AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काँग्रेसवरील कारवाई फक्त बदनामीसाठी; जयराम रमेशांचा केंद्रावर हल्लाबोल

काँग्रेसला बदनाम करण्यासाठी आणि रोजच्या प्रश्नांवरुन लोकांचे लक्ष हटवण्यासाठी हा प्रकार करण्यात आला आहे.

काँग्रेसवरील कारवाई फक्त बदनामीसाठी; जयराम रमेशांचा केंद्रावर हल्लाबोल
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: Oct 23, 2022 | 10:20 PM
Share

नवी दिल्लीः राजीव गांधी फाऊंडेशन (RGF) आणि राहुल गांधी चॅरिटेबल ट्रस्ट (RGCT) यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईवरून काँग्रेसने केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. देशातील मुख्य प्रश्नांपासून लोकांचे लक्ष हटवण्यासाठी ही कारवाई केली गेली असल्याचे त्यांनी म्हटले आहे. कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल सरकारने सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखालील असलेल्या संस्थांचे परवाने परवाने रद्द केले आहेत. याबद्दल बोलताना काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश (General Secretary Jairam Ramesh) यांनी सांगितले की, केंद्राने आरजीएफ आणि आरजीसीटीवर जुन्या आरोपांचीच पुनरावृत्ती केली आहे.

काँग्रेसला बदनाम करण्यासाठी आणि रोजच्या प्रश्नांवरुन लोकांचे लक्ष हटवण्यासाठी हा प्रकार करण्यात आला आहे. सध्या देशाची अर्थव्यवस्था प्रचंड धोक्यात आहे. त्यामुळे त्याच्यावर उठवलेल्या आवाजामुळेच भाजपने ही खेळी खेळल्याचे म्हटले आहे

काँग्रेस पक्षाने सांगितले आहे आहे की, कारवाई केलेल्या या दोन्ही संस्था माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येनंतर स्थापन करण्यात आल्या आहेत.

सद्भावना आणि सर्वसमावेशक, शाश्वत विकासाच्या विचारांसाठी त्या काम करतात. जयराम रमेश म्हणाले, ट्रस्टकडून नेहमीच धर्मादाय आणि इतर सर्व कायदे आणि नियमांचे पालन करतच त्याचा प्रवास सुरु आहे.

केंद्र सरकारने आज काँग्रेसच्या नेतृत्वाखालील असलेल्या दोन्ही एनजीओंचे परवाना रद्द केले आहेत. त्यामध्ये या दोन एनजीओंचा परवाना रद्द करण्यात आला आहे. त्यामध्ये राजीव गांधी फाउंडेशन आणि राजीव गांधी चॅरिटेबल ट्रस्ट (RGCT) यांचा समावेश आहे.

या स्वयंसेवी संस्थांवर कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी गृह मंत्रालयाने ही कारवाई करण्यात आली असली तरी ही कारवाई सूडबुद्धीने केली असल्याची टीका त्यांनी केली आहे.

याबाबत भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी सांगितले की, या एनजीओ चीनमधून पैसे येत होते, त्यामुळे सरकारकडून त्यांचे परवाने रद्द करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले.

Follow Us
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत म्हणाले 500 कोटी...
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न होईल; 12 तासाच्या चौकशीत...
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून डोकं चक्रावणारी माहिती समोर
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
Big Breaking | ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळीतच...
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर, म्हणाले, मला विमानात तर...
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार भावुक,  त्या पत्राची सोशल मीडियावर चर्चा!
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदें
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदेंच्या आमदारानं सागळं सांगून टाकलं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं हटके प्रत्युत्तर; थेट 40 वर्षजूना...
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलू
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलून गेले
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत उद्धव ठाकरेंचा मोठा दावा