
मोठी बातमी समोर येत आहे. भारतामध्ये दहशतवादी हल्ले घडवून आणणाऱ्या लष्कर ए तैयबा या दहशतवादी संघटनेच्या एका कमांडरची पाकिस्तानमध्ये हत्या करण्यात आली आहे. एका रिपोर्टनुसार बिलाल आरिफ सलाफी असं या दहशतवाद्याचं नावं आहे. शनिवारी इदच्या नमाजवरून परतत असताना बिलाल आरिफ सलाफी याच्यावर आधी चाकून हल्ला करण्यात आला, त्यानंतर त्याच्यावर गोळा झाडण्यात आल्या. या हल्ल्यामध्ये त्याचा मृत्यू झाला आहे. बिलाल याची मुरीदकेच्या उद्ध्वस्त झालेल्या लष्कर एक तैयबाच्या मुख्यालयाजवळ गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारतानं मुरीदकेच्या या मुख्यालयावर एअर स्ट्राईक केला होता, या एअर स्ट्राईकमध्ये हे मुख्यालय पूर्णपणे उद्ध्वस्त झालं आहे.
दरम्यान त्याची हत्या का करण्यात आली? याच कारण अद्याप अस्पष्ट आहे. परंतु सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कौटुंबीक वादातून त्याची हत्या करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. या हत्येमध्ये सहभागी असलेल्या लोकांना अटक करण्यात आलं आहे. बिलाल याच्यावर लष्कर एक तैयबा संघटनेमध्ये महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली होती. मुरीदकेच्या शाखेत दहशतवाद्यांची भरती करण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवण्यात आली होती. तरुण, तरुणींना दहशतवादी संघटनेत भरती करून त्यांचं ब्रेनवॉश करण्याचं कामं बिलाल आरिफ सलाफी करत होता.
ग्लोबल टेरर इंडेक्समध्ये पाकिस्तान पहिल्या क्रमांकावर
दरम्यान वर्षानुवर्ष दहशतवादाला पोसण्याचं काम पाकिस्तानकडून सुरू आहे. मात्र आता त्याची मोठी किंमत त्यांना मोजावी लागत आहे. ग्लोबल टेरर इंडेक्स 2026 रिपोर्ट समोर आला आहे. या ग्लोबल टेरर इंडेक्समध्ये पाकिस्तान पहिल्यांदाच पहिल्या स्थानावर आला आहे. यामुळे पुन्हा एकदा जगभरात पाकिस्तानची मान खाली गेली आहे. जगाला सत्य कळालं आहे. तर 2025 मध्ये सर्वात जास्त दहशतवादी प्रभावीत देश म्हणून पाकिस्तान पहिल्या क्रमांकावर होता. भारतातही वारंवार दहशतवादी हल्ले घडवून आणण्याचा प्रयत्न पाकिस्तानमधील या दहशतवादी संघटनांकडून सुरू असतो. पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानमधील 100 पेक्षा अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झाला होता.