AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काँग्रेसवरील कारवाई फक्त बदनामीसाठी; जयराम रमेशांचा केंद्रावर हल्लाबोल

काँग्रेसला बदनाम करण्यासाठी आणि रोजच्या प्रश्नांवरुन लोकांचे लक्ष हटवण्यासाठी हा प्रकार करण्यात आला आहे.

काँग्रेसवरील कारवाई फक्त बदनामीसाठी; जयराम रमेशांचा केंद्रावर हल्लाबोल
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: Oct 23, 2022 | 10:20 PM
Share

नवी दिल्लीः राजीव गांधी फाऊंडेशन (RGF) आणि राहुल गांधी चॅरिटेबल ट्रस्ट (RGCT) यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईवरून काँग्रेसने केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. देशातील मुख्य प्रश्नांपासून लोकांचे लक्ष हटवण्यासाठी ही कारवाई केली गेली असल्याचे त्यांनी म्हटले आहे. कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल सरकारने सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखालील असलेल्या संस्थांचे परवाने परवाने रद्द केले आहेत. याबद्दल बोलताना काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश (General Secretary Jairam Ramesh) यांनी सांगितले की, केंद्राने आरजीएफ आणि आरजीसीटीवर जुन्या आरोपांचीच पुनरावृत्ती केली आहे.

काँग्रेसला बदनाम करण्यासाठी आणि रोजच्या प्रश्नांवरुन लोकांचे लक्ष हटवण्यासाठी हा प्रकार करण्यात आला आहे. सध्या देशाची अर्थव्यवस्था प्रचंड धोक्यात आहे. त्यामुळे त्याच्यावर उठवलेल्या आवाजामुळेच भाजपने ही खेळी खेळल्याचे म्हटले आहे

काँग्रेस पक्षाने सांगितले आहे आहे की, कारवाई केलेल्या या दोन्ही संस्था माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येनंतर स्थापन करण्यात आल्या आहेत.

सद्भावना आणि सर्वसमावेशक, शाश्वत विकासाच्या विचारांसाठी त्या काम करतात. जयराम रमेश म्हणाले, ट्रस्टकडून नेहमीच धर्मादाय आणि इतर सर्व कायदे आणि नियमांचे पालन करतच त्याचा प्रवास सुरु आहे.

केंद्र सरकारने आज काँग्रेसच्या नेतृत्वाखालील असलेल्या दोन्ही एनजीओंचे परवाना रद्द केले आहेत. त्यामध्ये या दोन एनजीओंचा परवाना रद्द करण्यात आला आहे. त्यामध्ये राजीव गांधी फाउंडेशन आणि राजीव गांधी चॅरिटेबल ट्रस्ट (RGCT) यांचा समावेश आहे.

या स्वयंसेवी संस्थांवर कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी गृह मंत्रालयाने ही कारवाई करण्यात आली असली तरी ही कारवाई सूडबुद्धीने केली असल्याची टीका त्यांनी केली आहे.

याबाबत भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी सांगितले की, या एनजीओ चीनमधून पैसे येत होते, त्यामुळे सरकारकडून त्यांचे परवाने रद्द करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले.

Follow Us
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं...
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं का म्हणाले? टर्निंग पॉइंट ठरणारा मुद्दा काय?
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर... अखेर कपिल सिब्बल यांची कोर्टाकडे मोठी मागणी
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...
Manoj Jarange Video | भर मंचावरून मनोज जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीरावरून, चेहऱ्यावरून...
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण...
Sukhbir Singh Badal | पंजाबच्या माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण काय? याआधीही... मोठी अपडेट समोर
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय...
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे...
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे आदेश आयोगाला देऊ शकत नाही, मग...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल यांनी नेमका युक्तिवाद काय लढवला?
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजून झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या...
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजूने झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर युक्तिवाद, कोर्टाचं निदर्शन काय?
कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
शिवसेना पक्षचिन्ह प्रकरण: कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
पेगलवाडी रस्त्याची पाहणी. विद्यार्थ्यांशी साधला संवाद.
आदित्य ठाकरे यांच्याकडून त्र्यंबकेश्वरमधील पेगलवाडी रस्त्याची पाहणी. विद्यार्थ्यांशी साधला संवाद.