाही. आम्ही आरोप केले पाहिजे. पण आरोप करत नाही. फक्त आम्हाला लोकसभा आणि विधानसभेची मतदार यादी निवडणूक आयोगाने द्यावी. नाव, पत्ता आणि फोटोग्राफसह द्यावी. निवडणूक आयोग आम्हाला यादी देत नाही. त्यांची जबाबदारी आहे. लोकसभा आणि विधानसभेची यादी आम्हाला द्यावी”, असेही राहुल गांधी म्हणाले.

Follow Us
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील.
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?.
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद...
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद....
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी.
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?.
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?.
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे.
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद.
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये...
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये....
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप.